शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

एका डॉक्टरवर ४२ गावांचा भार

By admin | Updated: September 3, 2014 23:17 IST

पोंभुर्णा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद ठिकरे यांची चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयामध्ये बदली झाल्याने कार्यरत डॉ. विलास धनगे यांच्यावर तालुक्यातील

देवाडा खुर्द : पोंभुर्णा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद ठिकरे यांची चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयामध्ये बदली झाल्याने कार्यरत डॉ. विलास धनगे यांच्यावर तालुक्यातील ४२ गावांतील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी येऊन पडली आहे. परिणामी ते मानसिक तणावाखाली काम करीत असून त्यामुळे रुग्णसेवेकडे दुर्लक्ष होत आहे. अतिमागास आणि आदिवासीबहुल असलेल्या पोंभुर्णा तालुक्यातील गावागावांत आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली. याठिकाणी तालुक्यातील ४२ गावांतील ३५ हजार रुग्ण आरोग्य सेवेचा लाभ घेतात. या प्राथमिक आरोग्य केंद्रात तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजुर आहेत. त्यांपैकी वैद्यकीय अधिकारी डॉ. ठिकरे यांची नुकतीच चंद्रपूर येथे बदली झाली असून यापूर्वी या ठिकाणी कार्यरत असलेल्या डॉ. सरोज पुल्लकवार यांना मागील वर्षापासून चंद्रपूर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी फिरत्या आरोग्य पथकावर डेप्युटेशनवर ठेवण्यात आले. त्यामुळे डॉ. विलास धनगे यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या ४२ गावांतील नागरिकांच्या आरोग्याची संपूर्ण जबाबदारी येवून पडली आहे. परिणामी त्यांना पोलीस विभागातील आरोपीची वैद्यकीय तपासणी, प्रसुती, रुग्ण तपासणी, रात्रीच्या वेळी आपत्कालीन तपासणी, शवविच्छेदन (पीएम) अशा विविध कामांमुळे डॉ. धनगे यांच्यावर ताण पडत आहे. तालुक्यातील संपूर्ण आरोग्य सेवेचा ताण येत असल्याने त्यांना मानसिक तणावाखाली काम करावे लागत आहे. त्याचा त्रास परिसरातील रुग्णांना होत आहे. रुग्णांना आवश्यक आरोग्य सेवा मिळत नसल्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे. तालुक्यात सध्या अनेक साथीचे आजार सुरू असून पोंभुर्णा येथील वॉर्ड क्रमांक ४ मध्ये डेंग्युसदृश्य आजाराची साथ सुरू झाली आहे. त्यामुळे एकट्या वैद्यकीय अधिकाऱ्याची संबंधित रुग्णांवर उपचार करताना चांगलीच तारांबळ उडत आहे. परिणामी पाहिजे त्या प्रमाणात परिसरातील रुग्णांना उपचार याठिकाणी मिळत नसल्याने अनेक रुग्ण खासगी दवाखान्यात उपचार घेत असल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. आधीच या तालुक्यात कोणताही उद्योग नसल्याने फार मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली असून तरुण वर्ग रिकाम्या हाताला काम मिळत नसल्याने बेरोजगार होवून भटकत आहेत. या तालुक्यात सिंचनाची कुठलीही सोय नसल्याने केवळ निसर्गावर अवलंबून शेती करावी लागत असून परिणामी दरवर्षी धान उत्पादनात कमालिची घट येत असल्याने स्थानिक शेतकरी दारिद्र्याच्या जीवन जगत आहे. अशातच आरोग्यासाठी खर्च कुठून करायचा, या विवंचनेने नागरिक हतबल झाले आहेत. (वार्ताहर)