शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

सणासुदीच्या काळात पथदिवे बंद होण्याच्या मार्गांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:31 IST

विसापूर : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे गावागावातील पथदिवे देयक पूर्वी जिल्हा परिषद भरत होती. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन निश्चिंत ...

विसापूर : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे गावागावातील पथदिवे देयक पूर्वी जिल्हा परिषद भरत होती. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन निश्चिंत होते. आता मात्र वीज वितरण कंपनीने ग्रामपंचायतीवर बडगा उगारला आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात पथदिवे बंद होण्याच्या मार्गांवर आहे.

परिणामी ग्रामपंचायत प्रशासन वीज देयकसंदर्भात अडचणीत आले आहे. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर ग्रामपंचायतीवर तब्बल २ लाख ८६ हजार २०० रुपये पथदिवे देयक थकीत असल्याची बाब उघडकीस आली आहे. यामुळे गावात पथदिव्याअभावी अंधाराचे साम्राज्य निर्माण होण्याची शक्यता आहे. विसापूर ग्रामपंचायत यावर काय मार्ग काढते, याकडे गावाकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

गावात ५८० वीज खांब असून त्यावर पथदिवे लावण्यात आले आहे. गावागावातील पथदिव्याचे देयक यापूर्वी जिल्हा परिषद १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून स्वतः भरणा करीत होती. मात्र आता वीज वितरण कंपनी वीज देयक ग्रामपंचायत कडून वसूल करण्याचा फतवा काढला आहे. यामुळे ग्रामपंचायत चांगलीच अडचणीत आली आहे. विसापूर ग्रामपंचायत हद्दीत पथदिवे लागणारे १० मीटर लागले आहेत. एप्रिल २०२१ ते जुलै २०२१ दरम्यान पथदिवे देयकाचा भरणा करा, म्हणून वीज वितरण कंपनीने ग्रामपंचायतला अल्टिमेटम दिला आहे. थकीत एवढी रक्कम कशी भरावी, या विवंचनेत ग्रामपंचायत आली आहे.

ग्रामपंचायतीने वीज देयकाचा भरणा पूर्वीप्रमाणे जिल्हा परिषदने द्यावा म्हणून राज्य विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख व बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांना भेटून कैफियत मांडली. त्यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना पथदिव्याची वीज कपात करू नका म्हणून सांगितले. मात्र वीज वितरण कंपनी ऐकण्याच्या मानसिकतेत नाही. यामुळे ग्रामपंचायत अडचणीत आली आहे.

बॉक्स

ग्रा.पं. पदाधिकारी धास्तावले

ऐन सणासुदीच्या दिवसात पथ दिवे बंद होणार म्हणून ग्रामपंचायत पदाधिकारीदेखील धास्तावले आहे. गावकऱ्यांना अंधारात कसे ठेवावे, याची चिंता सतावत आहे. जिल्हा परिषद पूर्वी १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून पथ दिवे देयकाची रक्कम कपात करत होती. त्याच धर्तीवर १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून पथदिवे देयकाचा भरणा करण्याची तरतूद करण्यास संमती द्यावी, अशी मागणी बल्लारपूर तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीने केली आहे.

कोट

कोरोना संक्रमन काळाने ग्रामपंचायत आर्थिक अडचणीत आली आहे. गावातील कर वसुलीचे प्रमाण घटले आहे. ग्रामपंचायतीला आर्थिक जुळवाजुळव करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गावातील पथदिवे देयकासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा. गावातील नागरिकांचा रोष कमी करण्याचा हाच एकमेव उपाय आहे. ग्रामपंचायत पातळीवर कर वसुलीचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.

- राकेश मांढरे

ग्रामविकास अधिकारी, विसापूर