शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

यंत्राद्वारे केली जात आहेत शेतीचे कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 00:40 IST

काही वर्षांपासून सालगड्यांच्या मजुरीमध्ये मोठी वाढ झाल्याने तसेच शेती कसण्यासाठी विश्वासू सालगडी मिळत नसल्याने आता शेतकरी यांत्रिकीकरणाकडे वळले आहे. परिआमी शेतमजुरांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देमजुर झाले बेरोजगार : पेरणी व वखरणीसाठी केला जातो बैलांचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : काही वर्षांपासून सालगड्यांच्या मजुरीमध्ये मोठी वाढ झाल्याने तसेच शेती कसण्यासाठी विश्वासू सालगडी मिळत नसल्याने आता शेतकरी यांत्रिकीकरणाकडे वळले आहे. परिआमी शेतमजुरांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. ‘हायटेक’ शेतीमुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.जिल्ह्यातील कोरपना, राजुरा, वरोरा, भद्रावती, ब्रह्मपूरी, सिंदेवाही तसेच चंद्रपूर तालुक्यात काही भागात मोठ्या प्रमाणात शेती व्यवसाय असून धान तसेच कापसासाठी जिल्हा प्रसिद्ध आहे. मात्र दिवसेंदिवस शेतमजुरी वाढत असल्याने शेतकरी आता यांत्रिकीकरणाकडे वळले आहे. चंद्रपूरसह इतर तालुक्यांमध्ये कोरडवाहू शेतीचे प्रमाण जास्त असल्याने या शेतीतून उत्पन्न घेण्यासाठी निसर्गावर अवलंबून राहावे लागते. त्यात दरवर्षी नैसर्गिक संकटे येत असल्याने शेतीचे गणित वजाबाकीचे झाले आहे. कोरडवाहू शेतात उत्पादन म्हणावे तसे होत नाही. त्यातच मजुरांचे वाढते दर, पाण्याची कमतरता आदी कारणामुळे उत्पादन कमी व खर्च जास्त अशा दुहेरी संकटात शेती व्यवसाय सापडला आहे. शेती कसण्यासाठी लागणाºया मजुरीने न उरकणारी कामे, दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून शेतकरी आपल्या शेतातील शेतीच्या मशागतीच्या कामासाठी ट्रॅक्टरचा आधार घेत आहे. बळीराजा शेतातील कामांबरोबर शेणखत घालणे आदी कामे ट्रॅक्टरच्या सहाय्याने करीत आहे. खरीप व रबी हंगामातही पेरणीसाठी ट्रॅक्टरचा प्रयोग करताना दिसून येत आहे. केवळ पेरणी व वखरणीसाठी बैलांचा वापर केला जात आहे. परंतु यंदा पडलेल्या दुष्काळामुळे पशुधनाला कसे जपावे हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. बैलगाडीच्या सहाय्याने मजूर लावून अथवा सालगडी ठेवून शेताची मशागत करताना येणारा खर्च व ट्रॅक्टरच्या सहाय्याने येणाºया खर्चाचा ताळमेळ घातल्यास ट्रॅक्टरचा वापर परवडणारा आहे. परिणामी ट्रॅक्टरवाल्यांना रोजगार मिळत आहे. मात्र शेत मजुरांचे हात रिकामेच आहे. सद्या शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टरचा वापर केल्याने मशागतीचे काम चांगले होते. तेच काम बैलाच्या सहाय्याने केल्यास कामास उशीर लागतो.बैलजोडीचे दर वाढलेदिवसेंदिवस पशुधनात घट होत असल्याने बैलजोडी महागली आहे. बैल घेणे शेतकºयांच्या अवाक्याबाहेर आहे. त्यातच चाºयाचा प्रश्न गंभीर असल्याने शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती करीत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती