शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रेतीघाटांचे लिलाव केव्हा होणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 22:30 IST

जिल्ह्यातील अनेक रेतीघाटाचा लिलाव गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे रेतीचा पुरवठा सामान्य नागरिकांसह शासकीय कामाकरिता होत नसल्याचे चित्र सर्वत्र आहे. त्यामुळे नागरपरिषद, नगरपंचायतीसह ग्रामपंचायतीच्या अनेक विकासकामांची अंदाजपत्रके सध्या धूळ खात पडलेली दिसत आहे.

ठळक मुद्देअंदाजपत्रकेही धूळ खात: विकासकामे करायची कशी?

लोकमत न्यूज नेटवर्कनांदाफाटा : जिल्ह्यातील अनेक रेतीघाटाचा लिलाव गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे रेतीचा पुरवठा सामान्य नागरिकांसह शासकीय कामाकरिता होत नसल्याचे चित्र सर्वत्र आहे. त्यामुळे नागरपरिषद, नगरपंचायतीसह ग्रामपंचायतीच्या अनेक विकासकामांची अंदाजपत्रके सध्या धूळ खात पडलेली दिसत आहे.बांधकामासाठी अत्यंत आवश्यक असणारी रेती मिळत नसल्याने कामे करण्यास कंत्राटदारही पाठ फिरवत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात वैनगंगा नदीलगतच असलेल्या राजुरा, कोरपना, बल्लारशाह तालुक्यात अनेक मोठी रेतीघाटे आहेत. सदर घाटावरुन नेहमीच रेतीचा पुरवठा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होतो. यातच यावर्षी पावसाच्या पुराने सदर रेतीघाटांवर रेतीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात दिसत आहे. परंतु न्यायालयीन प्रक्रियेतून रेतीघाटांचा लिलाव बंद पडला असून आज ना उद्या येईल, या प्रतीक्षेत ग्राहक दिसत आहे.याचाच फायदा घेत आता रेती तस्करीला उधाण आले आहे. अनेक रेती तस्कर रात्रीच्या सुमारास ट्रॅक्टरद्वारे रेतीची वाहतूक मोठ्या प्रमाणात करीत आहे. याबाबत अनेकदा स्थानिक तहसीलदारांकडून कारवाई झाली खरी. परंतु छुप्या मार्गाने सदर अवैध वाहतूक सुरुच आहे. अनेक ग्रामपंचायती तसेच नगर परिषदांना लाखो रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. कामाचे आराखडे तयार असून प्रलंबित अंदाजपत्रकेसुद्धा प्राप्त झाली. मात्र कामाच्या तोंडावर रेतीचे ग्रहण विकास कामांना लागत असल्याची बाब आता सर्वत्र सुरु आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन व नेते कमालीचे त्रस्त आहे. रेतीघाट लिलावाची प्रक्रिया न्यायप्रविष्ठ असल्याने विलंब लागणार आहे.विकासकामात अडचणीग्रामपंचायतीमार्फत कामे करताना अनेक ग्रामपंचायती नजिकच्या रेतीघाटावरुन काळी रेती आणून कामे करीत आहे. मात्र रेतीघाटाची परवानगी नलस्याने तक्रारीही मोठ्या प्रमाणात येत आहे. एकीकडे गावात कामे होत नसल्याची जनतेची बोंब असताना दुसरीकडे रेतीच मिळत नसल्याने कामे करायची तरी कशी, असा प्रश्न निर्माण होत आहे.