शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

रेशनवरील मोफत धान्य गावांमध्ये कधी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:36 IST

चंद्रपूर : अन्न सुरक्षा योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दर महिन्याला दोन किलो तांदूळ व तीन किलो गहू असे पाच किलो ...

चंद्रपूर : अन्न सुरक्षा योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दर महिन्याला दोन किलो तांदूळ व तीन किलो गहू असे पाच किलो मोफत धान्य देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. दरम्यान, या धान्याचे काही प्रमाणात वाटप रेशन दुकानांपर्यंत पोहोचले आहे. मात्र, अद्यापही अनेक गावांमध्ये या मोफत धान्याचे वाटप सुरु करण्यात आलेले नाही. त्यामुळे गरजूंना अडचण निर्माण होत आहे.

कोरोनाची रुग्णसंख्या वाढतच असल्याने राज्य शासनाने लॉकडाऊन सुरु केले आहे. त्यामुळे सर्व व्यवसाय ठप्प आहेत. अनेकांचे रोजगार गेल्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मजूर व कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. लॉकडाऊनमुळे त्यांची रोजीरोटी बुडाली आहे. दरम्यान, राज्य शासनाने मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यातील ---- लाभार्थ्यांना या योजनेंतर्गत धान्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. या निर्णयाचे सर्वच स्तरावर स्वागत करण्यात आले. परंतु, ही घोषणा करुन दोन आठवड्यांपेक्षा अधिकचा कालावधी होत आहे. परंतु, अद्यापही धान्य वाटपासंदर्भात प्रत्यक्षात कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे गरजू लाभार्थ्यांना या योजनेच्या लाभाची प्रतीक्षा लागून आहे.

बॉक्स

मोफत धान्य काय मिळणार

रेशन दुकानावर अंत्योदय अन्य योजनेतील लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ तर प्राधान्य कुटुंब योजना गटातील लाभार्थ्यांना २ किलो गहू व २ किलो तांदूळ मिळणार आहे.

बॉक्स

लॉकडाऊनमुळे रोजीरोटी बंद झाली. शासनाकडून मोफत धान्य मिळण्याची अपेक्षा होती. परंतु, अद्यापही शासनाकडून कुठल्याही प्रकारचे धान्य तसेच मदत मिळालेली नाही. त्यामुळे कुटुंब चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे.

--मजूर

------

घराबाहेर पडणाऱ्यांवर शासनाने निर्बंध घातले आहेत, कामही बंद आहे. घराबाहेर पडले तर कोरोनाने मरण्याची आणि घरी राहिले तर उपाशी मरण्याची वेळ आहे. त्यामुळे शासनाने त्वरित धान्याचे वितरण करावे तसेच इतर मदतसुद्धा करावी.

--कामगार

------

लॉकडाऊन करताना मोठी घोषणा करत लॉकडाऊन केले. मात्र, अद्यापही कोणत्याही प्रकारचे धान्य उपलब्ध करुन दिले नाही. रेशन दुकानातील तेल व साखरही बंद केली आहे. लॉकडाऊनचा फायदा घेत व्यापारी चढ्या दराने वस्तूची विक्री करत आहेत.

- मजूर

------

कोट

काही ठिकाणी धान्याचे वाटप सुरु आहे. काही लाभार्थ्यांना एप्रिलमध्ये मोफत धान्य देण्यात आले. तर उर्वरित लाभार्थ्यांना मे महिन्यात मोफत धान्य देण्यात येणार आहे.

- जनार्धन लोंढे, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी, चंद्रपूर