शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

तुम्हीच सांगा, जगायचे कसे ?

By admin | Updated: July 21, 2014 23:46 IST

जून आणि जुलै महिन्यातील काही दिवस पावसाने दडी मारल्याने यावर्षी पाहिजे तशी भाजीपाल्याची बाजारात आवक नाही. त्यामुळे भाजीपाल्यांचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत. भाजीपाला चाळीस

भाजीपाल्यांचे भाव गगनाला : गृहिणींचे बजेट कोलमडलेचंद्रपूर : जून आणि जुलै महिन्यातील काही दिवस पावसाने दडी मारल्याने यावर्षी पाहिजे तशी भाजीपाल्याची बाजारात आवक नाही. त्यामुळे भाजीपाल्यांचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत. भाजीपाला चाळीस रुपयांहून अंशी रुपयांपर्यंत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या महागाईमुळे गृहीणींच्या डोळ्यात अश्रू येत आहेत. महागाईच्या विळख्यामुळे कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी कशी करावी, असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. दिवसेंदिवस जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढतच आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांची मजुरी केवळ भाजीपाला खरेदीमध्येच जात आहे. वाढत असलेल्या जीवनावश्यक वस्तुंच्या किमतीत केवळ हातमजूरी करुन आपले जीव जगणारा मजुरवर्गच आता त्रस्त झाला आहे. सध्यास्थितीत ग्रामीण भागात १०० ते १५० रुपये रोजी तर शहरामध्यये २०० ते ३०० रुपये मजूरी मिळते. मोलमजुरी करुन जीवन जगणाऱ्या मजुरांना तर, जगणे कठीण झाले आहे.भाजीपाल्यापासून ते किराणा सामान आणता- आणता त्याची मिळालेली मजूरी आणि होणारा खर्च याचा कुठेही ताळमेळ बसत नसल्याने दिवसेंदिवस चिंता वाढत आहे.बाजारातील जीवनावश्यक वस्तूंचे गगनाला भिडलेले भाव आणि दररोजच्या रोजगारासाठी करावी लागणारी वणवण याचा कुठेही ताळमेळ बसत नसल्याने सर्वसामान्य कुटुंबासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. तुंटपूंज्या मिळणाऱ्या मजुरीत व जीवनावश्यक वस्तूंचा खर्च, शैक्षणिक खर्च, प्रवास आणि ऐनवेळी येणाऱ्या काही खर्चाचा हिशेब केल्यानंतर मजुरी व खर्च याचा काहीही ताळमेळ बसत नाही. शासकीय नोकरी करणाऱ्यांना दरमहिन्यात वेतन मिळते, मात्र हातावर आणून पानावर खाणाऱ्यांचा कुणी विचार करणार का, असा संतप्त सवाल सामान्य नागरिकांसह मजूर वर्गातून केला जात आहे.(नगर प्रतिनिधी)