शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

१ लाख २१ हजार मेट्रिक टन खताची जिल्ह्यात विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:04 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तयारीत शेतकरी व्यस्त असून, पाण्याच्या उपलब्धतेच्या अंदाजानुसार पेरण्यांना सुरुवात झाली आहे. कृषी ...

औरंगाबाद : जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तयारीत शेतकरी व्यस्त असून, पाण्याच्या उपलब्धतेच्या अंदाजानुसार पेरण्यांना सुरुवात झाली आहे. कृषी विभाकडून कपाशी लागवडीसाठी १५ जूनपर्यंत थांबविण्याचा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. ७ जूनपर्यंत १ लाख २१ हजार ८९८ मेट्रिक टन खताची जिल्ह्यात विक्री झाली असूृन, ७९ हजार ७२९ टन खतांची सध्या उपलब्धता आहे.

खरिपात ६ लाख ७५ हजार हेक्टर सरासरी क्षेत्रापेक्षा ६ हजार ६६४ अधिक लागवड कृषी विभागाने प्रस्ताविक केली असून, सर्वाधिक कापूस ३.९९ लाख हेक्टर, मका १.५५ लाख हेक्टर तर तूर ४२ हजार २००, तर तूर १० हजार १०० हेक्टरवर लागवडीचा अंदाज आहे. त्यासाठी ४३.३१६ क्विंटल बियाण्यांची मागणी असून, ४१ हजार १४४ क्विंटल बियाण्यांची उपलब्धता करण्यात आली आहे.

गेल्या हंगामात २ लाख ६८ हजार ८८९ मेट्रिक टन वापर झाला. यंदाच्या खरीप हंगामात १० टक्के खताचा वापर कमी करण्यासाठी २ लाख ५५ हजार ८१० मेट्रिक टन आवंटन मंजूर करण्यात आले. ७ जूृनपर्यंत २ लाख १ हजार ६२७ मेट्रीक टन खताचा साठा उपलब्ध झाला आहे. त्यात ७३ हजार ८०८ मेट्रिक टन युरिया, तर संयुक्ते खतांचा ८१ हजार ७१० टन खतसाठा जिल्ह्यात उपलब्ध झाला. मंजूर आवटंनाच्या ८० टक्के खत उपलब्ध झाले तर त्यापैकी निम्म्याहून अधिक विक्री झाली असल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून दिसते, तर ठिबक सिंचन, मल्चिंग पेपरचा वापर करून मिरची, टोमॅटो लागवडीला तुरळक सुरुवात झाल्याचे करमाड परिसरात दिसून आले, तर कपाशीसाठी १५ जूनपर्यंत शेतकऱ्यांनी थांबण्याचा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे.

चौकट...

पीक विम्याच्या चाैकशीसाठी पथक सिल्लोडमध्ये दाखल

सिल्लोड तालुक्यातील पीक विम्यासंदर्भातील महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने चाैकशीसाठी पथक दाखल झाले आहे. पुण्याचे संख्याकी विभागाचे अधिकारी, नाशिकचे एक अधिकारी, पुणे येथील दक्षता पथकाचे अधिकारी, तसेच कृषी सह संचालक कार्यालयाचे अधिकारी असे चारजणांचे पथक सिल्लोडला चाैकशीसाठी गेले असून, चाैकशीनंतर ते अहवाल शासनाला सादर करतील. जिल्ह्यात खत विक्री चांगली झाली आहे. पेरणीला अद्याप अवकाश आहे, असे कृषी सहसंचालक डाॅ. दिनकर जाधव यांनी सांगितले.