शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

वेकोलिच्या माती ढिगाऱ्याने पुराचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 22:59 IST

बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या वेकोलिच्या खाणीचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. कोळसा उत्पादनासाठी वेकोलिने मातीचे ढिगारे नदी व नाल्याच्या अगदी किनाऱ्यावर टाकले आहेत. त्यामुळे नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहास अडथळा निर्माण होवून पावसाळ्यात बल्लारपूर, सास्ती, गोवरी, नांदगाव, मानाटेकडी गावांना पुराचा धोका उद्भवणार आहे.

ठळक मुद्देबल्लारपूर, सास्ती, गोवरीला धोका : शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली येणार

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या वेकोलिच्या खाणीचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. कोळसा उत्पादनासाठी वेकोलिने मातीचे ढिगारे नदी व नाल्याच्या अगदी किनाऱ्यावर टाकले आहेत. त्यामुळे नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहास अडथळा निर्माण होवून पावसाळ्यात बल्लारपूर, सास्ती, गोवरी, नांदगाव, मानाटेकडी गावांना पुराचा धोका उद्भवणार आहे.मागील अनेक वर्षांपासून वेकोलि प्रशासन हे राज्य शासन, जिल्हा प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाची पायमल्ली करीत प्रदूषणाने नागरिकांचे आयुष्यच कमी केले आहे. बल्लारपूर शहराला लागून असलेल्या वर्धा नदीवर गोवरी, सास्ती, पोवनी या भागातील नाल्याच्या किनारी ओव्हरबर्डन उभे केले आहे. यामुळे पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाला बाधा निर्माण होवून काही ठिकाणी प्रवाह वळता केला आहे. यामुळे पावसाच्या दिवसात मातीच्या ढिगाºयामुळे पाण्याचा प्रवाह अडून अनेकदा या परिसरातील गावांना बॅक वॉटरचा फटका बसते. यामुळे क्षणार्धात पूरपरिस्थिती निर्माण होवून नागरिकांना भयावह संकटाचा सामना करावा लागतो.पुरामुळे अनेक संसार उघड्यावर येत असल्याने दरवर्षी प्रकल्पग्रस्त गावकरी उघड्या डोळ्यांनी बघत असतात. मागील आठवड्यात आलेल्या एका पावसाने या भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. वेकोलिने नैसर्गिक जीवंत नाले आपल्या सोयीनुसार वळविल्याने पावसाळ्यात पाणी गोवरी, सास्ती, पोवणी गावाच्या दिशेने लवकर फेकल्या जाते. त्यामुळे शेकडो हेक्टर शेती क्षणार्धात पाण्याखाली येवून शेतपिकांचे प्रचंड नुकसान होते. त्याचा फटका बल्लारपूर शहरालाही व शेतपिकांना बसतो.नदी व नाल्याच्या काठावर असलेले ओव्हरबर्डन हटविणे व संरक्षक भिंत बांधणे, यावर जिल्हा प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांमध्ये चर्चा झाली होती. वेकोलिला ओव्हरबर्डन हटविण्याचे निर्देशही देण्यात आले होते. मात्र दिवसेंदिवस महाकाय ढिगारे कायम असून त्यात वाढच होत आहे. निरीच्या चमूने वेकोलिच्या ढिगाºयामुळे पुरस्थिती व प्रदूषण होत असल्याचा अहवाल दिला होता. त्यानंतर बल्लारपूर क्षेत्रातील नदीचा गाळ उपसा करून काठावरील ढिगारे हटविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र पावसाळा तोंडावर आला तरीही वेकोलिने मातीचे ढिगारे जैसे थे ठेवल्याने बल्लारपूर क्षेत्रातील गावांना पूराचा धोका कायम आहे.