शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

१०२ प्रकल्पांत १.३० टक्केच पाणीसाठा !

By admin | Updated: December 9, 2015 00:41 IST

उस्मानाबाद : जिल्ह्याचे अपेक्षित पर्जन्यमान ७७०.०७ मिमी एवढे असले तरी अख्ख्या पावसाळ्यात सरासरीच्या ५० टक्केही पाऊस झाला नाही.

उस्मानाबाद : जिल्ह्याचे अपेक्षित पर्जन्यमान ७७०.०७ मिमी एवढे असले तरी अख्ख्या पावसाळ्यात सरासरीच्या ५० टक्केही पाऊस झाला नाही. मागील तीन ते चार वर्षापासून अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे सध्या प्रकल्पातील जलसाठाही चिंतेत टाकणारा आहे. १०२ प्रकल्पामध्ये अवघा १.३० टक्के एवढा अत्यल्प पाणीसाठा आहे. विशेष म्हणजे एक मोठा, दोन मध्यम आणि २२ लघुप्रकल्पात ठणठणाट निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित प्रकल्पाअंतर्गत येणारी गावे आणि शहरांना सध्या भीषण जलसंकटाचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यात मागील चार वर्षापासून सरासरीच्या अत्यल्प पर्जन्यमान होत आहे. ३ डिसेंबर २०१५ अखेर उस्मानाबाद तालुक्यात ३९७ मिमी, तुळजापूर ३९३.६, उमरगा ४१०.६, लोहारा ४३६.७, कळंब ३३५.५, भूम ३२२.८, वाशी ३६४ आणि परंडा तालुक्यात अवघा ३२९.४ मिमी पाऊस झाला आहे. आठ तालुक्यातील पर्जन्याची सरासरी विचारात घेतली असता अवघा ३७३.७ मिमी एवढा पाऊस पडला आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या दुष्काळी निर्माण झाली आहे. गावोगावी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवला आहे. जनावरांनाही पाण्यासाठी कोसोदूर भटकंती करावी लागत आहे. अत्यल्प पर्जन्यमानामुळे प्रकल्पातील पाणीसाठाही अपेक्षित प्रमाणात वाढला नाही. परिणामी आजघडीला बहुतांश प्रकल्पाच्या घशाला कोरड पडली आहे. उस्मानाबाद विभागाअंतर्गत मध्यम, लघु आणि मोठे असे मिळून १०२ प्रकल्प येतात. या प्रकल्पांची साठवण क्षमता ३७०.३४८ दलघमी एवढी असली तरी प्रत्यक्षात आज अवघा ४.८०४ दलघमी इतका अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. उपयुक्त साठ्याची टक्केवारी केवळ १.३० एवढी आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत यावेळी मोठ्या प्रमाणात पाणीसाठ्यात घट झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत उपरोक्त सर्व प्रकल्पात मिळून ७२.१९ दलघमी एवढा उपयुक्त साठा होता. त्याचे प्रमाण १९.४९ टक्के एवढे होते. उस्मानाबाद तालुक्यातील तेरणा, रुई. कळंब तालुक्यातील रायगव्हाण, भूम तालुक्यातील बाणगंगा, रामगंगा, परंडा तालुक्यातील खासापुरी, चांदणी, खंडेश्वर, साकत या मध्यम प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक गावांना पाणीपुरवठा केला जातो. यापैकी अवघ्या बाणगंगा प्रकल्पामध्येच ०.५१४ दलघमी एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. उर्वरित प्रकल्पामध्ये उपयुक्त साठा उरलेला नाही. त्यामुळे पाण्यासाठी या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. अशीच अवस्था लघुप्रकल्पांच्या बाबतीत पहावयास मिळते.६८ प्रकल्पात मिळून ४.२९० दलघमी एवढा उपयुक्त साठा आहे. मागील वर्षी याच प्रकल्पात ३७.८०१ दलघमी एवढा साठा उपलब्ध होता. दिवसागणिक प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. त्यामुळे आहे त्या पाण्याचा जपून वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे. काही शहरामध्ये आजघडीला ६ ते ८ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. भविष्यात हे चित्र अधिक गंभीर बनणार आहे.