शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' माशांना वाचवण्यासाठी बांगलादेशनं उतरवलं सैन्य दल; बंगालच्या खाडीत पाठवल्या १७ युद्धनौका
2
‘कोस्टल’वर थेट १४० चा हायस्पीड: ...तर मग गुन्हाच होईल दाखल; वाहतूक पोलिसांकडून दिवसाला ५०० ई-चालानची कारवाई
3
FD करुन तुम्ही कधीही श्रीमंत होणार नाही? CA ने दिला इशारा, म्हणाले खऱ्या कमाईसाठी गुंतवणूक धोरण बदला
4
Video - अरे बापरे! ऑर्डर केला iPhone 16; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत अजब भानगड
5
Tata Capital IPO: प्रतीक्षा संपली! तुमच्या खिशात आहेत का १४,९९६ रुपये? तर बनू शकता टाटांच्या कंपनीचे प्रॉफिट पार्टनर
6
इवलीशी मुंबई झाली महाकाय ! त्या त्या भागानुसार प्रति स्क्वेअर फुटाचा दर काय... पहाल तर...
7
"प्यार मे सौदेबाजी...", अरबाज खान दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर मलायका अरोराची क्रिप्टिक पोस्ट
8
सोनम वांगचुक यांच्या अटकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, पत्नीने दाखल केली याचिका
9
Kantara Chapter 1: साऊथने पुन्हा एकदा करून दाखवलं! फक्त ४ दिवसांत 'कांतारा'ने कमावले ३०० कोटी
10
पतीच्या मृत्यूनंतर पुन्हा जोडीदाराची इच्छा पडली महागात; मॅट्रिमोनियल साइटवरून शिक्षिकेला कोट्यवधींचा गंडा!
11
Post Office Scheme: दर महिन्याला होईल ₹६१,००० ची कमाई; जबरदस्त आहे ही सरकारी स्कीम, कोट्यधीशही बनवेल
12
Jaipur Hospital Fire: जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
13
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २४,९१० च्या वर; सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी
14
Jaipur Hospital Fire: '२० मिनिटांपूर्वी आगीची माहिती दिली, पण डॉक्टर पळून गेले'; SMS रुग्णालयातील प्रत्यक्षदर्शींचा धक्कादायक दावा
15
Video:...तर भारताच्या 'या' खेळाडूला मारायचंय; पाकिस्तानी स्पिनर अबरार अहमदचं विधान चर्चेत
16
पती अन् दोन मुलांना सोडून शेजाऱ्यासोबत सुरू होतं अफेअर; 'ओयो'मध्ये प्रियकर गर्लफ्रेंडसोबत दिसला अन्...
17
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
18
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
19
उत्खनन क्षेत्रात छत्तीसगडची ऐतिहासिक झेप; खनिज महसूल २५ वर्षांत ३४ पटीने वाढला!
20
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा

रेतीघाटांचे लिलाव केव्हा होणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 22:30 IST

जिल्ह्यातील अनेक रेतीघाटाचा लिलाव गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे रेतीचा पुरवठा सामान्य नागरिकांसह शासकीय कामाकरिता होत नसल्याचे चित्र सर्वत्र आहे. त्यामुळे नागरपरिषद, नगरपंचायतीसह ग्रामपंचायतीच्या अनेक विकासकामांची अंदाजपत्रके सध्या धूळ खात पडलेली दिसत आहे.

ठळक मुद्देअंदाजपत्रकेही धूळ खात: विकासकामे करायची कशी?

लोकमत न्यूज नेटवर्कनांदाफाटा : जिल्ह्यातील अनेक रेतीघाटाचा लिलाव गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे रेतीचा पुरवठा सामान्य नागरिकांसह शासकीय कामाकरिता होत नसल्याचे चित्र सर्वत्र आहे. त्यामुळे नागरपरिषद, नगरपंचायतीसह ग्रामपंचायतीच्या अनेक विकासकामांची अंदाजपत्रके सध्या धूळ खात पडलेली दिसत आहे.बांधकामासाठी अत्यंत आवश्यक असणारी रेती मिळत नसल्याने कामे करण्यास कंत्राटदारही पाठ फिरवत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात वैनगंगा नदीलगतच असलेल्या राजुरा, कोरपना, बल्लारशाह तालुक्यात अनेक मोठी रेतीघाटे आहेत. सदर घाटावरुन नेहमीच रेतीचा पुरवठा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होतो. यातच यावर्षी पावसाच्या पुराने सदर रेतीघाटांवर रेतीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात दिसत आहे. परंतु न्यायालयीन प्रक्रियेतून रेतीघाटांचा लिलाव बंद पडला असून आज ना उद्या येईल, या प्रतीक्षेत ग्राहक दिसत आहे.याचाच फायदा घेत आता रेती तस्करीला उधाण आले आहे. अनेक रेती तस्कर रात्रीच्या सुमारास ट्रॅक्टरद्वारे रेतीची वाहतूक मोठ्या प्रमाणात करीत आहे. याबाबत अनेकदा स्थानिक तहसीलदारांकडून कारवाई झाली खरी. परंतु छुप्या मार्गाने सदर अवैध वाहतूक सुरुच आहे. अनेक ग्रामपंचायती तसेच नगर परिषदांना लाखो रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. कामाचे आराखडे तयार असून प्रलंबित अंदाजपत्रकेसुद्धा प्राप्त झाली. मात्र कामाच्या तोंडावर रेतीचे ग्रहण विकास कामांना लागत असल्याची बाब आता सर्वत्र सुरु आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन व नेते कमालीचे त्रस्त आहे. रेतीघाट लिलावाची प्रक्रिया न्यायप्रविष्ठ असल्याने विलंब लागणार आहे.विकासकामात अडचणीग्रामपंचायतीमार्फत कामे करताना अनेक ग्रामपंचायती नजिकच्या रेतीघाटावरुन काळी रेती आणून कामे करीत आहे. मात्र रेतीघाटाची परवानगी नलस्याने तक्रारीही मोठ्या प्रमाणात येत आहे. एकीकडे गावात कामे होत नसल्याची जनतेची बोंब असताना दुसरीकडे रेतीच मिळत नसल्याने कामे करायची तरी कशी, असा प्रश्न निर्माण होत आहे.