शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
4
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
5
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
6
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
7
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
8
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
9
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
10
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
11
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
12
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
13
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
14
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
15
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
16
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
17
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
18
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
19
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
20
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!

पुरूषांविरूध्द कायदा एवढा कठोर का ?

By admin | Updated: November 19, 2015 01:13 IST

१९ नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरूष हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. स्त्री-पुरूष समानतेच्या या काळात हुंडाबळी ठरलेल्या.....

घोडपेठ : १९ नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरूष हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. स्त्री-पुरूष समानतेच्या या काळात हुंडाबळी ठरलेल्या स्त्रियांसाठी ४९८-अ हा कायदा वरदान ठरत असला तरी बऱ्याच घटनांमध्ये या कायद्याचा वापर स्त्रिया स्वत:च्या स्वार्थासाठी करीत असल्याचा आरोप भारतीय परिवार बचाव संघटना चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष डॉ. नंदकिशोर मैंदळकर यांनी केला आहे.भारतीय संस्कृती ही पुरूषप्रधान संस्कृती आहे. पुरूषांकडून स्त्रीवर अत्याचार होत असल्याची चर्चा नेहमीच ऐकायला मिळते. लग्नातील हुंडा हे बहुतेक वेळा कारण असते. हुंडा देणे व घेणे दोन्ही चुकीचे आहे. या वाईट प्रवृत्तीवर अंकुश बसावा म्हणून सरकारने हुंडाबळी विरोधात ४९८-अ हा कायदा निर्माण केला. १९८० मध्ये हा कायदा लागू करण्यात आला. सोबतच पत्नीच्या शारिरीक, मानसिक व लैंगीक छळाच्या घटनांना आळा बसावा म्हणून २००५ मध्ये कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा करण्यात आला. २००६ पासून याची अंमलबजावणी करण्यात आली.भारतीय परिवार बचाव संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नंदकिशोर मैंदळकर म्हणतात, आम्ही हुंड्याचे समर्थन करीत नाही. तसेच प्रत्येकच स्त्री या कायद्याचा आपल्या स्वार्थासाठी वापर करते असेही आमचे म्हणणे नाही. स्त्रीवर जेव्हा अन्याय होतो तेव्हा ती रडून आपले म्हणणे खरे करते. मात्र, हुंडाबळीमधील खोट्या प्रकरणांमध्ये आपली व परिवाराची बदनामी होईल, या भितीपोटी पुरूष समोर येत नाहीत.पत्नीने तक्रार केल्याबरोबर लगेच पोलीस येवून पतीला व ज्यांची नावे प्रकरणामध्ये गोवल्या गेली आहेत, त्यांना अटक करून घेवून जातात. त्यांना आपले म्हणणेही मांडण्याची मुभा नसते. बऱ्याच वेळा पत्नीचे दुसऱ्या सोबत संबंध, संपत्तीचा हिस्सा किंवा अन्य कारणांसाठी खोटी तक्रार दाखल करण्यात येते. सर्वोच्च न्यायालयानेही अशा खोट्या तक्रारींसंबंधात या कायद्याला दहशतवादी कायदा असे म्हटले आहे. या कायद्यानुसार पत्नी स्वत:च्या इच्छेनुसार पतीच्या वृध्द आई-वडिलांपासून, गरोदर स्त्रिया तसेच इतर नातेवाईकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभी करते, अशी अनेक उदाहरणे आहेत. (वार्ताहर)जागतिक पुरूष हक्क दिन विशेषमहिलांकडून कायद्याचा होतेय गैरवापर४९८-अ या कायद्याचा गैरवापर करून पुरूषांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र, समाजामध्ये बेअब्रु होईल या अवास्तव भितीपोटी पुरूष यांसारख्या खोट्या घटनांमध्ये बळी पडतात. पत्नीने तक्रार दाखल केल्याबरोबर अटक होते व परिणामी समाजाचा त्या व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. ही परिस्थिती बदलविण्यासाठी ४९८-अ सारखाच ४९८-ब हा पुरूषांच्या बाजूने असा कायदा तयार करण्यात यावा यासाठी मागील कित्येक वर्षांपासून संघटनेचा लढा सुरू आहे. तसेच स्त्री आयोगाच्या धर्तीवर राष्ट्रीय पुरूष आयोग स्थापन करण्यात यावा. ज्यामध्ये पुरूषांनाही आपले म्हणणे मांडता येईल, यासाठीही भारतीय परिवार बचाव संघटनेचे प्रयत्न सुरू आहेत.