शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
3
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
4
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
5
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
6
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
7
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
8
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
9
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
10
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
11
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
12
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
13
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
14
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
15
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
16
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
17
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
18
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
19
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
20
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
Daily Top 2Weekly Top 5

बिल्टच्या आंदोलनात महिलांचाही सहभाग

By admin | Updated: May 5, 2016 01:24 IST

बल्लारपूर शहराची आर्थिक वाहिनी असलेल्या बल्लारपूर पेपर मिल उद्योगाला वनविभाग मंत्रालयाने बांबू व लाकडांचा पुरवठा करण्यासंदर्भात उदासीनतेचे धोरण अंगीकारले आहे.

आंदोलनाचा चौथा दिवस : आंदोलन तीव्र करण्याचा निर्धारबल्लारपूर : बल्लारपूर शहराची आर्थिक वाहिनी असलेल्या बल्लारपूर पेपर मिल उद्योगाला वनविभाग मंत्रालयाने बांबू व लाकडांचा पुरवठा करण्यासंदर्भात उदासीनतेचे धोरण अंगीकारले आहे. कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे कार्यरत कामगाराच्या उपजिवीकेचा प्रश्न गंभीर होणार आहे. मिलचे उत्पादनही ठप्प होण्याच्या मार्गावर आले आहे. राज्य सरकारचे लक्ष केंद्रित करण्यासाठी येत्या १० मे रोजी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार माजी खासदार नरेश पुगलिया यांनी व्यक्त केला. बुधवारी आंदोलनाच्या चौथ्या दिवशी महिलांचाही सहभाग मिळाला असून आठ महिला उपोषणाला बसल्या आहेत.बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभा व विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या वतीने रविवारपासून स्थानिक नगरपालिका चौकात खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली. मंगळवारी बल्लारपूर पेपर मिलचे कर्मचारी जयंत नंदूरकर, श्रीकृष्ण कौरासे, विजय बहादूरसिंग, चंदू भूक, धीरज सिंग यांचे उपोषण लिंबूपाणी पाजून माजी खासदार व कामगार नेते नरेश पुगलिया, गजानन गावंडे, नगरसेवक प्रवीण पडवेकर, अ‍ॅड. अविनाश ठावरी, वसंत मांढरे, देवेंद्र आर्य, माजी नगराध्यक्ष दिलीप माकोडे, रजनी मुलचंदानी, नासिरखान यांनी सोडविले.दरम्यान, बुधवारला या आंदोलनात महिलांनीही उडी घेतली. छाया मडावी, माजी नगराध्यक्ष रजनी मुलचंदानी, माजी नगरसेवक एलिजाबेथ, नगरसेवक करुणा रेब्बावार यांनी अ‍ॅड. मेघा भाले, माजी नगराध्यक्ष छबूताई मेश्राम, माजी नगरसेविका शोभादेवी महंतो, रोजिदा ताजुद्दीन, अर्चना बुटले, वर्षा दानव, उमादेवी मिश्रा यांना पुष्पहार अर्पण करुन उपोषणाला बसविण्यात आले.यावेळी मार्गदर्शन करताना नरेश पुगलिया म्हणाले, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बांबू उपलब्ध आहे. सन २०१४ पूर्वी कच्चा माल उपलब्ध करुन देण्यासाठी शासन स्तरावरुन १०-१५ वर्षाचा करार केला जात होता. मात्र वनमंत्री जिल्ह्याचे असूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी पेपर मिल उद्योग संकटात आला आहे. निविदा प्रक्रिया दोनदा रद्द करण्यात आली. यामुळे ९० टक्के कच्चा माल परराज्यातून आणावा लागत आहे. उद्योगाला बळ देण्यासाठी कच्च्या मालाचा पुरवठा उपलब्ध करुन देण्याचे धोरण असताना वन विभागाचे मंत्रालय याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. यावर शासनाने तोडगा न काढल्यास आंदोलनाची धार तीव्र करण्यात येणार आहे. ७ मेपर्यंतचे हे साखळी उपोषण १४ मेपर्यंत करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. (शहर प्रतिनिधी)