शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

ग्रामीण भागातील महिलांचा रोजगार हिरावतोय ! उद्योग सुरु करण्याची महिलांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 15:25 IST

जंगलावर आधारित नवीन उद्योग सुरू करा : वन निवासी भागातील महिलांची मागणी

विकास खोब्रागडे लोकमत न्यूज नेटवर्कपळसगाव (पि.) : दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वन विभागाचा विस्तार व वन कायदा ग्रामीण भागातील मुख्य व पारंपरिक रोजगार निर्मितीत मुख्य अडसर ठरत आहे. त्यामुळे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी जंगलव्याप्त ग्रामीण भागातील महिला बचत गट व युवकांकडून केली जात आहे. 

चिमूर तालुक्यामधील बहुतांश गावे ही जंगलालगत आहेत. ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था पूर्णतः शेतीवर अवलंबून आहे. चिमूर विधानसभा क्षेत्रातील बराचसा भाग वनक्षेत्राने व्यापलेला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत जंगलावर आधारित मोहफुले, तेंदुपता गोळा करण्यात येतात. ग्रामीण भागातील जंगलाशेजारी राहणारी जनता आपल्या उपजीविकेसाठी जंगलावर अवलंबून होती. दिवसेंदिवस जंगल राखीव वनक्षेत्र तयार झाल्याने काही कामांना बंदी घालण्यात आली. कुन्हाड बंदी, गुरे चराई, स्वयंपाकासाठी सरपण गोळा करणे आदी कामांवर बंधने आली. जंगलावरील ताण कमी करण्यासाठी व मानव- वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी गावातच रोजगार निर्मिती व्हावी म्हणून बफर झोन क्षेत्रातील गावात डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी जनधन विकास योजनेच्या माध्यमातून गावागावात संयुक्त वन व्यवस्थापन समित्या स्थापना करण्यात आल्या. समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना स्वयंपाकासाठी गॅस जोडणी, बेरोजगार तरुणांना रोजगार प्रशिक्षण, गावातील तरुण महिला बचत गटाच्या महिलांना माहिती व सूक्ष्म नियोजन करण्यात आले. मात्र, यातून रोजगार निर्मिती होत नसल्याचे चित्र सध्या तरी तालुक्यात दिसत आहे.

वन विभागामार्फत मोफत रोजगार दिल्याचा कांगावा करण्यात येतो. मात्र, काही जाचक अटींमुळे ग्रामीण भागातील तरुण मुले, महिला अजूनही रोजगारापासून वंचित आहेत. ग्रामीण भागातील पारंपरिक व्यवसाय हिरावला जात आहे. वन विभागाकडून काही प्रमाणात महिलांना रोजगार दिला होता. मात्र, वन विभागाच्या अधिकारी वर्गाकडून लादलेल्या जाचक अटींमुळे काही गरीब आदिवासी महिलांचा रोजगारच हिरावला जात असल्याचे चित्र चिमूर तालुक्यात सध्या दिसत आहे.

वन विभाग रोजगार पुरविण्यात अपयशीपिढ्यांपिढ्या कसत असलेली अतिक्रमणित शेतीचे स्थायी पट्टे न देता वन विभागाने ते भुईसपाट केली. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी पूर्णतः हवालदिल झाला असून, भूमिहीन बेरोजगार तरुणांच्या हाताला काम नाही. त्यामुळे तरुण बेरोजगार झाला आहे. बेरोजगारीच्या तुलनेत रोजगार पुरविण्यात वन विभाग अपयशी ठरल्याचे दिसत आहे. 

रोजगार दिल्याचा कांगावाचवन विभागामार्फत मोफत रोजगार दिल्याचा कांगावा करण्यात येतो. मात्र, काही जाचक अटींमुळे ग्रामीण भागातील तरुण मुले, महिला अजूनही रोजगारापासून वंचित आहेत. ग्रामीण भागातील पारंपरिक व्यवसाय हिरावला जात आहे.

मोजक्याच तरुणांना पर्यटनातून रोजगारताडोबा बफर झोन अंतर्गत येणाऱ्या गावात पर्यटन क्षेत्रामधून जंगल सफारी करण्यात येत आहे. यात १६ गाइड व जिप्सी चालकांना काही प्रमाणात रोजगार मिळाला. मात्र, अजूनही गावातील सुशिक्षित तरुणाई बेरोजगारच आहे. 

टॅग्स :Womenमहिलाforestजंगलchandrapur-acचंद्रपूर