शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

कोरोनाने कुंकू पुसलेल्या महिलांना मिळाला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 05:00 IST

कोरोनामुळे पतीचे अकाली निधन झाल्यामुळे अशा महिलांवर आभाळ कोसळले आहे. अनेकींच्या वाट्याला हालअपेष्टा आल्या आहेत. विविध समस्यांचा सामना करीत त्या जीवन जगत आहेत. यातील  प्रत्येकींचीच आर्थिक परिस्थिती चांगली नाही. त्यामुळे  अडचणींचा सामना  करावा लागत आहे. या महिलांना आधार मिळावा यासाठी शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून मानधन देणे सुरू केले आहे. शासकीय निकषांमध्ये बसत असलेल्या विधवा महिलांना हा लाभ दिला जात आहे.

साईनाथ कुचनकार लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना संकटामुळे विधवा झालेल्या महिलांना आर्थिक ताण पडू नये, त्यांचे जगणे सुसह्य व्हावे यासाठी संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभ दिला जात आहे. याअंतर्गत आजपर्यंत जिल्ह्यात २०५ महिलांना लाभ  मिळाला आहे. अन्य महिलांचेही प्रस्ताव दाखल झाले असून तालुकास्तरीय समिती यावर निर्णय घेणार आहे. लाभ मिळत असल्यामुळे काही प्रमाणात का होईना, पडत्या काळात  दिलासा मिळाला आहे.कोरोनामुळे पतीचे अकाली निधन झाल्यामुळे अशा महिलांवर आभाळ कोसळले आहे. अनेकींच्या वाट्याला हालअपेष्टा आल्या आहेत. विविध समस्यांचा सामना करीत त्या जीवन जगत आहेत. यातील  प्रत्येकींचीच आर्थिक परिस्थिती चांगली नाही. त्यामुळे  अडचणींचा सामना  करावा लागत आहे. या महिलांना आधार मिळावा यासाठी शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून मानधन देणे सुरू केले आहे. शासकीय निकषांमध्ये बसत असलेल्या विधवा महिलांना हा लाभ दिला जात आहे. त्यामुळे कठीण काळामध्ये या शासकीय आधारामुळे थोडाफार दिलासा मिळत आहे. विशेष म्हणजे, २०५ महिलांना आधार मिळाला असला तरी, अन्य महिलांनाही लाभ मिळावा यासाठी  कागदपत्रे गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले असून त्याही महिलांना लाभ मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. 

२० हजारांचे अर्थसहाय्य

राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजनेतून अल्पगटातील विधवा महिलांना एकदाच २० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य दिले जाते. यासाठी संबंधित महिलांना पतीच्या निधनानंतर तीन वर्षाच्या आत प्रशासनाकडे अर्ज सादर करावा लागतो.

येथे करा अर्ज...अर्जदाराने शासन निर्णयानुसार आर्थिक साहाय्य मिळविण्यासाठी निर्धारित केलेला अर्ज भरावा. ज्या ठिकाणी राहत असेल, त्या भागातील संबंधित तलाठ्याकडे अर्ज सादर करावा.

विधवा तसेच निराधार असलेल्या महिलांना शासनाच्या विविध योजना आहेत. या योजनांच्या माध्यमातून त्यांना लाभ दिला जातो. महिलांनी संबंधित तहसील कार्यालयामध्ये अर्ज सादर करावा. समितीने अर्ज मान्य केल्यानंतर दर महिन्याला संबंधित महिलांना मानधन दिले जाते.- डाॅ. कांचन जगतापतहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या