शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

ग्रामीण भागातील महिलांचा रोजगार हिरावतोय ! उद्योग सुरु करण्याची महिलांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 15:25 IST

जंगलावर आधारित नवीन उद्योग सुरू करा : वन निवासी भागातील महिलांची मागणी

विकास खोब्रागडे लोकमत न्यूज नेटवर्कपळसगाव (पि.) : दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वन विभागाचा विस्तार व वन कायदा ग्रामीण भागातील मुख्य व पारंपरिक रोजगार निर्मितीत मुख्य अडसर ठरत आहे. त्यामुळे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी जंगलव्याप्त ग्रामीण भागातील महिला बचत गट व युवकांकडून केली जात आहे. 

चिमूर तालुक्यामधील बहुतांश गावे ही जंगलालगत आहेत. ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था पूर्णतः शेतीवर अवलंबून आहे. चिमूर विधानसभा क्षेत्रातील बराचसा भाग वनक्षेत्राने व्यापलेला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत जंगलावर आधारित मोहफुले, तेंदुपता गोळा करण्यात येतात. ग्रामीण भागातील जंगलाशेजारी राहणारी जनता आपल्या उपजीविकेसाठी जंगलावर अवलंबून होती. दिवसेंदिवस जंगल राखीव वनक्षेत्र तयार झाल्याने काही कामांना बंदी घालण्यात आली. कुन्हाड बंदी, गुरे चराई, स्वयंपाकासाठी सरपण गोळा करणे आदी कामांवर बंधने आली. जंगलावरील ताण कमी करण्यासाठी व मानव- वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी गावातच रोजगार निर्मिती व्हावी म्हणून बफर झोन क्षेत्रातील गावात डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी जनधन विकास योजनेच्या माध्यमातून गावागावात संयुक्त वन व्यवस्थापन समित्या स्थापना करण्यात आल्या. समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना स्वयंपाकासाठी गॅस जोडणी, बेरोजगार तरुणांना रोजगार प्रशिक्षण, गावातील तरुण महिला बचत गटाच्या महिलांना माहिती व सूक्ष्म नियोजन करण्यात आले. मात्र, यातून रोजगार निर्मिती होत नसल्याचे चित्र सध्या तरी तालुक्यात दिसत आहे.

वन विभागामार्फत मोफत रोजगार दिल्याचा कांगावा करण्यात येतो. मात्र, काही जाचक अटींमुळे ग्रामीण भागातील तरुण मुले, महिला अजूनही रोजगारापासून वंचित आहेत. ग्रामीण भागातील पारंपरिक व्यवसाय हिरावला जात आहे. वन विभागाकडून काही प्रमाणात महिलांना रोजगार दिला होता. मात्र, वन विभागाच्या अधिकारी वर्गाकडून लादलेल्या जाचक अटींमुळे काही गरीब आदिवासी महिलांचा रोजगारच हिरावला जात असल्याचे चित्र चिमूर तालुक्यात सध्या दिसत आहे.

वन विभाग रोजगार पुरविण्यात अपयशीपिढ्यांपिढ्या कसत असलेली अतिक्रमणित शेतीचे स्थायी पट्टे न देता वन विभागाने ते भुईसपाट केली. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी पूर्णतः हवालदिल झाला असून, भूमिहीन बेरोजगार तरुणांच्या हाताला काम नाही. त्यामुळे तरुण बेरोजगार झाला आहे. बेरोजगारीच्या तुलनेत रोजगार पुरविण्यात वन विभाग अपयशी ठरल्याचे दिसत आहे. 

रोजगार दिल्याचा कांगावाचवन विभागामार्फत मोफत रोजगार दिल्याचा कांगावा करण्यात येतो. मात्र, काही जाचक अटींमुळे ग्रामीण भागातील तरुण मुले, महिला अजूनही रोजगारापासून वंचित आहेत. ग्रामीण भागातील पारंपरिक व्यवसाय हिरावला जात आहे.

मोजक्याच तरुणांना पर्यटनातून रोजगारताडोबा बफर झोन अंतर्गत येणाऱ्या गावात पर्यटन क्षेत्रामधून जंगल सफारी करण्यात येत आहे. यात १६ गाइड व जिप्सी चालकांना काही प्रमाणात रोजगार मिळाला. मात्र, अजूनही गावातील सुशिक्षित तरुणाई बेरोजगारच आहे. 

टॅग्स :Womenमहिलाforestजंगलchandrapur-acचंद्रपूर