शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

१०० टक्के बसेस धावू लागल्या; मात्र गावांना खासगी वाहतुकीचाच आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:02 IST

जिल्ह्यात ४८० फेऱ्या बंद : बस वाहतुकीसाठी २२ रुपये प्रति किलोमीटर खर्च राम शिनगारे औरंगाबाद : कोरोनामुळे बंद झालेल्या ...

जिल्ह्यात ४८० फेऱ्या बंद : बस वाहतुकीसाठी २२ रुपये प्रति किलोमीटर खर्च

राम शिनगारे

औरंगाबाद : कोरोनामुळे बंद झालेल्या वाहतुकीचा सर्वाधिक फटका एस.टी. महामंडळाला बसला आहे. अगोदरच तोट्यात चालणारे हे महामंडळ अधिकच गाळात फसले आहे. औरंगाबाद आगारात असलेल्या ५०० पेक्षा अधिक गाड्या आता धावू लागल्या आहेत. मात्र ग्रामीण भागात असलेल्या एकूण फेऱ्यांपैकी ४८० फेऱ्या बंद आहेत. या मार्गावर प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्यामुळे या गाड्या पुन्हा सुरू करण्यात आलेल्या नसल्याची माहिती महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे फेऱ्या रद्द केलेल्या ठिकाणी प्रवाशांना खासगी वाहनांचाच आधार असल्याचे पाहणीत समोर आले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात एस.टी. महामंडळाच्या आगारात एकूण ५०० पेक्षा अधिक बस वाहतुकीसाठी उपलब्ध आहेत. यातील आंतरजिल्हा केल्या जाणाऱ्या सर्व फेऱ्या पूर्ववत सुरू केल्या आहेत. या फेऱ्यांना प्रतिसादही मिळत आहे. मात्र ग्रामीण भागातील एस.टी.ची वाहतूक मंदावलेली आहे. डिझेलचे वाढलेले दर, कोरोनाच्या काळात बंद बसेसमुळे वाढलेला मेंटेनन्स आणि प्रवाशांची वानवा यामुळे महामंडळ प्रचंड तोट्यात आहे. हा तोटा दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्यामुळे एस.टी. महामंडळ प्रवाशांचा प्रतिसाद नसलेल्या मार्गांवर पुन्हा बसफेऱ्या सुरू करण्याच्या तयारीत नसल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

पॉईंटर

एकूण बसेस : ५००

सध्या सुरू असलेल्या बसेस : ५००

आगारात उभ्या असलेल्या बसेस : ००

एकूण कर्मचारी : २९००

चालक : १२१८

वाहक : ९६७

सध्या कामावर चालक : १२१८

सध्या कामावर वाहक : ९६७

बॉक्स

प्रवाशांना खासगी वाहनांचाच आधार

औरंगाबाद जिल्ह्यातील दुर्गम भागात बसेस जात नाहीत. कोरोनाच्या पूर्वी दिवसाकाठी सकाळ, संध्याकाळ बसची एक फेरी होत असे. मात्र आता ती पूर्णपणे बंद केली आहे. त्यामुळे पिकअप, छोटा हत्ती, रिक्षा, जीपसह इतर खासगी वाहनांचाच आधार घ्यावा लागत आहे.

कोट,

तालुक्याच्या गावाला बसेस नाहीत

तालुक्याचे गाव असताना साेयगावमध्ये येण्यासाठी संध्याकाळी सहा वाजेनंतर बस नसते. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घेऊन, जास्त भाडे देऊन गाव गाठावे लागते. याशिवाय शेजारील गावांमध्ये जाण्यासाठी पुरेशा बसच्या फेऱ्या नाहीत. त्यामुळे रिक्षा, खासगी चारचाकी वाहनांनी प्रवास करावा लागतो.

- कैलास पंडित, प्रवासी, सोयगाव