शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

कार्यक्षेत्राच्या अटींचा बळीराजाला फास

By admin | Updated: September 21, 2015 00:47 IST

परवानाधारक सावकाराकडील कर्जमाफ करुन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला. तसा शासननिर्णय काढला.

सावकाराची कर्जमुक्ती फसवी : ६४ पैकी सहा पात्र, जाचक अटीने केला शेतकऱ्यांचा घातचंद्रपूर : परवानाधारक सावकाराकडील कर्जमाफ करुन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला. तसा शासननिर्णय काढला. मात्र, पात्रतेचे निकाल जटील असल्याने तालुक्यातील ६४ शेतकऱ्यांपैकी सहा शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत, केवळ परवानाधारक सावकाराच्या कार्यक्षेत्राच्या अटीमुळे अद्याप ५८ शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती सावकारी कर्जाचा फास कायम आहे.शासननिर्णय आल्यानंतर सहायक निबंधक सहकारी कार्यालयाने तालुक्यातील १९ परवानाधारक सावकारांना कर्जदार शेतकऱ्यांची यादी मागितली. त्यातील ११ सावकारांनी तालुक्यातील ७२ गावांतील ४१० कर्जदारांची यादी निबंधक कार्यालयाला दिली. त्यापैकी ६४ कर्जदार व्यक्ती सातबाराधारक शेतकरी असल्याची अंतिम माहिती तलाठी कार्यालयात पाठविली. अंतिम छानणीत ६४ शेतकऱ्यांनी कर्ज घेतल्याचे निष्पन्न झाले. मात्र, शासननिर्णयानुसार परवानाधारक सावकाराने परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेरील व्यक्तीस कर्ज दिले होते. त्यामुळे या योजनेसाठी संबंधित शेतकरी पात्र ठरणार नाही, अशी अट होती. त्यामुळे केवळ ६४ शेतकऱ्यांपैकी सहा शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले. वरोरा तालुक्यात १९ परवानाधारक सावकार आहेत. त्यातील काही सावकारांचा परवाना शहरापुरता मर्यादित आहे. काहींचा तालुक्यातील विशिष्ट गावापुरताच मर्यादित आहे. त्यामुळे बाजूच्या गावातील एखाद्या शेतकऱ्याने कार्यक्षेत्र ठरलेल्या सावकाराकडून कर्ज घेतले असल्यास ते अपात्र ठरत आहे.या कर्जमाफी योजनेसाठी शेगाव येथील दोन परवानाधारक सावकाराकडून सहा शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज पात्र ठरले. त्यामुळे या शेतकऱ्यांचे व्याजासह एक लाख २१ हजार ४०१ रुपये आता माफ होणार आहे. (शहर प्रतिनिधी)अट रद्द कराशेतकरी हा जवळ असलेल्या बाजारपेठेत आपला शेतमाल विकत असतो. तेथूनच तो कर्जाची उचल करीत असतो. भद्रावती तालुक्यातील नंदोरी येथील शेतकरी वरोरा बाजारपेठेत माल विकत असतात. वरोरा येथील सावकारांकडून कर्ज घेत असतात. त्यामुळे शासनाने कर्जमाफीसाठी परवानाधारक सावकाराच्या कार्यक्षेत्राची अट रद्द करुन सातबाराधारक शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, अशी मागणी होत आहे. .