शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
3
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
4
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
5
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
6
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
7
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
8
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
9
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
10
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
11
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
12
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
13
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
14
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
15
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
16
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
17
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
18
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
19
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
20
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील

वेकोलिच्या माती ढिगाऱ्याने पुराचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 22:59 IST

बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या वेकोलिच्या खाणीचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. कोळसा उत्पादनासाठी वेकोलिने मातीचे ढिगारे नदी व नाल्याच्या अगदी किनाऱ्यावर टाकले आहेत. त्यामुळे नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहास अडथळा निर्माण होवून पावसाळ्यात बल्लारपूर, सास्ती, गोवरी, नांदगाव, मानाटेकडी गावांना पुराचा धोका उद्भवणार आहे.

ठळक मुद्देबल्लारपूर, सास्ती, गोवरीला धोका : शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली येणार

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या वेकोलिच्या खाणीचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. कोळसा उत्पादनासाठी वेकोलिने मातीचे ढिगारे नदी व नाल्याच्या अगदी किनाऱ्यावर टाकले आहेत. त्यामुळे नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहास अडथळा निर्माण होवून पावसाळ्यात बल्लारपूर, सास्ती, गोवरी, नांदगाव, मानाटेकडी गावांना पुराचा धोका उद्भवणार आहे.मागील अनेक वर्षांपासून वेकोलि प्रशासन हे राज्य शासन, जिल्हा प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाची पायमल्ली करीत प्रदूषणाने नागरिकांचे आयुष्यच कमी केले आहे. बल्लारपूर शहराला लागून असलेल्या वर्धा नदीवर गोवरी, सास्ती, पोवनी या भागातील नाल्याच्या किनारी ओव्हरबर्डन उभे केले आहे. यामुळे पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाला बाधा निर्माण होवून काही ठिकाणी प्रवाह वळता केला आहे. यामुळे पावसाच्या दिवसात मातीच्या ढिगाºयामुळे पाण्याचा प्रवाह अडून अनेकदा या परिसरातील गावांना बॅक वॉटरचा फटका बसते. यामुळे क्षणार्धात पूरपरिस्थिती निर्माण होवून नागरिकांना भयावह संकटाचा सामना करावा लागतो.पुरामुळे अनेक संसार उघड्यावर येत असल्याने दरवर्षी प्रकल्पग्रस्त गावकरी उघड्या डोळ्यांनी बघत असतात. मागील आठवड्यात आलेल्या एका पावसाने या भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. वेकोलिने नैसर्गिक जीवंत नाले आपल्या सोयीनुसार वळविल्याने पावसाळ्यात पाणी गोवरी, सास्ती, पोवणी गावाच्या दिशेने लवकर फेकल्या जाते. त्यामुळे शेकडो हेक्टर शेती क्षणार्धात पाण्याखाली येवून शेतपिकांचे प्रचंड नुकसान होते. त्याचा फटका बल्लारपूर शहरालाही व शेतपिकांना बसतो.नदी व नाल्याच्या काठावर असलेले ओव्हरबर्डन हटविणे व संरक्षक भिंत बांधणे, यावर जिल्हा प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांमध्ये चर्चा झाली होती. वेकोलिला ओव्हरबर्डन हटविण्याचे निर्देशही देण्यात आले होते. मात्र दिवसेंदिवस महाकाय ढिगारे कायम असून त्यात वाढच होत आहे. निरीच्या चमूने वेकोलिच्या ढिगाºयामुळे पुरस्थिती व प्रदूषण होत असल्याचा अहवाल दिला होता. त्यानंतर बल्लारपूर क्षेत्रातील नदीचा गाळ उपसा करून काठावरील ढिगारे हटविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र पावसाळा तोंडावर आला तरीही वेकोलिने मातीचे ढिगारे जैसे थे ठेवल्याने बल्लारपूर क्षेत्रातील गावांना पूराचा धोका कायम आहे.