शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

११४ गावांना दोन महिन्यांची डेडलाईन

By admin | Updated: August 20, 2014 01:51 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये गावपातळीवर शौचालय बनविण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळेच निर्मल भारत अभियानांतर्गत शौचालयाची व्याप्ती वाढविण्यासाठी शासनाकडून

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये गावपातळीवर शौचालय बनविण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळेच निर्मल भारत अभियानांतर्गत शौचालयाची व्याप्ती वाढविण्यासाठी शासनाकडून आर्थिक तरतुद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ११४ गावांनी दोन महिन्यात आपले गाव १०० टक्के पाणंदमुक्त करावे, अन्यथा संबंधित गावच्या सरपंच, ग्रामसेवकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांनी दिला.येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात मंगळवारी निर्मल भारत अभियानांतर्गत निवडलेल्या जिल्ह्यातील ११४ ग्रामपंचायतींच्या सरपंच, ग्रामसेवकांसाठी आयोजित उद्बोधन कार्यशाळेत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा समन्वयक डॉ. शितलकुमार मुकणे, हनुमंत गादगे, शोभा टेकाळे, भिसे, गिरी, भाले, तोपरसे यांच्यासह जिल्ह्यातील गट समन्वयक व समुह समन्वयक यांची उपस्थिती होती.यावेळी बोलताना रावत म्हणाल्या की, बेस लाईन डाटा एंट्रीमध्ये उस्मानाबाद जिल्हा राज्यामध्ये ३३ व्या क्रमांकावर होता. परंतु, या आठवड्यात राज्यात ५ व्या क्रमांकावर आल्याने त्यांनी ग्रामसेवक व निर्मल भारतच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. तसेच ३१ आॅगस्टपर्यंत संबंधित ११४ ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवकाने १०० टक्के गाव हगणदारीमुक्त बनविण्याचा मुदत आराखडा तयार करावयाचा आहे. व दोन महिन्यात गाव हगणदारीमुक्त बनवून निर्मल ग्राम पुरस्कारासाठी प्रस्तावित करावयाचे आहे. अन्यथा सरपंचावर अपात्रतेचा ठराव व ग्रामसेवकावर कठोर कारवाई करण्याचा इशाराही यावेळी रावत यांनी दिला. निर्मल भारत अभियानात संपूर्ण जिल्हा निर्मल करण्याचाही निर्धार यावेळी बोलून दाखविला. तसेच पंतप्रधान यांनी स्वातंत्र्यदिनी हगणदारी मुक्त भारत बनविण्याचा संकल्प बोलून दाखविल्याचे यावेळी संबंधितांना सांगितले. तसेच शौचालय बनविण्याची गती वाढविण्याच्याही सूचना सरपंच, ग्रामसेवक व भारती निर्माण अभियानच्या कर्मचाऱ्यांना दिल्या.