शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
2
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
3
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
4
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
5
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
6
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
7
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
8
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
9
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
10
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
11
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
12
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
13
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
14
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
15
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
16
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
17
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
18
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
19
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
20
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...

अतिदुर्गम भागात विणले पक्क्या रस्त्याचे जाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 22:35 IST

आदिवासी बहुल, अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या कोरपना व जिवती तालुक्यातील अनेक अतिदुर्गम गावामध्ये पक्क्य व खड्डेमुक्त रस्त्यांचे जाळे विणले गेल्याने प्रवासी व नागरिकांचा प्रवास सुखकर होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : आदिवासी बहुल, अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या कोरपना व जिवती तालुक्यातील अनेक अतिदुर्गम गावामध्ये पक्क्य व खड्डेमुक्त रस्त्यांचे जाळे विणले गेल्याने प्रवासी व नागरिकांचा प्रवास सुखकर होत आहे.निसर्गरम्य माणिकगड पहाडाच्या दºया खोर्या व पक्कडीगुड्डम जलाशयपासून जाणारा चनई- येरगव्हाण -धनकदेवी- जिवती हा २२ ते २५ किलोमीटरचा जवळपास पंधरा गावाला जोडणारा रस्ता आहे. त्याचे संपूर्ण डांबरीकरण व मजबुतीकरण झाल्याने कोरपना व जिवती या दोन्ही तालुका मुख्यालयाचे अंतर खूपच कमी झाले आहे. तसेच प्रवासातली दगडधोंड्याची मोठी अडचण दूर झाल्याने प्रवासही निसर्गपूर्ण वातावरणात आल्हाददायक व सुखकर बनला आहे. त्यामुळे येणाºया जाणाºया प्रत्येक वाटसरूकडून या रस्त्याच्या निर्मितीबाबत कौतुकास्पद गौरवउद्वार बाहेर पडतात. सदर मार्ग प्रधानमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत निर्माण झाला आहे. या रस्त्याच्या निर्मितीमुळे अतिदुर्गम भागातील अनेक गावे मुख्य प्रवाहाशी जोडली गेली आहेत. जिल्ह्याचे पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार व आमदार संजय धोटे यांचे प्रयत्नातून या रस्त्यासह तालुक्यातील अनेक अतिदुर्गम भागातील रस्त्याचे काम मार्गी लागले यात कवठाळा- इरई, कुसळ-बोरगाव-कमलापूर, वडगाव-रामपूर- निजाम गोंदी, वनसडी -पक्कडीगुड्डम, वनसडी- नारडा- कवठाळा फाटा - पवनी, माथा - शेरज मार्ग पक्या आणि मजबूत रस्त्यात रूपांतरित झाले आहे.