शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

रेतीघाटांचे लिलाव केव्हा होणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 22:30 IST

जिल्ह्यातील अनेक रेतीघाटाचा लिलाव गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे रेतीचा पुरवठा सामान्य नागरिकांसह शासकीय कामाकरिता होत नसल्याचे चित्र सर्वत्र आहे. त्यामुळे नागरपरिषद, नगरपंचायतीसह ग्रामपंचायतीच्या अनेक विकासकामांची अंदाजपत्रके सध्या धूळ खात पडलेली दिसत आहे.

ठळक मुद्देअंदाजपत्रकेही धूळ खात: विकासकामे करायची कशी?

लोकमत न्यूज नेटवर्कनांदाफाटा : जिल्ह्यातील अनेक रेतीघाटाचा लिलाव गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे रेतीचा पुरवठा सामान्य नागरिकांसह शासकीय कामाकरिता होत नसल्याचे चित्र सर्वत्र आहे. त्यामुळे नागरपरिषद, नगरपंचायतीसह ग्रामपंचायतीच्या अनेक विकासकामांची अंदाजपत्रके सध्या धूळ खात पडलेली दिसत आहे.बांधकामासाठी अत्यंत आवश्यक असणारी रेती मिळत नसल्याने कामे करण्यास कंत्राटदारही पाठ फिरवत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात वैनगंगा नदीलगतच असलेल्या राजुरा, कोरपना, बल्लारशाह तालुक्यात अनेक मोठी रेतीघाटे आहेत. सदर घाटावरुन नेहमीच रेतीचा पुरवठा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होतो. यातच यावर्षी पावसाच्या पुराने सदर रेतीघाटांवर रेतीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात दिसत आहे. परंतु न्यायालयीन प्रक्रियेतून रेतीघाटांचा लिलाव बंद पडला असून आज ना उद्या येईल, या प्रतीक्षेत ग्राहक दिसत आहे.याचाच फायदा घेत आता रेती तस्करीला उधाण आले आहे. अनेक रेती तस्कर रात्रीच्या सुमारास ट्रॅक्टरद्वारे रेतीची वाहतूक मोठ्या प्रमाणात करीत आहे. याबाबत अनेकदा स्थानिक तहसीलदारांकडून कारवाई झाली खरी. परंतु छुप्या मार्गाने सदर अवैध वाहतूक सुरुच आहे. अनेक ग्रामपंचायती तसेच नगर परिषदांना लाखो रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. कामाचे आराखडे तयार असून प्रलंबित अंदाजपत्रकेसुद्धा प्राप्त झाली. मात्र कामाच्या तोंडावर रेतीचे ग्रहण विकास कामांना लागत असल्याची बाब आता सर्वत्र सुरु आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन व नेते कमालीचे त्रस्त आहे. रेतीघाट लिलावाची प्रक्रिया न्यायप्रविष्ठ असल्याने विलंब लागणार आहे.विकासकामात अडचणीग्रामपंचायतीमार्फत कामे करताना अनेक ग्रामपंचायती नजिकच्या रेतीघाटावरुन काळी रेती आणून कामे करीत आहे. मात्र रेतीघाटाची परवानगी नलस्याने तक्रारीही मोठ्या प्रमाणात येत आहे. एकीकडे गावात कामे होत नसल्याची जनतेची बोंब असताना दुसरीकडे रेतीच मिळत नसल्याने कामे करायची तरी कशी, असा प्रश्न निर्माण होत आहे.