शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

यंत्राद्वारे केली जात आहेत शेतीचे कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 00:40 IST

काही वर्षांपासून सालगड्यांच्या मजुरीमध्ये मोठी वाढ झाल्याने तसेच शेती कसण्यासाठी विश्वासू सालगडी मिळत नसल्याने आता शेतकरी यांत्रिकीकरणाकडे वळले आहे. परिआमी शेतमजुरांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देमजुर झाले बेरोजगार : पेरणी व वखरणीसाठी केला जातो बैलांचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : काही वर्षांपासून सालगड्यांच्या मजुरीमध्ये मोठी वाढ झाल्याने तसेच शेती कसण्यासाठी विश्वासू सालगडी मिळत नसल्याने आता शेतकरी यांत्रिकीकरणाकडे वळले आहे. परिआमी शेतमजुरांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. ‘हायटेक’ शेतीमुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.जिल्ह्यातील कोरपना, राजुरा, वरोरा, भद्रावती, ब्रह्मपूरी, सिंदेवाही तसेच चंद्रपूर तालुक्यात काही भागात मोठ्या प्रमाणात शेती व्यवसाय असून धान तसेच कापसासाठी जिल्हा प्रसिद्ध आहे. मात्र दिवसेंदिवस शेतमजुरी वाढत असल्याने शेतकरी आता यांत्रिकीकरणाकडे वळले आहे. चंद्रपूरसह इतर तालुक्यांमध्ये कोरडवाहू शेतीचे प्रमाण जास्त असल्याने या शेतीतून उत्पन्न घेण्यासाठी निसर्गावर अवलंबून राहावे लागते. त्यात दरवर्षी नैसर्गिक संकटे येत असल्याने शेतीचे गणित वजाबाकीचे झाले आहे. कोरडवाहू शेतात उत्पादन म्हणावे तसे होत नाही. त्यातच मजुरांचे वाढते दर, पाण्याची कमतरता आदी कारणामुळे उत्पादन कमी व खर्च जास्त अशा दुहेरी संकटात शेती व्यवसाय सापडला आहे. शेती कसण्यासाठी लागणाºया मजुरीने न उरकणारी कामे, दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून शेतकरी आपल्या शेतातील शेतीच्या मशागतीच्या कामासाठी ट्रॅक्टरचा आधार घेत आहे. बळीराजा शेतातील कामांबरोबर शेणखत घालणे आदी कामे ट्रॅक्टरच्या सहाय्याने करीत आहे. खरीप व रबी हंगामातही पेरणीसाठी ट्रॅक्टरचा प्रयोग करताना दिसून येत आहे. केवळ पेरणी व वखरणीसाठी बैलांचा वापर केला जात आहे. परंतु यंदा पडलेल्या दुष्काळामुळे पशुधनाला कसे जपावे हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. बैलगाडीच्या सहाय्याने मजूर लावून अथवा सालगडी ठेवून शेताची मशागत करताना येणारा खर्च व ट्रॅक्टरच्या सहाय्याने येणाºया खर्चाचा ताळमेळ घातल्यास ट्रॅक्टरचा वापर परवडणारा आहे. परिणामी ट्रॅक्टरवाल्यांना रोजगार मिळत आहे. मात्र शेत मजुरांचे हात रिकामेच आहे. सद्या शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टरचा वापर केल्याने मशागतीचे काम चांगले होते. तेच काम बैलाच्या सहाय्याने केल्यास कामास उशीर लागतो.बैलजोडीचे दर वाढलेदिवसेंदिवस पशुधनात घट होत असल्याने बैलजोडी महागली आहे. बैल घेणे शेतकºयांच्या अवाक्याबाहेर आहे. त्यातच चाºयाचा प्रश्न गंभीर असल्याने शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती करीत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती