शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
5
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
6
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
7
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
8
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
9
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
11
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
12
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
13
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
14
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
15
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
16
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
17
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
18
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
19
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
20
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर

टायरअभावी १० बसेस आगारातच !

By admin | Updated: June 2, 2014 00:50 IST

वाढवणा (बु.) : वाढवणा व परिसरात अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात बोकाळली असून, यास राज्य परिवहन महामंडळ जबाबदार आहे.

वाढवणा (बु.) : वाढवणा व परिसरात अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात बोकाळली असून, यास राज्य परिवहन महामंडळ जबाबदार आहे. या महामंडळाच्या आगार प्रमुखांनी उदगीर-जळकोट मार्गे वाढवणा (बु.) दररोज ७ फेर्‍यापैकी ५ फेर्‍या बंद केल्यामुळे प्रवाशांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. वाढवणा (बु.) ता. उदगीर व परिसरात सध्या लग्नसराईमुळे प्रत्येकांना लग्नासाठी प्रवास करणे हे बंधनकारकच आहे. या भागातील सोनवळा, मंगरुळ, डोंगर कोनाळी, मंगरुळ, लाळी (बु.), येवरी, लाळी (खु.), बेळसांगवी, वाढवणा या भागातील ग्रामस्थांना कोठेही जाण्याचे झाल्यास उदगीर-जळकोट किंवा जळकोट-उदगीर या बसचाच आधार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या उदगीर आगारामधून उदगीर ते जळकोट मार्गे वाढवणा जाणार्‍या बसेसचे सुनियोजन २० वर्षांपूर्वी केलेले असून, त्या नियोजनामुळे या मार्गावरून सकाळी ६ ते रात्री ७ पर्यंत दररोज ७ फेर्‍या बसेसच्या होतात. त्यामुळे या भागातील जनतेची नाळ या बसेसशी आपोआपच जोडलेली आहे. विद्यार्थी, रुग्ण, प्रवासी, बाजारपेठेत जाणारे ग्रामस्थ याद्वारेच ये-जा करतात. गेल्या १ ते २ महिन्यांपासून उदगीर आगाराने ७ फेर्‍यापैकी ५ फेर्‍या बंद केल्यामुळे प्रवाशांची ऐन लग्नसराईमध्ये त्रेधातिरपट उडाली आहे. याचमुळे प्रवासी आपोआपच अवैध प्रवासी वाहतूक असणार्‍या वाहनांकडे वळतोच. ते वाहन चालक प्रवाशांना चक्क मेंढरे कोंबल्यासारखे कोंबून भरधाव वेगाने धावतात. त्यात अपघाताच्याही प्रमाणात वाढ झाली आहे. प्रवासी संख्या भरपूर असताना बसच्या फेर्‍या अचानक बंद का करण्यात आले, याचे कारण प्रवाशांना समजू शकले नाही. परंतु, तालुक्यातील अनेक गावांतील रस्ते खराब झाले आहेत. त्यामुळे या मार्गावरील बसच्या फेर्‍या बंद केल्या आहेत. परिणामी, उदगीर आगारात सध्या टायरअभावी १० बस आगारातच असल्याने प्रवासी नागरिकांची गैरसोय होत आहे. (वार्ताहर) याविषयी चर्चा करण्यासाठी आगारप्रमुख एस.आर. बाशा यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, तालुक्यातील अनेक मार्गावर प्रवासी मिळत नसल्यामुळे या मार्गावरील बसेस बंद करण्यात आले आहेत. जूनमध्ये शाळा सुरू होताच पुन्हा बसेस सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.