शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
2
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
3
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
4
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
5
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
6
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
7
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
8
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिटकवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
9
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
10
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
11
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
12
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
13
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
14
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
15
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
16
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
18
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
19
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
20
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?

शील, प्रज्ञेच्या प्रेरणेसाठी जागतात अख्खी रात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 23:21 IST

विश्वाला शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत बुद्धाचा धम्म हा विज्ञानावर आधारित आहे. भारतीय संविधानात धम्माच्या अनेक बाबींचा समावेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. त्यामुळे लोकशाही टिकून आहे. तथागताचा धम्म मानवाला वैज्ञानिक दृष्टीने जीवन जगण्याचा मार्ग दाखवितो. यातून शील व प्रज्ञेची प्रेरणा मिळते. त्यामुळे हजारो श्रावक संघारामगिरीत येऊन अख्खी रात्र जागतात. प्रबोधनाचा संदेश घेऊन आपापल्या गावाला परततात. यंदाच्या कार्यक्रमातही हेच दृश्य दिसून आले.

ठळक मुद्देसंघारामगिरीत महापरित्राण पाठ : दोन हजार धम्म श्रावकांची उपस्थिती

राजकुमार चुनारकर।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : विश्वाला शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत बुद्धाचा धम्म हा विज्ञानावर आधारित आहे. भारतीय संविधानात धम्माच्या अनेक बाबींचा समावेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. त्यामुळे लोकशाही टिकून आहे. तथागताचा धम्म मानवाला वैज्ञानिक दृष्टीने जीवन जगण्याचा मार्ग दाखवितो. यातून शील व प्रज्ञेची प्रेरणा मिळते. त्यामुळे हजारो श्रावक संघारामगिरीत येऊन अख्खी रात्र जागतात. प्रबोधनाचा संदेश घेऊन आपापल्या गावाला परततात. यंदाच्या कार्यक्रमातही हेच दृश्य दिसून आले.अडीच हजार वर्षांपूर्वी तथागत बुद्धाचा धम्म भारतात अस्तित्वात होता. कालांतराने सम्राट अशोक यांच्यानंतर धम्माला उतरती कळा लागली. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धम्म दीक्षेमुळे भारतात धम्म पुन्हा गतिमान झाला. यासाठी भिक्षू संघ कार्य करीत आहे. २५ वर्षांपूर्वी संघरामगिरी येथे भन्ते महाथेरो ज्ञानज्योती यांनी गुजगव्हाण येथून पाच किमी अंतरावर भिक्षु संघासाठी तपोभूमी निर्माण केली. या तपोभूमीवर ३० ते ३१ जानेवारीला मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो बौद्ध बांधव उपस्थित राहून बौद्ध धम्माचे तत्वज्ञान ग्रहण करतात. संघारामगिरीत भन्ते महाथेरो ज्ञानजोती यांनी या बौद्ध उपासकांसाठी महापरित्रान पाठाचे आयोजन केले होते.धम्माला वैज्ञानिक अधिष्ठानरात्री १० वाजता सुरू झालेल्या ज्ञानसोहळ्याचा समारोप पहाटे ५ वाजता झाला. महापरित्राण पाठातून निर्वाणपदाचा साक्षात्कार, आनापानसती आणि विपश्यना भावनेचा अभ्यास करून जीवन मंगलमय करण्याची संहिता अनुभवतात. चित्ताला प्रज्ञापूर्वक आदेश देऊन दहा पारमिताचे पालन करण्याचा संकल्प साक्षी भावनेने केले जाते. यासाठी बुद्धाने सांगितलेल्या विविध तृष्णांचे निसरण करण्याचे बळ व मार्ग या अधिष्ठानामधून उपासकान्ाां गवसतो. वैज्ञानिक कसोटीवर खरे उतरणारे हे अधिष्ठान ज्ञानाचा ठेवा आहे. सर्वसामान्य नागरिकांना दोन-तीन तास एकाच ठिकाणी बसून कार्यक्रम एक म्हटले कंटाळा येतो. मात्र अधिष्ठानामध्ये कोणत्याही प्रकारचा आत्मक्लेश, आत्मपिडा अथवा कष्ट नसल्याने जीवन जगण्याचा सम्यक मार्ग उपासकांना प्राप्त होतो. त्यासाठी सम्यक दृष्टी व सम्यक संकल्प अंगिकारने अपेक्षित असते. यंदा दोन हजार उपासकांनी कडाक्याच्या थंडीतही रात्र जागून धम्मातील शील,समाधी,व प्रज्ञा ग्रहण करण्याचा प्रयत्न केला.