शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

यंत्राद्वारे केली जात आहेत शेतीचे कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 00:40 IST

काही वर्षांपासून सालगड्यांच्या मजुरीमध्ये मोठी वाढ झाल्याने तसेच शेती कसण्यासाठी विश्वासू सालगडी मिळत नसल्याने आता शेतकरी यांत्रिकीकरणाकडे वळले आहे. परिआमी शेतमजुरांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देमजुर झाले बेरोजगार : पेरणी व वखरणीसाठी केला जातो बैलांचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : काही वर्षांपासून सालगड्यांच्या मजुरीमध्ये मोठी वाढ झाल्याने तसेच शेती कसण्यासाठी विश्वासू सालगडी मिळत नसल्याने आता शेतकरी यांत्रिकीकरणाकडे वळले आहे. परिआमी शेतमजुरांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. ‘हायटेक’ शेतीमुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.जिल्ह्यातील कोरपना, राजुरा, वरोरा, भद्रावती, ब्रह्मपूरी, सिंदेवाही तसेच चंद्रपूर तालुक्यात काही भागात मोठ्या प्रमाणात शेती व्यवसाय असून धान तसेच कापसासाठी जिल्हा प्रसिद्ध आहे. मात्र दिवसेंदिवस शेतमजुरी वाढत असल्याने शेतकरी आता यांत्रिकीकरणाकडे वळले आहे. चंद्रपूरसह इतर तालुक्यांमध्ये कोरडवाहू शेतीचे प्रमाण जास्त असल्याने या शेतीतून उत्पन्न घेण्यासाठी निसर्गावर अवलंबून राहावे लागते. त्यात दरवर्षी नैसर्गिक संकटे येत असल्याने शेतीचे गणित वजाबाकीचे झाले आहे. कोरडवाहू शेतात उत्पादन म्हणावे तसे होत नाही. त्यातच मजुरांचे वाढते दर, पाण्याची कमतरता आदी कारणामुळे उत्पादन कमी व खर्च जास्त अशा दुहेरी संकटात शेती व्यवसाय सापडला आहे. शेती कसण्यासाठी लागणाºया मजुरीने न उरकणारी कामे, दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून शेतकरी आपल्या शेतातील शेतीच्या मशागतीच्या कामासाठी ट्रॅक्टरचा आधार घेत आहे. बळीराजा शेतातील कामांबरोबर शेणखत घालणे आदी कामे ट्रॅक्टरच्या सहाय्याने करीत आहे. खरीप व रबी हंगामातही पेरणीसाठी ट्रॅक्टरचा प्रयोग करताना दिसून येत आहे. केवळ पेरणी व वखरणीसाठी बैलांचा वापर केला जात आहे. परंतु यंदा पडलेल्या दुष्काळामुळे पशुधनाला कसे जपावे हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. बैलगाडीच्या सहाय्याने मजूर लावून अथवा सालगडी ठेवून शेताची मशागत करताना येणारा खर्च व ट्रॅक्टरच्या सहाय्याने येणाºया खर्चाचा ताळमेळ घातल्यास ट्रॅक्टरचा वापर परवडणारा आहे. परिणामी ट्रॅक्टरवाल्यांना रोजगार मिळत आहे. मात्र शेत मजुरांचे हात रिकामेच आहे. सद्या शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टरचा वापर केल्याने मशागतीचे काम चांगले होते. तेच काम बैलाच्या सहाय्याने केल्यास कामास उशीर लागतो.बैलजोडीचे दर वाढलेदिवसेंदिवस पशुधनात घट होत असल्याने बैलजोडी महागली आहे. बैल घेणे शेतकºयांच्या अवाक्याबाहेर आहे. त्यातच चाºयाचा प्रश्न गंभीर असल्याने शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती करीत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती