शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
2
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
4
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
5
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
7
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
8
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
9
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
10
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
11
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
12
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
13
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
14
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
15
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
16
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
17
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
18
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
19
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
20
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश

काम बंद; मात्र लाखोंचे बिल अदा

By admin | Updated: May 9, 2016 00:57 IST

शहरात दररोज जमा होणाऱ्या कचऱ्यांची योग्य विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने नगर पालिकेने मूल शहराच्या बाहेर घनकचरा प्रकल्प उभारलेला आहे.

मुख्याधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद : बाबा अझिम यांचा पत्रकार परिषदेत आरोपमूल : शहरात दररोज जमा होणाऱ्या कचऱ्यांची योग्य विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने नगर पालिकेने मूल शहराच्या बाहेर घनकचरा प्रकल्प उभारलेला आहे. या प्रकल्पामध्ये खत निर्मितीचे काम मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. परंतु मागील ८ महिण्यापासून सदर प्रकल्पामध्ये कोणतेही काम न करता एका बेरोजगार अभियंता सेवा सहकारी संस्थेला २४ लाखाचे बिल मुख्याधिकाऱ्यांनी दिले आहे. सदर बिल अदा करण्यामागे मुख्याधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याची माहिती मूल नगर पालिकेचे नगरसेवक बाबा अझिम यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.येथील विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अझिम पुढे म्हणाले की, घनकचरा प्रक्रिया केंद्रामध्ये खत निर्मिती करण्याच्या दृष्टीने निविदा मागविण्यात आल्या होत्या. यामध्ये चंद्रपूर येथील श्री साई अभियंता बेरोजगार सेवा सहकारी संस्थेची २ लाख २६ हजार रुपये मासिक दराची निविदा तीन वर्षासाठी मंजूर करून अटी व शर्तीला अधीन राहून करारनामा करण्यात आला. परंतु नगरपालिकेने कंत्राटदार संस्थेच्या करारनाम्यानुसार काम न करताही जून २०१४ ते नोव्हें. २०१४ पर्यंत १३ लाख ५६ हजार रुपयाचे बिल तेरावा वित्त आयोगांतर्गत कंत्राटदाराला अदा करण्यात आले आहे.डिसेंबर २०१४ चे बिल कंत्राटदार संस्थेला अदा करताना करारनाम्यानुसार घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम २००० अन्वये शून्य प्रणाली सायन्टीफीक हॅन्डफील तयार करणे, प्लास्टिकची विल्हेवाट शास्त्रशुद्ध पद्धतीने लावण्यात येत नाही, सेग्रीगेशन मशीनचा वापर अपेक्षेप्रमाणे करण्यात आलेले नाही, प्रकल्पामध्ये तयार झालेले खत विक्री करण्याची जबाबदारी कंत्राटदार संस्थेची असतानाही विक्री केलेली नाही. तसेच विक्रीसंबंधी कार्यवाही करण्यात आलेली नाही. असे असतानाही डिसेंबर २०१४ पर्यंतचे बिल नगर पालिकेने कंत्राटदार संस्थेला अदा करण्याचे कारण काय, असा सवाल नगरसेवक अझिम यांनी केला आहे.कंत्राटदार संस्थेने घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम २००० ची अंमलबजावणी केलेली नाही, तसेच करारनाम्यानुसार कामेही केलेली नसल्याचे खुद्द पालिकेचे आरोग्य निरीक्षक अभय येपूरवार यांनी दिलेल्या अहवालात म्हटलेले आहे. परंतु अहवालालाच बदल देत कंत्राटदाराचे बिल अदा करण्यात आलेले आहे. घनकचरा प्रकल्पामध्ये योग्य पद्धतीने काम होत नसल्यामुळे कामात सुधारणा करण्याबाबत कंत्राटदार संस्थेला ३ पत्र देण्यात आले. मात्र कामात अजूनही सुधारणा करण्यात आलेली नाही.एप्रिल २०१५ पासून दर महिण्याला नगरपालिकेने १२ टन ओला कचरा घनकचरा प्रक्रिया केंद्रामध्ये पोहोचता केला. त्यानुसार आॅगस्ट २०१५ पर्यंत ६० टन खत तयार करून त्याची विक्री करणे अपेक्षित होते. परंतु सदर संस्थेने केलेले नाही. त्यामुळे नगरपालिकेचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याचेही नगरसेवक अझिम यांनी सांगितले. तसेच मागील आठ महिन्यापासून घनकचरा प्रकल्पामध्ये कोणत्याही प्रकारचे काम सुरू नसतानाही कंत्राटदाराला १४ लाख ४६ हजाराचे बिल अदा करण्यात आलेले आहे. सदर बिल कंत्राटदाराला देण्यामागचे कारण नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट करावे, अशी मागणी नगरसेवक बाबा अझिम, महेश हरडे यांनी यावेळी केली. (तालुका प्रतिनिधी)