शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची भूमिका; भाजपामुळे होतेय एकनाथ शिंदेंची कोंडी?
2
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
3
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
4
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
7
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
8
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार
9
Jagannath Yatra 2025: जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!
10
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
11
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
12
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
13
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
14
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
15
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
16
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
17
Jagannath Rath Yatra 2025: जगन्नाथाच्या मूर्तीला डोळे, नाक आणि ओठ एवढेच अवयव का? त्यामागे आहे रहस्यमय कथा!
18
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
19
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द

नरकयातना सोसताना झालेल्या त्या जखमांचे काय?

By admin | Updated: July 27, 2015 02:59 IST

आयुष्य जगताना चुकीच्या वाटेनं पावलं पडलीत आणि ही वाट थेट बदनाम वस्तीत घेऊन गेली. दलाल आणि ग्राहकांकडून

कुंटणखान्यात शुकशुकाट : कारवाईनंतरही यातनातून मुक्ती नाहीरुपेश कोकावार ल्ल बाबुपेठ (चंद्रपूर) आयुष्य जगताना चुकीच्या वाटेनं पावलं पडलीत आणि ही वाट थेट बदनाम वस्तीत घेऊन गेली. दलाल आणि ग्राहकांकडून होणारं शोषण मुकपणे गिळत जगणारे कोवळे जीव पोलिसांच्या कारवाईनंतर काही काळापुरते मुक्त होतात खरे, पण देहविक्रीच्या व्यवसायात सोसलेल्या नरक यातनांचा हिशेब कोण चुकविणार, काळजावर भळभळणाऱ्या त्या जखमांचे काय, असे अनेक प्रश्न अनुत्तरीत राहतात.हैद्राबाद-तेलंगाणा पोलिसांनी येथील गौतमनगरातील देहविक्री करणाऱ्यांच्या वस्तीत धाड टाकली. या धाडीनंतर या कुंटनखान्यात सध्या शुकशुकाट पसरला आहे. पूर्व अनुभव लक्षात घेता, येत्या काही दिवसांतच या परिसर पुन्हा एकदा ग्राहकांच्या गर्दीने फुलून येणार आहे. पुन्हा नव्या मुलींना या कुंटनखान्यात आणल्या जाणार आहे. असे वर्षानुवर्षे सुरू आहे. परंतु हा कुंटनखानाच बंद व्हावा, यासाठी कोणत्याही उपाययोजना आजवर करण्यात आल्या नाहीत. मग हा कारवाईचा फार्स कशासाठी? असा प्रश्न सुज्ञ नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पूर्वी गौतमनगर परिसरात देहविक्री करणाऱ्या महिलांच्या दोन-तीन झोपड्या होत्या. आज गौतमनगर परिसरात ६० झोपड्या उभ्या आहेत. यात दिवसरात्रं व्यवसाय केल्या जात आहे. या कुंटखान्यात काही महिला व मुली स्वेच्छेने देहविक्री करीत होत्या. मात्र मागील काही वर्षांत जादा पैसे कमविण्यासाठी येथे कोवळ्या मुलींना या व्यवसायात जबरीने गोवल्या जात असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. या व्यवसायात गोवल्या जाणाऱ्या मुलींना घरकामाचे तसेच चांगली नोकरी लावून देण्याचे आमिष दाखऊन चंद्रपुरात आणल्या जाते आणी नंतर जबरीने तिच्याकडून देहविक्रिचा व्यवसाय करुन घेतल्या जात असल्याचे सत्यही समोर आले आहे. मागील काही वर्षात या वस्तीवर तेंलगाणा पोलिसांनी (पूर्वीचे आंध्र पोलीस) टाकलेली ही चौथी धाड आहे. या अगोदर ही या वस्तीवर ३ वेळा धाडी घालण्यात आल्या आहेत. चारही वेळी धाड टाकून पोलिसांनी या व्यवसायात गुंतलेल्या मुलींना आंध्रात परत नेले. मात्र समाजाकडून होणारी हेटाळणी व त्यातून आलेल्या नैराश्यापोटी अंतर्बाह्य उद्ध्वस्त झालेल्या या मुली पुन्हा याच व्यवसायात परत आल्याची अनेक उदाहरणेदेखील आहेत. गंभीर बाब ही की, कारवाईनंतर काही दिवसांतच पुन्हा गौतमनगर परिसरात देहविक्रीचा व्यवसाय सुरू होतो. येथे जुन्या आणि काही नव्या मुलींना आणून व्यवसाय केला जातो. याची कल्पना स्थानिक पोलिसांना असते. मात्र त्या मुली कुठून आल्या, त्यांना कुणी आणले याची साधी चौकशी करण्याचे सौजन्यही पोलीस दाखवत नाहीत. पोलिसांनी जर या वस्तीवर पाळत ठेऊन मुलींची चौकशी केली, तर गंभीर प्रकार उघडकीस येऊन अनेक मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचविता येईल, असे सुज्ञांचे मत आहे. अनेकींची अन्य जिल्ह्यात विक्रीया कुंटणखान्यावर तेलंगाणा पोलिसांनी मोठ्या स्वरूपाच्या कारवाया केल्या, हे विशेष. मात्र या कारवाया दोन ते तीन वर्षातून एकदा केल्या जातात. त्यामुळे जबरीने या व्यवसायात आणलेल्या मुलींना स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी वर्ष-वर्ष वाट पहावी लागते. या काळात अनेक मुलींची येथून अन्य जिल्ह्यात विक्री करण्याचेही प्रकार घडतात. सर्वार्थाने निराधार बनलेल्या या मुलींपुढे कोणताही मार्ग उरत नाही. प्रतिबंधक कारवायांच्या वेळीच पोलिसांना या कुंटणखान्याची होते आठवण अधूनमधून या परिसरात पोलिसांचा वावर दिसून येतो. पोलिसांचा हा वावर मुलींबद्दल माहिती घेण्यासाठी नव्हे तर केवळ वरिष्ठांकडून प्रतिबंधक कारवाईसाठी आलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी असतो. वरिष्ठांकडून प्रतिबंधक कारवाई करण्याचे आदेश मिळाल्यानंतर अशा कारवाया करायच्या कुठे, असा प्रश्न जेव्हा पोलिसांना पडतो, तेव्हा पोलिसांना कुंटनखान्याची आठवण येते आणि मग तेथे जाऊन अशा कारवाया केल्या जातात. सर्वाधिक महिला-मुली आंध्रातीलदेहविक्रीच्या व्यवसायात गुंतविण्यात आलेल्या सर्वाधिक महिला व अल्पवयीन मुली आंध्रप्रदेशातील आहेत. आहे त्यामुळे स्थानिक पोलीस या विषयात गंभीर नाहीत. त्या परप्रांतातील आहेत, आपल्याला काय घेणेदेणे, अशा मानसिकतेतून स्थानिक पोलीस या शोषणाकडे कायम दुर्लक्ष करतात, असे दिसून येते. त्यातून दलालांची हिम्मत वाढून ते आंध्र प्रदेशातील अनेक मुलींना येथे देहविक्रीसाठी आणत आहेत.