शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

१ लाख २१ हजार मेट्रिक टन खताची जिल्ह्यात विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:04 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तयारीत शेतकरी व्यस्त असून, पाण्याच्या उपलब्धतेच्या अंदाजानुसार पेरण्यांना सुरुवात झाली आहे. कृषी ...

औरंगाबाद : जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तयारीत शेतकरी व्यस्त असून, पाण्याच्या उपलब्धतेच्या अंदाजानुसार पेरण्यांना सुरुवात झाली आहे. कृषी विभाकडून कपाशी लागवडीसाठी १५ जूनपर्यंत थांबविण्याचा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. ७ जूनपर्यंत १ लाख २१ हजार ८९८ मेट्रिक टन खताची जिल्ह्यात विक्री झाली असूृन, ७९ हजार ७२९ टन खतांची सध्या उपलब्धता आहे.

खरिपात ६ लाख ७५ हजार हेक्टर सरासरी क्षेत्रापेक्षा ६ हजार ६६४ अधिक लागवड कृषी विभागाने प्रस्ताविक केली असून, सर्वाधिक कापूस ३.९९ लाख हेक्टर, मका १.५५ लाख हेक्टर तर तूर ४२ हजार २००, तर तूर १० हजार १०० हेक्टरवर लागवडीचा अंदाज आहे. त्यासाठी ४३.३१६ क्विंटल बियाण्यांची मागणी असून, ४१ हजार १४४ क्विंटल बियाण्यांची उपलब्धता करण्यात आली आहे.

गेल्या हंगामात २ लाख ६८ हजार ८८९ मेट्रिक टन वापर झाला. यंदाच्या खरीप हंगामात १० टक्के खताचा वापर कमी करण्यासाठी २ लाख ५५ हजार ८१० मेट्रिक टन आवंटन मंजूर करण्यात आले. ७ जूृनपर्यंत २ लाख १ हजार ६२७ मेट्रीक टन खताचा साठा उपलब्ध झाला आहे. त्यात ७३ हजार ८०८ मेट्रिक टन युरिया, तर संयुक्ते खतांचा ८१ हजार ७१० टन खतसाठा जिल्ह्यात उपलब्ध झाला. मंजूर आवटंनाच्या ८० टक्के खत उपलब्ध झाले तर त्यापैकी निम्म्याहून अधिक विक्री झाली असल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून दिसते, तर ठिबक सिंचन, मल्चिंग पेपरचा वापर करून मिरची, टोमॅटो लागवडीला तुरळक सुरुवात झाल्याचे करमाड परिसरात दिसून आले, तर कपाशीसाठी १५ जूनपर्यंत शेतकऱ्यांनी थांबण्याचा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे.

चौकट...

पीक विम्याच्या चाैकशीसाठी पथक सिल्लोडमध्ये दाखल

सिल्लोड तालुक्यातील पीक विम्यासंदर्भातील महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने चाैकशीसाठी पथक दाखल झाले आहे. पुण्याचे संख्याकी विभागाचे अधिकारी, नाशिकचे एक अधिकारी, पुणे येथील दक्षता पथकाचे अधिकारी, तसेच कृषी सह संचालक कार्यालयाचे अधिकारी असे चारजणांचे पथक सिल्लोडला चाैकशीसाठी गेले असून, चाैकशीनंतर ते अहवाल शासनाला सादर करतील. जिल्ह्यात खत विक्री चांगली झाली आहे. पेरणीला अद्याप अवकाश आहे, असे कृषी सहसंचालक डाॅ. दिनकर जाधव यांनी सांगितले.