शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

मजुरांच्या स्थलांतरामुळे आठवडी बाजारावर अवकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:21 IST

राजोली : या परिसरातील शेकडो मजुराचे जत्थे मिळेल त्या वाहनाने नजीकच्या ...

राजोली : या परिसरातील शेकडो मजुराचे जत्थे मिळेल त्या वाहनाने नजीकच्या तेलंगणा आणि आध्रप्रदेश येथे मिरची व कापूस वेचणीच्या कामाकरिता गेले. गावे, पाडे, वस्त्या ओस पडल्या आहेत. यावर्षी प्रथमच शाळकरी मुलामुलीसह कुटुंब घेऊन शेकडो शेतकरी व शेतमजूर कामाच्या शोधात स्थलांतरित झाले. त्यामुळे आठवडी बाजार आणि गावखेड्यातील लहान मोठया व्यवसायावर अवकळा पसरली आहे.

कोरोना संक्रमणाच्या काळात लहान मोठे सर्व व्यवसाय ठप्प पडले होते. त्यामुळे नागरिकाना मोठ्या प्रमाणावर आर्थिक ताण सहन करावा लागला होता. परंतु लवकरच शेती हंगाम सुरू झाला आणि मजुरांना शेतीच्या मशागतीसोबत धान रोवणी ते कापणीपर्यंतची कामे मिळाल्याने गाव खेड्यातील अर्थव्यवस्थेला काहीशी चालना मिळाली होती. परंतु हवामान बदलामुळे धानपिकाच्या उत्पादनात निम्यापेक्षाही अधिक घट झाली. परिणामी रुळावर आलेल्या गावखेड्यातील अर्थव्यवस्थेला पुन्हा ब्रेक लागला.

परिसरात शेतीशिवाय उदरनिर्वाहाचे दुसरे कोणतेही साधन किंवा उद्योग नाही. त्यामुळे या परिसरातील मजुरांना शेतीचा हंगाम संपल्यानंतर नेहमीच कामाच्या शोधार्थ भटकंती करावी लागते.परंतु यावर्षी शेतीने दगा दिल्यामुळे मजूरवर्ग व अल्पभूधारक शेतकरीहीं कामाच्या शोधार्थ आंध्रप्रदेश व तेलंगणात मिरची व कापूस वेचणीकरिता मोठ्या प्रमाणावर ट्रक, ट्रॅव्हलसारख्या वाहनाने स्थलांतरित झाले आहेत. परिणामी परिसरातील सर्वच गावे आता ओस दिसू लागली असून गावखेड्यातील दुकान व किरकोळ व्यवसाय ग्राहकाअभावी बंद पडल्याचे चित्र आहे. तर विविध वस्तुंनी सजलेल्या व नेहमी ग्राहकाच्या गर्दीने फुललेल्या आठवडी बाजारावर अवकळा पसरली आहे .जीवनावश्यक वस्तूच्या खरेदीकरिता गर्दी करणारे ग्राहक बाजारात दिसेनासे झाले असून विक्रेत्यांना ग्राहकाची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे.