शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

लग्नसंमारंभासाठी परवानगी घेणे झाले जिकरीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:53 IST

चंद्रपूर : मागील वर्षभरापासून कोरोना संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, काही मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थित लग्नसमारंभ उरकले गेले तर ...

चंद्रपूर : मागील वर्षभरापासून कोरोना संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, काही मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थित लग्नसमारंभ उरकले गेले तर काहींनी लग्नसमारंभ रद्द केले. दरम्यान, मधल्या काळामध्ये मोठ्या धूमधडाक्यात समारंभ आयोजित करण्यात आले. आता पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्यामुळे प्रशासनाची परवानगी घेणे अनिवार्य करण्यात आले असून केवळ ५० जणांनाच उपस्थित राहण्याची परवानगी दिली जात आहे. मात्र ही परवानगी काढतानाही वधू-वराकडील मंडळींची मोठी दमछाक होत आहे. त्यामुळे कुठेही एकाच ठिकाणी परवानगी देण्याचे अधिकार द्यावे, अशी मागणी आता केली जात आहे.

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रशासकीय स्तरावर परवानगी घेण्यासाठी आता विविध अटी तसेच शर्ती ठेवल्या आहे. याचे उल्लंघन केल्यास दंड तसेच गुन्हाही दाखल होणार आहे. त्यामुळे वधू-वर पित्यांची चांगलीच धावपळ होत असून त्यांच्या डोक्याचा ताप वाढला आहे.

बाॅक्स

या आहे अटी

विवाह सोहळ्यास ५० व्यक्तीपेतक्षा जास्त व्यक्ती हजर ठेवू नये,लग्न वैयक्तिक स्वरुपाचे असेल, गर्दी होईल, असा सार्वजनिक स्वरुपाचा कार्यक्रम करता येणार नाही. मास्क, सॅनिटायझर वापरणे बंधनकारक आहे. विवाहस्थळी प्रत्येक व्यक्तीने १ मीटरचे सामाजिक अंतर ठेवणे बंधनकारक आहे. येणाऱ्या प्रत्येकांची नोंद ठेवणे अत्यावश्यक आहे. परवानगी रद्द करण्याचे अधिकार प्रशासनाचे आहे.

बाॅक्स

ही होणार कारवाई

अटी व शर्तीचे पालन करण्यास कसूर झाल्यास परवानगी रद्द करण्यात येईल. संबंधिताविरुद्ध भारतीय दंड संहिता, १८६० चे कलम १८८ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ व ६० अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

अशी घ्यावी लागते परवानगी

स्टेप १

ज्या ठिकाणी लग्न असेल तेथील स्थानिक प्रशासनाचे म्हणजे, महापालिका, नगर परिषद, नगर पंचायत तसेच ग्रामपंचायत प्रशासनाकडे पत्र देऊन त्यांच्याकडून परिसरात लग्नसमारंभासाठी हरकत नसल्याचे पत्र घ्यावे लागते.

स्टेप २

ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत लग्न समारंभ आयोजित करण्यात आला आहे त्या पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराकडूनही ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. यासाठी अर्ज करताना वर-वधूचे तसेच आयोजकांचे आधार कार्ड, लग्नसमारंभ असलेल्या मंगल कार्यालय संचालकाचे पत्र आदी जोडावे लागते. हे जोडल्यानंतरच पोलीस स्टेशनमधून ना हरकत प्रमाणपत्र दिले जाते.

स्टेप ३

वरील दोघांचेही प्रमाणपत्र घेतल्यानंतर तहसील कार्यालयात पुन्हा अर्ज सादर करावा लागतो. यावेळीही वधू-वरांचे, आयोजकाचे आधार कार्ड, विनंती पत्र तसेच पोलीस स्टेशन तसेच ग्रामपंचायत, महापालिका प्रशासनाकडून मिळालेले नाहरकत प्रमाणपत्र जोडावे लागते. यानंतर उपविभागीय अधिकारी विविध अटी-शर्ती ठेवून लग्न समारंभासाठी परवानगी देतात.