शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
2
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
3
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
4
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
5
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
6
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
7
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
8
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
9
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
10
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
11
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
12
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
13
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
14
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
15
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
16
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
17
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
18
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
19
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
20
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु

१२९ आजारांच्या समावेशाला मुहूर्त मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 00:28 IST

महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेच्या नामांतरास ११ महिन्यांचा कालावधी उलटूनही आरोग्य विभागाने नव्याने समाविष्ट केलेल्या १२९ आजारांची नोंदच शासनाने अधिकृतरित्या कागदोपत्री केली नसल्याने या संदर्भातील रुग्णांना शासनाच्या सवलतींपासून वंचित रहावे लागत आहे़

मारोती जुंबडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेच्या नामांतरास ११ महिन्यांचा कालावधी उलटूनही आरोग्य विभागाने नव्याने समाविष्ट केलेल्या १२९ आजारांची नोंदच शासनाने अधिकृतरित्या कागदोपत्री केली नसल्याने या संदर्भातील रुग्णांना शासनाच्या सवलतींपासून वंचित रहावे लागत आहे़दारिद्र्य रेषेखालील आणि १ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांसाठी २०१३ पासून राज्य शासनाने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली़ होती़ या योजनेत ९७१ आजारांवर विनाशुल्क उपचार केले जात होते़ या योजनेंतर्गत प्रती लाभार्थी दीड लाख रुपयांपर्यंत तसेच मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी अडीच लाखांंपर्यंतचा खर्च शासनाकडून केला जात होता़ तसेच पांढरे रेशन कार्ड वगळता इतर रेशनकार्ड धारक व १ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांसाठी या योजनेअंतर्गत उपचाराची सुविधा देण्यात आली होती़याशिवाय दोन वर्षांपूर्वी राज्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती़ त्यामुळे राज्यातील शेतकरी वर्ग आर्थिक कोंडीत सापडला होता़ शेतकºयांना संसाराचा राहाटगाडा चालविणेही कठीण बनले होते़ त्यामुळे शेतकरी हा आत्महत्येसारखे शेवटच्या टोकाचे पाऊल उचलू लागला़ ही परिस्थिती लक्षात घेता शासनाने राज्यातील शेतकरी वर्गांनाही या योजनेंतर्गत समाविष्ट करून घेतले़ या योजनेला राज्यामध्ये रुग्णांचा वाढता प्रतिसाद मिळत असल्याने २ आॅक्टोबर २०१६ पासून या योजनेचे नामांतर ‘महात्मा ज्योतीबा फुले जीवनदायी आरोग्य योजना’ असे करण्यात आले़ त्यानंतर या योजनेची खर्च मर्यादा दीड लाखांवरून दोन लाख करण्यात आली़ तर मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी अडीच लाखावरून खर्च मर्यादा ३ लाखांपर्यंत करण्यात आली़ पूर्वीच्या योजनेतील ९७१ आजारांसह नवीन १२९ आजारांचा समावेश करण्यात आला़ त्यामध्ये कर्करोग, बालके व वृद्धांवरील उपचार, सिकलसेल, अ‍ॅनिमीया, डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू आदी आजारांचा समावेश करण्यात आला़ तसे त्यावेळी जाहीरही करण्यात आले़ परंतु, या संदर्भातील लेखी आदेश मात्र काढले गेले नाहीत़ शासनाच्या या निर्णयाला ११ महिन्यांचा कालावधी लोटला आहे़ परंतु, अद्यापही याबाबत निर्णय झाला नसल्याने संबंधित रुग्णांना आर्थिक झळ सहन करून उपचार घ्यावे लागत आहेत़ शासनाचा निर्णय चांगला असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने सध्या तरी तो तकलादू ठरला आहे़