शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

१०० टक्के बसेस धावू लागल्या; मात्र गावांना खासगी वाहतुकीचाच आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:02 IST

जिल्ह्यात ४८० फेऱ्या बंद : बस वाहतुकीसाठी २२ रुपये प्रति किलोमीटर खर्च राम शिनगारे औरंगाबाद : कोरोनामुळे बंद झालेल्या ...

जिल्ह्यात ४८० फेऱ्या बंद : बस वाहतुकीसाठी २२ रुपये प्रति किलोमीटर खर्च

राम शिनगारे

औरंगाबाद : कोरोनामुळे बंद झालेल्या वाहतुकीचा सर्वाधिक फटका एस.टी. महामंडळाला बसला आहे. अगोदरच तोट्यात चालणारे हे महामंडळ अधिकच गाळात फसले आहे. औरंगाबाद आगारात असलेल्या ५०० पेक्षा अधिक गाड्या आता धावू लागल्या आहेत. मात्र ग्रामीण भागात असलेल्या एकूण फेऱ्यांपैकी ४८० फेऱ्या बंद आहेत. या मार्गावर प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्यामुळे या गाड्या पुन्हा सुरू करण्यात आलेल्या नसल्याची माहिती महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे फेऱ्या रद्द केलेल्या ठिकाणी प्रवाशांना खासगी वाहनांचाच आधार असल्याचे पाहणीत समोर आले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात एस.टी. महामंडळाच्या आगारात एकूण ५०० पेक्षा अधिक बस वाहतुकीसाठी उपलब्ध आहेत. यातील आंतरजिल्हा केल्या जाणाऱ्या सर्व फेऱ्या पूर्ववत सुरू केल्या आहेत. या फेऱ्यांना प्रतिसादही मिळत आहे. मात्र ग्रामीण भागातील एस.टी.ची वाहतूक मंदावलेली आहे. डिझेलचे वाढलेले दर, कोरोनाच्या काळात बंद बसेसमुळे वाढलेला मेंटेनन्स आणि प्रवाशांची वानवा यामुळे महामंडळ प्रचंड तोट्यात आहे. हा तोटा दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्यामुळे एस.टी. महामंडळ प्रवाशांचा प्रतिसाद नसलेल्या मार्गांवर पुन्हा बसफेऱ्या सुरू करण्याच्या तयारीत नसल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

पॉईंटर

एकूण बसेस : ५००

सध्या सुरू असलेल्या बसेस : ५००

आगारात उभ्या असलेल्या बसेस : ००

एकूण कर्मचारी : २९००

चालक : १२१८

वाहक : ९६७

सध्या कामावर चालक : १२१८

सध्या कामावर वाहक : ९६७

बॉक्स

प्रवाशांना खासगी वाहनांचाच आधार

औरंगाबाद जिल्ह्यातील दुर्गम भागात बसेस जात नाहीत. कोरोनाच्या पूर्वी दिवसाकाठी सकाळ, संध्याकाळ बसची एक फेरी होत असे. मात्र आता ती पूर्णपणे बंद केली आहे. त्यामुळे पिकअप, छोटा हत्ती, रिक्षा, जीपसह इतर खासगी वाहनांचाच आधार घ्यावा लागत आहे.

कोट,

तालुक्याच्या गावाला बसेस नाहीत

तालुक्याचे गाव असताना साेयगावमध्ये येण्यासाठी संध्याकाळी सहा वाजेनंतर बस नसते. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घेऊन, जास्त भाडे देऊन गाव गाठावे लागते. याशिवाय शेजारील गावांमध्ये जाण्यासाठी पुरेशा बसच्या फेऱ्या नाहीत. त्यामुळे रिक्षा, खासगी चारचाकी वाहनांनी प्रवास करावा लागतो.

- कैलास पंडित, प्रवासी, सोयगाव