शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

शील, प्रज्ञेच्या प्रेरणेसाठी जागतात अख्खी रात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 23:21 IST

विश्वाला शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत बुद्धाचा धम्म हा विज्ञानावर आधारित आहे. भारतीय संविधानात धम्माच्या अनेक बाबींचा समावेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. त्यामुळे लोकशाही टिकून आहे. तथागताचा धम्म मानवाला वैज्ञानिक दृष्टीने जीवन जगण्याचा मार्ग दाखवितो. यातून शील व प्रज्ञेची प्रेरणा मिळते. त्यामुळे हजारो श्रावक संघारामगिरीत येऊन अख्खी रात्र जागतात. प्रबोधनाचा संदेश घेऊन आपापल्या गावाला परततात. यंदाच्या कार्यक्रमातही हेच दृश्य दिसून आले.

ठळक मुद्देसंघारामगिरीत महापरित्राण पाठ : दोन हजार धम्म श्रावकांची उपस्थिती

राजकुमार चुनारकर।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : विश्वाला शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत बुद्धाचा धम्म हा विज्ञानावर आधारित आहे. भारतीय संविधानात धम्माच्या अनेक बाबींचा समावेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. त्यामुळे लोकशाही टिकून आहे. तथागताचा धम्म मानवाला वैज्ञानिक दृष्टीने जीवन जगण्याचा मार्ग दाखवितो. यातून शील व प्रज्ञेची प्रेरणा मिळते. त्यामुळे हजारो श्रावक संघारामगिरीत येऊन अख्खी रात्र जागतात. प्रबोधनाचा संदेश घेऊन आपापल्या गावाला परततात. यंदाच्या कार्यक्रमातही हेच दृश्य दिसून आले.अडीच हजार वर्षांपूर्वी तथागत बुद्धाचा धम्म भारतात अस्तित्वात होता. कालांतराने सम्राट अशोक यांच्यानंतर धम्माला उतरती कळा लागली. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धम्म दीक्षेमुळे भारतात धम्म पुन्हा गतिमान झाला. यासाठी भिक्षू संघ कार्य करीत आहे. २५ वर्षांपूर्वी संघरामगिरी येथे भन्ते महाथेरो ज्ञानज्योती यांनी गुजगव्हाण येथून पाच किमी अंतरावर भिक्षु संघासाठी तपोभूमी निर्माण केली. या तपोभूमीवर ३० ते ३१ जानेवारीला मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो बौद्ध बांधव उपस्थित राहून बौद्ध धम्माचे तत्वज्ञान ग्रहण करतात. संघारामगिरीत भन्ते महाथेरो ज्ञानजोती यांनी या बौद्ध उपासकांसाठी महापरित्रान पाठाचे आयोजन केले होते.धम्माला वैज्ञानिक अधिष्ठानरात्री १० वाजता सुरू झालेल्या ज्ञानसोहळ्याचा समारोप पहाटे ५ वाजता झाला. महापरित्राण पाठातून निर्वाणपदाचा साक्षात्कार, आनापानसती आणि विपश्यना भावनेचा अभ्यास करून जीवन मंगलमय करण्याची संहिता अनुभवतात. चित्ताला प्रज्ञापूर्वक आदेश देऊन दहा पारमिताचे पालन करण्याचा संकल्प साक्षी भावनेने केले जाते. यासाठी बुद्धाने सांगितलेल्या विविध तृष्णांचे निसरण करण्याचे बळ व मार्ग या अधिष्ठानामधून उपासकान्ाां गवसतो. वैज्ञानिक कसोटीवर खरे उतरणारे हे अधिष्ठान ज्ञानाचा ठेवा आहे. सर्वसामान्य नागरिकांना दोन-तीन तास एकाच ठिकाणी बसून कार्यक्रम एक म्हटले कंटाळा येतो. मात्र अधिष्ठानामध्ये कोणत्याही प्रकारचा आत्मक्लेश, आत्मपिडा अथवा कष्ट नसल्याने जीवन जगण्याचा सम्यक मार्ग उपासकांना प्राप्त होतो. त्यासाठी सम्यक दृष्टी व सम्यक संकल्प अंगिकारने अपेक्षित असते. यंदा दोन हजार उपासकांनी कडाक्याच्या थंडीतही रात्र जागून धम्मातील शील,समाधी,व प्रज्ञा ग्रहण करण्याचा प्रयत्न केला.