शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

कोरोनाविरूद्ध जिल्हाभरात आजपासून ‘विकेंड लॉकडाऊन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:27 IST

‘विकेंड लॉकडाऊन’ कालावधीत विनाकारण फिरणाऱ्यांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची ...

‘विकेंड लॉकडाऊन’ कालावधीत विनाकारण फिरणाऱ्यांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस चिंतेत भर घालणारी ठरत आहे. त्यामुळे कोरोना साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ मोहीम स्वीकारली. या मोहिमेंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी ५ एप्रिल रोजी मार्गदर्शक सूचना जारी केल्या. अंमलबजावणीसाठी चंद्रपूर शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलीस तैनात करण्यात येणार आहेत.

असा असेल ‘विकेंड लॉकडाऊन’

सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत, ५ पेक्षा जास्त व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी एकत्र फिरणे वा जमा होण्यास प्रतिबंध आहे. सोमवार ते शुक्रवार रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत आणि शुक्रवार रात्री ८ ते सोमवार सकाळी ७ वाजतापर्यंत विनाकारण फिरण्यास मनाई आहे.

आजपासून ऑटो रिक्षांवर निर्बंध

ऑटो रिक्षामध्ये चालक अधिक २ प्रवासी, टॅक्सी चारचाकी वाहन - चालक वाहनाच्या प्रवासी क्षमतेच्या ५० टक्के किंवा आरटीओ नियमानुसार सर्व बसण्याच्या जागा असतील इतकेच प्रवासी नेण्यास परवानगी आहे. लसीकरण पूर्ण होईपर्यंत १५ दिवसांसाठी वैध असलेले कोरोना चाचणी प्रमाणपत्र स्वत:जवळ ठेवावे लागणार असल्याने ऑटोचालक अडचणीत येणार आहेत.

खासगी वाहतूक रात्री आठपर्यंतच

खासगी वाहने व बस सेवा सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ वाजतापर्यंत सुरू राहतील. मात्र, अत्यावश्यक सेवा व निकडीच्या वेळी उर्वरित कालावधीसाठी परवानगी आहे. या चालकांनाही लसीकरण किंवा कोरोना निगेटिव्ह रिपोर्टचे प्रमाणपत्र बंधनकारक आहे.

दोन दिवस फक्त घरपोच पार्सल सेवा

हॉटेलच्या आवारातील रेस्टॉरंटवगळता सर्व रेस्टॉरंट बंद राहतील. शनिवार व रविवार सकाळी ७ ते रात्री ८ वाजतापर्यंत फक्त घरपोच पार्सल सेवा सुरू राहील. सेवा देणाऱ्या कामगारांनी लसीकरण व निगेटिव्ह प्रमाणपत्र नसेल तर एक हजार दंड व आस्थापनेवर १० हजारांचा दंड वसूल केला जाणार आहे. रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनाही प्रमाणपत्र अनिवार्य आहे.

ऑक्सिजन ग्राहकांसाठी नवी अट

सर्व औद्योगिक आस्थापनांना आजपासून ऑक्सिजन कच्चा माल म्हणून वापरता येणार नाही. प्राधिकाऱ्याकडून पूर्वपरवानगी आवश्यक आहे. सर्व ऑक्सिजन उत्पादकांना उत्पादनापैकी ८० टक्के ऑक्सिजन साठा हा वैद्यकीय व औषधनिर्माणासाठी राखीव ठेवावा लागणार आहे.

काय बंद काय सुरू राहणार?

रुग्णालये, रोग निदान केंद्र, क्लिनिक्स, औषध दुकाने, वैद्यकीय आणि आरोग्य सेवा. किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, दुध डेअरी, बेकरी, मिठाई खाद्य दुकाने. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, टॅक्सी, ऑटो रिक्षा, माल वाहतूक, शेतीसंबंधित सेवा, वृत्तपत्र आदी आवश्यक सेवा वगळून सर्व दुकाने बंद राहणार आहेत.

बंदोबस्तासाठी २१०० पोलीस तैनात

जिल्ह्यात बंदोबस्तासाठी १६० अधिकारी, दोन हजार १०० पोलीस आणि ३५० गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात येणार आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी दिली.