शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
2
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
3
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
4
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
5
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
6
Operation Sindoor Live Updates: थोड्याच वेळात परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद; पहाटे ५:४५ वाजता ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती देणार
7
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
9
आयपीएल आठवडाभर स्थगित; बीसीसीआय : राष्ट्रहित सर्वांत महत्त्वाचे, नवे वेळापत्रक योग्य वेळी देणार
10
‘हॅलो, मुरली तुमचा कोण? अन् आईला भोवळ; शहीद नाईक यांचा ‘तो’ व्हिडीओ कॉल अखेरचा
11
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
12
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
13
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
14
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
15
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
16
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
17
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
18
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
19
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
20
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा

आमचे काय चुकले? हळदावासीयांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2017 00:38 IST

मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्षाची ठिणगी अखेर टोकाला पोहोचून होत्याचे नव्हते झाले, असे हळदा गावात घडले आहे.

भीतीने अर्ध्या गावाचे पलायन : वाघाच्या बंदोबस्तासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरूचरवी रणदिवे । लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्षाची ठिणगी अखेर टोकाला पोहोचून होत्याचे नव्हते झाले, असे हळदा गावात घडले आहे. वाघाच्या बंदोबस्ताची मागणी एवढे उग्ररुप धारण करेल याची कुणालाही कल्पना नव्हती. कोणीतरी उचकवून हे कृत्य करण्यास भाग पाडले, हा फक्त त्यांचा गुन्हा. या गुन्ह्यातील खरे करते-सरते मात्र बाजूला राहिले व शिक्षा, भीती मात्र सामान्यांना सोसावी लागत आहे. तेव्हा आमचे काय चुकले? असा सवाल सध्या हळदावासीयांना पडला आहे. घटनेचे गांभीर्य वनविभागाच्या लक्षात आणून देऊनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केले. सध्या शेतीच्या हंगामाला सुरुवात झाली आहे आणि शेतावर जाण्यासाठी वाघाची भीती कायम आहे. अशावेळेस आम्ही काय करावे, असा प्रश्नही सध्या गावकऱ्यांसमोर उभा आहे. दररोज या परिसरात कुठे कुठे गाय, शेळी, बैल अथवा मनुष्यावर वाघाने हल्ला केल्याच्या घटना घडत आहेत. तेव्हा या गंभीर बाबीकडे वनविभागाने दुर्लक्ष का केले? किमान यावर तोडगा काढून गावकऱ्यांना फक्त दिलासा देण्याचा प्रयत्न तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून का करण्यात आला नाही, असा सवालही याप्रसंगी निर्माण होत आहे. वाघाच्या दहशतीने केवळ हळदा परिसरच नव्हे, तर तालुक्यातील ग्रामीण भागही भयभीत झाला आहे. तेव्हा ग्रामीण भागातील लोकांनी जगायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे. पण वनविभाग याचे उत्तर शोधण्याच्या भूमिकेत नापास झाला आहे. बुधवारी घडलेली हल्ल्याची घटना आणि रस्ता रोको आंदोलनाने गावात गावकरी दिसेनासे झाले आहे. अर्धा गाव पोलीस ठाण्यामध्ये तर अर्ध्या गावाने भीतीने गावाबाहेर पलायन केल्याचे दिसून येत आहे. पोलिसांची गाडी फोडणे, वनविभागाच्या गाडीला पेटविण्याचा प्रयत्न करणे, हे केवळ पाच टक्के लोकांचेच कामे होते. पण या गुन्ह्यात ९५ टक्के ग्रामस्थ भरडले जात आहेत. त्यामुळे महिला, बालके, वयोवृद्ध नागरिक यांना आमचे काय चुकले या प्रश्नाने सध्या अस्वस्थ केले आहेत. वाघ एक आहे. पण अनेक लोकांना निरुत्तर केले असल्याने खरीप हंगामावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. वाघाचे अस्तित्व पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे असले तरी किंबहूना मानवाच्या अस्तित्वालाही धोका होऊ नये, याची खबरदारी वनविभागाने खरच घेतली होती काय? हा प्रश्न स्वत: निरखून पाहण्याची वेळ या घटनेने वनविभागासमोर आहे. बहुतांश गावातील लोक हातावर आणून पानावर खाणारे आहेत. त्यांचा तरी विचार या कृतीने सुटणार काय? हाही प्रश्न समोर आवासून उभा आहे. वनविभागाचे अधिकारी नागरिकांचा सामना करीत आहेत. पण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र मूग गिळून चुप्पी साधली असल्याने अशा प्रकाराच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी वेळीच उपाययोजना करणे आता गरजेचे आहे.