शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मांसाहार खालेल्लं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
2
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
3
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
4
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
5
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
6
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
7
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
8
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
9
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
10
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
11
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
12
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
13
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
14
काळजी घ्या! मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला, व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका पाठवून बँक खाते रिकामे करतात
15
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
16
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न
18
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
19
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
20
IB Recruitment: गुप्तचर विभागात ज्युनियर ऑफिसर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता

लग्नसंमारंभासाठी परवानगी घेणे झाले जिकरीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:53 IST

चंद्रपूर : मागील वर्षभरापासून कोरोना संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, काही मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थित लग्नसमारंभ उरकले गेले तर ...

चंद्रपूर : मागील वर्षभरापासून कोरोना संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, काही मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थित लग्नसमारंभ उरकले गेले तर काहींनी लग्नसमारंभ रद्द केले. दरम्यान, मधल्या काळामध्ये मोठ्या धूमधडाक्यात समारंभ आयोजित करण्यात आले. आता पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्यामुळे प्रशासनाची परवानगी घेणे अनिवार्य करण्यात आले असून केवळ ५० जणांनाच उपस्थित राहण्याची परवानगी दिली जात आहे. मात्र ही परवानगी काढतानाही वधू-वराकडील मंडळींची मोठी दमछाक होत आहे. त्यामुळे कुठेही एकाच ठिकाणी परवानगी देण्याचे अधिकार द्यावे, अशी मागणी आता केली जात आहे.

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रशासकीय स्तरावर परवानगी घेण्यासाठी आता विविध अटी तसेच शर्ती ठेवल्या आहे. याचे उल्लंघन केल्यास दंड तसेच गुन्हाही दाखल होणार आहे. त्यामुळे वधू-वर पित्यांची चांगलीच धावपळ होत असून त्यांच्या डोक्याचा ताप वाढला आहे.

बाॅक्स

या आहे अटी

विवाह सोहळ्यास ५० व्यक्तीपेतक्षा जास्त व्यक्ती हजर ठेवू नये,लग्न वैयक्तिक स्वरुपाचे असेल, गर्दी होईल, असा सार्वजनिक स्वरुपाचा कार्यक्रम करता येणार नाही. मास्क, सॅनिटायझर वापरणे बंधनकारक आहे. विवाहस्थळी प्रत्येक व्यक्तीने १ मीटरचे सामाजिक अंतर ठेवणे बंधनकारक आहे. येणाऱ्या प्रत्येकांची नोंद ठेवणे अत्यावश्यक आहे. परवानगी रद्द करण्याचे अधिकार प्रशासनाचे आहे.

बाॅक्स

ही होणार कारवाई

अटी व शर्तीचे पालन करण्यास कसूर झाल्यास परवानगी रद्द करण्यात येईल. संबंधिताविरुद्ध भारतीय दंड संहिता, १८६० चे कलम १८८ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ व ६० अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

अशी घ्यावी लागते परवानगी

स्टेप १

ज्या ठिकाणी लग्न असेल तेथील स्थानिक प्रशासनाचे म्हणजे, महापालिका, नगर परिषद, नगर पंचायत तसेच ग्रामपंचायत प्रशासनाकडे पत्र देऊन त्यांच्याकडून परिसरात लग्नसमारंभासाठी हरकत नसल्याचे पत्र घ्यावे लागते.

स्टेप २

ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत लग्न समारंभ आयोजित करण्यात आला आहे त्या पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराकडूनही ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. यासाठी अर्ज करताना वर-वधूचे तसेच आयोजकांचे आधार कार्ड, लग्नसमारंभ असलेल्या मंगल कार्यालय संचालकाचे पत्र आदी जोडावे लागते. हे जोडल्यानंतरच पोलीस स्टेशनमधून ना हरकत प्रमाणपत्र दिले जाते.

स्टेप ३

वरील दोघांचेही प्रमाणपत्र घेतल्यानंतर तहसील कार्यालयात पुन्हा अर्ज सादर करावा लागतो. यावेळीही वधू-वरांचे, आयोजकाचे आधार कार्ड, विनंती पत्र तसेच पोलीस स्टेशन तसेच ग्रामपंचायत, महापालिका प्रशासनाकडून मिळालेले नाहरकत प्रमाणपत्र जोडावे लागते. यानंतर उपविभागीय अधिकारी विविध अटी-शर्ती ठेवून लग्न समारंभासाठी परवानगी देतात.