शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

नवानगर गावात विजेचा प्रकाश पडणार कधी?

By admin | Updated: January 19, 2016 00:38 IST

जग २१ व्या शतकाकडे झेपावला आहे. या काळात वीज ही प्रत्येकांची आवश्यक गरज झाली आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष : पिण्याच्या पाण्याची समस्या, मुलांसाठी अंगणवाडी केंद्रही नाहीघनश्याम नवघडे नागभीड जग २१ व्या शतकाकडे झेपावला आहे. या काळात वीज ही प्रत्येकांची आवश्यक गरज झाली आहे. असे असले तरी नागभीड तालुक्यात असे एक गाव आहे की, त्या गावाने वीज कधी पाहिलीच नाही. एवढेच नाही तर अन्य सुविधांपासूनही हे गाव वंचित आहे.नागभीड तालुक्यातील गिरगाव ग्रामपंचायतीअंतर्गत हे गाव असून नवानगर असे गावाचे नाव आहे. या गावात जवळपास ३५ घरे आणि १२५ ते १५० एवढी लोकसंख्या आहे. गिरगावपासून १ किमी अंतरावर हे गाव आहे. नागभीड तालुक्यात जी काही पुढारलेली आणि प्रगतशिल मोजकी गावे आहेत, त्या प्रमुख गावात गिरगावचा समावेश होतो. त्या गिरगावने या नवानगरला विकास प्रक्रियेपासून आतापर्यंत कसे काय दूर ठेवले, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार विजेप्रमाणेच गावात अन्य कोणत्याही मूलभूत सुविधा नाहीत. गावात रस्ते नाहीत, नाल्या नाहीत. शाळा तर नाहीच नाही. पण अंगणवाडीचे केंद्रही नाही. गावात १ ते ६ वयोगटातील १० मुले असली तरी अंगणवाडीच्या सुविधा त्यांना कशा मिळतात, हा एक प्रश्नच आहे. मधुकर मेश्राम, टिकाराम सहारे आणि राजू वाघाळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, गावात पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नाही. गावात एक बोअर आहे, पण तिचे पाणी पिण्यास अयोग्य आहे. त्यामुळे शेतातील विहीरीचाच पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग करावा लागत आहे. नवनगरच्या लोकांना विद्युत देण्यासंदर्भात गिरगाव ग्रामपंचायतीने २०१३ मध्ये एक ठराव घेतला. पण या ठरावापलीकडे कोणतीच हालचाल झाली नाही. या गावात कोणाच्याही घरी विद्युत नसल्यामुळे घरात टीव्ही, पंखा असल्याचा प्रश्नच नाही. विद्युत मिळावी म्हणून आता या गावातील २२ लोकांनी वीज कंपनीकडे अर्ज केले आहेत. त्यामुळे वीज कंपनी येथील नागरिकांना किती हेलपाटे मारायला लावणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. याकडे प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी आहे.