शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
4
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
5
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
7
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
8
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
9
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
10
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
11
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
12
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
13
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
14
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
15
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
16
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
17
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
18
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
19
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
20
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

संवेदनशीलतेने काम करा

By admin | Updated: September 15, 2015 03:14 IST

मानवांचा आणि जंगली श्वापदांचा संघर्ष दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात एखाद्याला अपघात झाला तर त्या

सावली : मानवांचा आणि जंगली श्वापदांचा संघर्ष दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात एखाद्याला अपघात झाला तर त्या इसमापर्यंत तत्काळ मदत पोहोचविण्यासाठी वनविभागाने संवेदनशील असावे, असे प्रतिपादन राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ते सावली येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते. ते म्हणाले, एकीकडे जंगली श्वापदं आणि मानवांमध्ये संघर्ष वाढत आहे. कधी शेतांचे तर कधी जीवांचे नुकसान होत असते. त्यामुळे वनविभागाने सतर्क राहून आपली सेवा तात्काळ उपलब्ध करण्याचे आवाहन केले.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून चिमूर-गडचिरोली क्षेत्राचे खासदार अशोक नेते, विधान परिषद सदस्य शोभा फडणवीस, गडचिरोलीचे आमदार देवराव होळी, सावली-ब्रह्मपुरी क्षेत्राचे माजी आमदार प्रा. अतुल देशकर, भाजपाचे गडचिरोली जिल्हा अध्यक्ष प्रमोद पिपरे, जि.प. सदस्य वैशाली कुकडे, उपविभागीय अधिकारी मनीषा दांडगे, भाजपाचे तालुका अध्यक्ष देवराव मुद्दमवार, सावलीचे माजी सरपंच अतुल लेनगुरे, काँग्रेसचे नेते प्रकाश राईंचवार आदी मंचावर उपस्थित होते. सर्वप्रथम दीप प्रज्वलन व फीत कापून रितसर इमारतीचा लोकार्पण सोहळा पार पडला. वन हुतात्मा दिनाचे औचित्य साधून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री या नात्याने त्यांनी नवनिर्मित सावली नगर पंचायतीच्या विकासाकरिता दोन कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले. तसेच वाघाच्या हल्ल्यात मरण पावलेल्या नागरिकांना आठ लाख रुपयांची मदत, शिवाय रानडुकरामुळे झालेल्या नुकसानीची ३० दिवसात मदत देण्याचा कायदाही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच सावली तालुक्यातील सर्व माजी मालगुजारी तलावाची दुरूस्ती व खोलीकरण करण्याचे आश्वासन दिले.विधान परिषद सदस्य शोभा फडणवीस यांनी या जिल्ह्यात वनांवर आधारित उद्योगांची निर्मिती करण्याची मागणी केली. त्यावर लवकरच प्रक्रियेला सुरूवात करण्यात येत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. बांबू प्रकल्पाबाबत बोलताना आपल्याकडे उच्च दर्जाचा बांबू उपलब्ध नाही. मात्र दर्जेदार बांबु निर्माण करण्याचे प्रयोग सुरू असून लवकरच तो प्रकल्प अस्तित्वात येईल, असेही अभिवचन दिले. जिल्ह्यात बेरोजगारांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत असून ‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर ‘मेक इन चंद्रपूर’ हा प्रयोग करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला. आपण केवळ बोलत नाही तर जे बोलतो ते करून दाखवितो. केवळ दहा महिन्यात सर्व काही शक्य नाही. त्यामुळे नागरिकांनी काही दिवसांपर्यंत वाट पाहावी, असेही त्यांनी आवर्जुन सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे यांनी केले तर संचालन व आभार नासीर खान यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सावलीचे वनपरिक्षेत्राधिकारी एम.पी. राठोड, क्षेत्र सहायक बी.डी. चिकाटे, राजू कोडापे, विजय रामटेके यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)