शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
3
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
4
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
5
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
6
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
7
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
8
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
9
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
10
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
11
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
12
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
13
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
14
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
15
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
16
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
17
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
18
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
19
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
20
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?

दहावीची परीक्षा रद्द, पण शुल्क परतीचे काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:02 IST

औरंगाबाद : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दहावीची वार्षिक परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला. परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत ...

औरंगाबाद : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दहावीची वार्षिक परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला. परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळणे अपेक्षित असून, जिल्ह्यातून २ कोटी ९० लाख ७२ हजार ८२५ रुपयांचे शुल्क ७० हजार ५५ विद्यार्थ्यांना परत कधी मिळणार, याची प्रतीक्षा विद्यार्थ्यांना आहे.

जिल्ह्यात सर्व बोर्डांच्या एकत्रित १०८६ शाळांत दहावीचे ७३,२४९ विद्यार्थी शिकतात. त्यात राज्य मंडळाच्या १०३२ शाळांत ७० हजार ५५ विद्यार्थी आहेत. सीबीएससी, एसएससी बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्यात आली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी बोर्डाकडे जे शुल्क भरले ते प्रमाणपत्र व मार्क मेमो यांच्या छपाईचा खर्च वजा जाता प्रत्येक बोर्डाने विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करायला हवे. बोर्डाचा ९० टक्के खर्च प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका छपाई, प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका विभागात वितरण करण्याचे भाडे वाचले आहे. केंद्रप्रमुख, उपकेंद्र प्रमुख, सुपरवायझर यांचे मानधन, कस्टोडियन, भरारी पथके, परीक्षक, नियामक, मुख्य नियामक यांच्या मानधनाचीही बचत झाली आहे. अशी मागणी औरंगाबाद विभागीय परीक्षा मंडळाचे माजी सदस्य एस. पी. जवळकर यांनी यापूर्वीच केली आहे. आता विद्यार्थ्यांतूनही परीक्षा शुल्क परतीची मागणी जोर धरत आहे.

--

जिल्ह्यातील एकूण माध्यमिक शाळा - १,०३२

प्रति विद्यार्थी परीक्षा शुल्क - ४१५

दहावीतील एकूण विद्यार्थी - ७०,०५५

परीक्षा शुल्काची एकूण रक्कम - २,९०,७२,८२५

---

शिक्षणाधिकारी म्हणतात...

दुष्काळी आणि टंचाई भागातील गेल्या दोन वर्षांचे परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीचे अर्ज मागविण्यात आले होते. त्याची माहिती शाळांकडून मागविली आहे. यावर्षीच्या परीक्षा शुल्कासंबंधी अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. शासन आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.

-डाॅ. बी. बी. चव्हाण, माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्रभारी सचिव विभागीय परीक्षा मंडळ, औरंगाबाद.

---

पुढे काय होणार? विद्यार्थी संभ्रमात

परीक्षा रद्द झाल्याने आता पुढे अकरावीच्या प्रवेशावेळी आवडत्या महाविद्यालयात प्रवेश घेता येईल का? यावर्षी गुणपत्रिका कशी मिळणार, याचा विचार येतोय. परीक्षा शुल्क परत मिळायला पाहिजे; पण अजून आधीच्या दोन वर्षांच्या विद्यार्थ्यांनाही प्रतिपूर्ती शुल्क परत मिळाले नाही.

-प्राची सोनवणे, विद्यार्थिनी.

---

दहावीच्या परीक्षा रद्द झाल्याने परीक्षा शुल्क तत्काळ परत मिळायला हवे होते. मात्र, अद्याप बोर्डाकडून कोणतेही पाऊल उचलले गेले नाही. विलंबाने अर्ज भरला तर विलंब शुल्क द्यावे लागते, मग विद्यार्थ्यांना शुल्क विलंबाने परत दिले तर त्याचाही दंड मिळाला पाहिजे.

-अश्विन काळे, विद्यार्थी.

---

आतापर्यंतच परीक्षा शुल्क परत मिळणे अपेक्षित होते; पण दुष्काळी दोन वर्षांचेही प्रतिपूर्ती शुल्कही अद्याप बोर्डाकडून विद्यार्थ्यांना परत मिळालेले नाही. त्यामुळे आम्हाला मिळेल की नाही, याबद्दल संभ्रम आहेच; पण आमच्या पुढच्या शिक्षणातील येणाऱ्या अडचणींचे काय, हाही प्रश्न अनुत्तरित आहे.

-इम्रान पटेल, विद्यार्थी.