शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
2
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
3
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
4
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
5
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
6
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
7
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
8
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
9
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
10
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
11
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
12
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
13
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
14
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
15
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
16
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
17
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
18
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
19
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
20
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला

दोन रुपयांमध्ये दहा लिटर शुद्ध पाणी!

By admin | Updated: May 26, 2014 01:19 IST

साहेबराव हिवराळे , औरंगाबाद शहरी भागात राहणार्‍या नागरिकांना आज शुद्ध पाणी मिळत आहे.

साहेबराव हिवराळे , औरंगाबाद शहरी भागात राहणार्‍या नागरिकांना आज शुद्ध पाणी मिळत आहे. मात्र, आजही ग्रामीण भागात क्षारयुक्त पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागतो. शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गांधेली ग्रामपंचायतीने दोन रुपयांच्या क्वाईनमध्ये १० लिटर शुद्ध पाणी देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. मागील काही वर्षांपासून ग्रामपंचायतीने गावातील सफाई, व्यावसायिक दृष्टिकोन, शेतातील पाण्याचे योग्य नियोजन इत्यादी उपक्रम राबविले. गावाने एकात्मिक पाणलोट विकास व्यवस्थापन कार्यक्रमातही आघाडी घेतली. जवळपास एक कोटी रुपये खर्च करून गावविकासाची मुहूर्तमेढ रोवण्याचे काम केले जात आहे. पाणी हा सर्वांत मोठा आणि गंभीर प्रश्न आहे. ग्रामपंचायतीने गावाला शुद्ध पाणी देण्याचे धोरण स्वीकारले. पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकून पाणीपुरवठा करण्याऐवजी प्लांटमध्ये शुद्ध केलेले पाणी गावाला वाटप करण्याची योजना ग्रामसभेत मंजूर करण्यात आली. शुद्ध पाण्याचा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. ज्यांना पाणी हवे असेल त्यांनी दोन रुपये क्वाईन बॉक्समध्ये टाकायचे अन् १० लिटर शुद्ध पाण्याचा जार घेऊन जायचे, असे नियोजन करण्यात आले आहे. ही योजना २४ तास सुरू राहणार आहे. गावात दिवसरात्र पाणी शुद्ध करण्याचे काम सुरू असते, एक लिटर पाण्याची बाटली बाहेरून आणण्यासाठी १५ ते २० रुपये खर्च येतो. त्यापेक्षा थंडगार व शुद्ध दहा लिटर पाणी घरात घेऊन जाणे गांधेलीवासीयांसाठी प्रतिष्ठेचे बनले आहे. शहरात अनेक व्यापारी पाण्याचा जार खरेदी करण्यावर भर देत आहेत. त्यामुळे अनेक बेरोजगारांनी शुद्ध पाणीपुरवठ्याची यंत्रणा उभारली आहे. गांधेली गावचे सरपंच राहुल सावंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, व्यवस्थापन समितीसोबत शुद्ध पाण्याचे विविध प्रकल्प पाहिले. अगदी कमीत कमी किमतीत नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे, या दृष्टीने काम करण्यात आले. सर्वांनीच त्यासाठी सहमती दर्शविल्याने गावात आनंदाची लहर निर्माण झाली. या कामासाठी सचिव के.एस. देशपांडे, अरविंद ऐलम, समितीचे सचिव प्रल्हाद तळेकर आदींनी परिश्रम घेतले.