शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत वन्यप्राणी करतात शेतीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:26 IST

फोटो गोवरी : वन्यप्राण्यांमुळे दरवर्षी शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान केले जाते. शेतकरी शेतात दिवसरात्र मेहनत करून पिकांना जिवापाड जपत ...

फोटो

गोवरी : वन्यप्राण्यांमुळे दरवर्षी शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान केले जाते. शेतकरी शेतात दिवसरात्र मेहनत करून पिकांना जिवापाड जपत असतात. परंतु वनविभाग वन्यप्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी असफल ठरला असून पिकांमध्ये वन्यप्राणी भरदिवसा धिंगाणा घालत असल्याने शेतकºयांच्या हातात येणारे पीक डोळ्यांदेखत प्राणी उदध्वस्त करीत आहे. त्यामुळे शेतकरी पुरता हतबल झाला असून वनविभागाने वन्यप्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.

शेतकरी नेहमीच अस्मानी आणि सुलतानी संकटात भरडला जातो. कधी निसर्गाची अवकृपा तर कधी हातात येणारे पीक वन्यप्राणी भरदिवसा डोळ्यांदेखत उदध्वस्त करीत असतात. परंतु वनविभागाने यावर अद्यापही कायमस्वरूपी उपाययोजना केली नाही. त्यामुळे दरवर्षी वन्यप्राण्यांकडून शेतीचे अतोनात नुकसान केले जाते. वन्यप्राणी शेतीचे प्रचंड नुकसान करीत असल्याने शेतकरी हतबल झाले आहे.

सध्या पीक फळधारणेवर आले आहे. सोयाबीन पीक कापणीला आले तर कपाशीला बोंडे लागली आहे. पीक शेतकºयांच्या हातात आले असले तरी अजूनही बहुतांश पीक शेतात आहे. मात्र वन्यप्राणी भरदिवसा शेतात धिंगाणा घालून पीक उदध्वस्त करीत आहे. वन्यप्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी प्रभाकर जुनघरी, बंडूजी बोभाटे,भास्कर जुनघरी,विकास पिंपळकर,श्रीधर जुनघरी,प्रमोद लांडे, सुनील देळवाकर, मंगेश जुनघरी, राजेश्वर कुंचेवार,चेतन बोभाटे,निखिल लांडे,तुषार लोहे, केतन बोभाटे,भूषण जुनघरी व शेतकºयांनी केली आहे.

वेकोलिचे ढिगारे झाले झुडुपी जंगल

राजुरा तालुक्यातील बहुतांश भाग झुडपी जंगलाने व्यापला आहे. सोबतच गोवरी, सास्ती, पोवनी, गोयेगाव, अंतरगाव, साखरी, वरोडा परिसरात मोठया प्रमाणात वेकोलिच्या खुल्या कोळसा खाणी आहेत. कोळसा उत्खननासाठी वेकोलिने मातीचे महाकाय ढिगारे शेतीच्या परिसरात टाकल्यामुळे या मातीच्या महाकाय ढिगाºयावर झुडपी जंगल तयार झाल्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांचा वावर असतो. भरदिवसा वन्यप्राणी शेतीचे प्रचंड नुकसान करीत असल्याने हातात येणारे पीक नष्ट होत आहे.

बॉक्स

नुकसान भरपाई नको, बंदोबस्त करा

शेतकरी उसनवारी व कर्ज काढून शेतीवर मोठया प्रमाणात दरवर्षी खर्च करीत असतात. मात्र वन्यप्राणी पिकांचे नुकसान करीत असल्याने शेतकºयांना त्याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. नुकसान भरपाई म्हणून शासन शेतकºयांना नाममात्र भरपाई देऊन मोकळे होतात. नुकसान लाखाचे आणि मदत हजारात अशी बिकट अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे आम्हाला मदत नको वन्यप्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, असा केविलवाणा सूर शेतकरीवर्गात उमटायला लागला आहे.