शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

स्टॉक नसल्याने १ मेपासून कोरोना लसीकरणाचे काय होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:30 IST

जिल्ह्यात ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. १ एप्रिलपासून जिल्ह्यात २०० केंद्रे सुरू करण्यात आली. मात्र, ...

जिल्ह्यात ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. १ एप्रिलपासून जिल्ह्यात २०० केंद्रे सुरू करण्यात आली. मात्र, जिल्ह्यासाठी पुरेसे डोस येत नसल्याने ६० वर्षांवरील व सहव्याधींसह ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीसाठी ताटकळत राहावे लागत आहे. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी दुसरा बुस्टर घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे हा डोस चुकू नये, यासाठी सकाळी आठ वाजतापासूनच रांगा लावणे सुरू झाले. मात्र, प्रत्येक केंद्राला सुमारे १०० ते १५० लस मिळत असल्याने काहींना रांगेत राहूनही परत जावे लागत आहे.

जिल्ह्यासाठी एक लाख डोस मागविले जात आहेत. मात्र, आजपर्यंत मागणीनुसार कधीच डोस मिळाले नाहीत. त्यामुळे केंद्रांची संख्या वाढवूनही आठवड्यातून पाच दिवस बंद ठेवावे लागत आहे.

जिल्ह्यातील पॉझिटिव्ह संख्या व संसर्गाचा वेग आदी बाबींचा विचार करून डोस मंजूर केले पाहिजेत. परंतु, राज्यांना डोस देण्याचे निकष केंद्र सरकारने तयारच केले नाहीत.

बुस्टर डोस घेणाऱ्यांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. पहिला डोस घेणाऱ्यांना दोन दिवसांनंतर येण्याची सूचना देता येऊ शकते. मात्र, बुस्टर घेणाऱ्यांबाबत हे शक्य नाही.

असे आहे १ मेनंतरचे नियोजन

६० वर्षांपुढील २२४२९६, ४५ ते ६० वर्षे ४४८५८६, २५ ते ४४ वर्षांतील ६८४२९६ आणि १८ ते २४ वयोगटातील २८४८५२ असे एकूण १६ लाख ४१ हजार ८२९ नागरिकांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले. यासाठी सुमारे ३५० केंद्रे निश्चित करून कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

चंद्रपूर मनपा क्षेत्रात सुमारे २ लाख ६२ हजार पात्र नागरिकांना लस देण्यात येणार आहे. याकरिता प्रत्येक प्रभागात वाढीव केंद्र उभारण्यात येईल. १ मेपासून ३५ केंद्रे सुरू करण्याचे नियोजन मनपाने तयार ठेवले आहे.

अडचणींवर मात करण्याची प्रशासनाची तयारी

पुरेसे डोस मिळत नसल्याने काही नागरिकांना दुसऱ्या दिवशी केंद्रात यावे लागत आहे. १ मार्चपासून असे प्रकार घडू नयेत, यासाठी प्राधान्य गटाकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. लस कमी मिळाले तरी नोंदणी केलेल्या नागरिकांना सहजपणे डोस मिळेल, यादृष्टीने तयारी सुरू असल्याचा दावा जिल्हा आरोग्य प्रशासनाने केला आहे.