शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
6
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
7
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
8
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
9
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
10
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
11
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
12
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
13
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
14
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
15
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
16
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
18
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
19
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
20
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

क्वारंटाईन सेंटरमधील १ कोटीचे साहित्य चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:05 IST

औरंगाबाद : कोरोना संकट काळात नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी महापालिकेने शहरात १८ पेक्षा अधिक क्वारंटाईन सेंटर्स सुरू केली ...

औरंगाबाद : कोरोना संकट काळात नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी महापालिकेने शहरात १८ पेक्षा अधिक क्वारंटाईन सेंटर्स सुरू केली होती. क्वारंटाईन सेंटरमध्ये नागरिकांसाठी पुरविण्यात आलेल्या गाद्या, उशा, बकेट, टीव्ही, फ्रिज, रेडिओ, माइक सिस्टिम, पल्स ऑक्सिमीटर, थर्मल गन, ऑक्सिजन फ्लो मीटर आदी १ कोटी रुपयांचे साहित्य चोरीला गेल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

मार्च २०२० मध्ये शहरात कोरोना संसर्ग सुरू झाला. महापालिका प्रशासनाने युद्धपातळीवर स्वतःच्या मालकीच्या इमारतींमध्ये, विविध शासकीय कार्यालये, खासगी संस्थेच्या इमारतीमध्ये क्वारंटाईन सेंटर सुरू करण्यात आले. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना १४ दिवस राहण्याची व्यवस्था करण्यात आली. आरोग्य विभागामार्फत दर्जेदार सेवा देण्यात आली. क्वारंटाईन सेंटरमध्ये आलेल्या रुग्णांसाठी महापालिकेच्या स्टोअर विभागाकडून ४ हजार गाद्या, ४ हजार उशा, ४ हजार कीट, ज्यामध्ये साबण, टूथब्रश, कंगवा, तेल आदी साहित्य होते. बकेट १७००, मग १७००, पिलोकव्हर ८ हजार, बेडशीट ८ हजार, माइक सिस्टिम १०, रेडिओ १०, टीव्ही १०, फ्रिज ६, संगणक ६, पल्स ऑक्सिमीटर, थर्मल गन, ऑक्सिजन फ्लो मीटर आदी शेकडो साहित्य देण्यात आले होते. शहरातील बहुतांश क्वारंटाईन सेंटर्स महापालिकेकडून, रुग्ण नसल्यामुळे बंद करण्यात आली आहेत. सेंटर्स बंद केल्यानंतर संबंधित साहित्य महापालिकेकडे परत जमा होणे गरजेचे होते. पण आतापर्यंत एकही साहित्य महापालिकेकडे जमा झालेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ९० टक्के साहित्य चोरीला गेले आहे. जवळपास एक कोटी रुपयांचे साहित्य गेले कुठे, असा प्रश्न आता प्रशासनाला पडला आहे.

देवगिरी हॉस्टेल येथे विद्यार्थ्यांच्या सामानाची चोरी

देवगिरी महाविद्यालयाच्या वसतिगृहात कोरोना रुग्णांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे साहित्य कपाटामध्ये बंद करण्यात आले होते. कपाटातील ते सर्व साहित्य चोरीला गेल्याचे समोर आले होते.

समाजकल्याणच्या इमारतीमधून ८६ फॅन चोरीला

किलेअर्क येथे समाजकल्याण विभागाची इमारत महापालिकेने घेतली होती. या इमारतीमधील जवळपास ८६ सिलिंग फॅन चोरीला गेले आहेत. याप्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साहित्य गेले कुठे? तपासणी होणार

महापालिकेने कोरोना रुग्णांसाठी दिलेले साहित्य गेले कोठे, याची तपासणी करण्यात येईल. स्टोअर आणि आरोग्य विभागाची ही जबाबदारी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात दिलेले साहित्य परत महापालिका मुख्यालयात जमा होणे गरजेचे आहे.

- सखाराम पानझडे, शहर अभियंता, महापालिका.