शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

आवाळपूरच्या महिलेला नांदा येथे घरकूल

By admin | Updated: March 19, 2017 00:32 IST

शासनाच्या रमाई आवास योजनेतंर्गत सन २०१६-१७ करिता कोरपना तालुक्यात एकुण ३७ ग्रामपंचायतीसाठी ५२ घरकुल मंजूर करण्यात आले.

नांदा ग्रामपंचायतीचा प्रताप : विधवांना डावलून सधन लोकांना दिली घरेचंद्रपूर : शासनाच्या रमाई आवास योजनेतंर्गत सन २०१६-१७ करिता कोरपना तालुक्यात एकुण ३७ ग्रामपंचायतीसाठी ५२ घरकुल मंजूर करण्यात आले. त्यापैकी एकट्या नांदा ग्रामपंचायतीला १२ घरकुलांची मंजुरी मिळाली. मात्र नांदा ग्रामपंचायतीने विधवा व गरजूंना डावलून चक्क आवाळपूरच्या रहिवासी असलेल्या महिलेला घरकूल मंजूर केल्याचे उघडकीस आले आहे.या ग्रामपंचायतीने गरजूंना बगल देत सधन लोकांना घरे दिल्याने विधवा महिलांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे तक्रार केली आहे. विशेष वृत्त असे की, नांदा ग्रामपंचायतीने १६ डिसेंबर २०१६ ला रमाई घरकुल योजनेकरिता लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी आमसभा घेतली. सभेत एकुण ५४ नागरिकांनी लाभार्थी म्हणून निवड व्हावी यासाठी नावे दिली. १२ घरकुलासाठी ५४ जणांची यादी ग्रामपंचायत नांदाने तयार केली. शासनाकडे १२ लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीसाठी पाठवित असताना गरजुंना प्राधान्य देणे महत्वाचे होते. मात्र तसे न करता स्वमर्जीतल्या लोकांना घरकुलाची मंजुरी देऊन खऱ्या गरजू लाभार्थ्यांना डावलण्यात आले.सभेचे अध्यक्ष व सचिवांनी ठराव घेण्याच्या पुर्वी ग्रामसभेत विधवा, निराधार, अल्प उत्पन्न असणारे व्यक्ती व वयोवृद्ध लाभार्थी निवडण्यासंबंधात माहिती देणे आवश्यक होते. परंतु तसे न करता सरळसरळ यादी बनविण्यात आली. प्राधान्यक्रम न ठरवता स्थळ पंचनामा न करता यादी जशीच्या तशी पंचायत समिती कोरपना येथे पाठविण्यात आली. सभेचे अध्यक्ष व सचिवांनी मर्जीतल्या लोकांना प्राधान्य दिल्याने जिल्हा स्तरावरून सुरूवातीचे अनुक्रमांकावर नाव असलेल्या नागरिकांची रमाई घरकुल योजनेसाठी निवड करण्यात आली.चौकशी करून प्राधान्यक्रम न ठरवता यादी पाठवल्याने अनेक गरजू, विधवा व अल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्यांचे नुकसान झाले. याबाबत ताराबाई डोंगरे, मंगला चेन्नुरवार, अचम्मा मंगल या महिलांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे तक्रार केली आहे. यात सर्वाधिक गंभीर बाब अशी की जिल्हा स्तरावरून मंजूर यादीत चंद्रकला किसन सोनटक्के या महिलेची निवड करण्यात आली आहे. वास्तविक सदर महिला आवाळपूर येथील रहिवाशी असून त्यांच्या नावाने त्याठिकाणी घर, रेशनकार्ड व मतदान कार्ड आहे. चंद्रकला सोनटक्के ही महिला नांदा ग्रामपंचायतीची रहिवाशी नसतानाही तिला रमाई घरकुल योजनेची लाभार्थी बनविण्यात आले आहे. याची आता चौकशी होणे गरजेचे आहे. (शहर प्रतिनिधी)रमाई घरकूल योजनेचे लाभार्थी निवडण्यासाठी घेण्यात आलेल्या ग्रामसभेचे अध्यक्ष उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले होते. ते स्थानिक असल्यामुळे त्यांनी कोणाकडे पक्के घर आहे, कोणती महिला विधवा आहे, झोपडीत राहते की पक्क्या घरात राहते, उत्पन्न किती, स्थानिक रहिवासी आहेत का? अशा सर्व बाबींची शहानिशा करून लाभार्थ्यांचा प्राधान्यक्रम बनवायला पाहिजे होता. मात्र तसे न झाल्याने ताराबाई डोंगरे, मंगला चेन्नुरवार, अचम्मा मंगल या विधवा महिलांचे नुकसान झाले आहे. स्थळ पंचनामा करून लाभार्थी निवडण्यात यावे.- अभय मुनोत, सदस्य, ग्रा.पं. नांदा.