शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
3
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
4
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
5
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
8
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
9
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
10
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
11
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
12
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

सणासुदीच्या काळात पथदिवे बंद होण्याच्या मार्गांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:31 IST

विसापूर : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे गावागावातील पथदिवे देयक पूर्वी जिल्हा परिषद भरत होती. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन निश्चिंत ...

विसापूर : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे गावागावातील पथदिवे देयक पूर्वी जिल्हा परिषद भरत होती. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन निश्चिंत होते. आता मात्र वीज वितरण कंपनीने ग्रामपंचायतीवर बडगा उगारला आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात पथदिवे बंद होण्याच्या मार्गांवर आहे.

परिणामी ग्रामपंचायत प्रशासन वीज देयकसंदर्भात अडचणीत आले आहे. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर ग्रामपंचायतीवर तब्बल २ लाख ८६ हजार २०० रुपये पथदिवे देयक थकीत असल्याची बाब उघडकीस आली आहे. यामुळे गावात पथदिव्याअभावी अंधाराचे साम्राज्य निर्माण होण्याची शक्यता आहे. विसापूर ग्रामपंचायत यावर काय मार्ग काढते, याकडे गावाकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

गावात ५८० वीज खांब असून त्यावर पथदिवे लावण्यात आले आहे. गावागावातील पथदिव्याचे देयक यापूर्वी जिल्हा परिषद १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून स्वतः भरणा करीत होती. मात्र आता वीज वितरण कंपनी वीज देयक ग्रामपंचायत कडून वसूल करण्याचा फतवा काढला आहे. यामुळे ग्रामपंचायत चांगलीच अडचणीत आली आहे. विसापूर ग्रामपंचायत हद्दीत पथदिवे लागणारे १० मीटर लागले आहेत. एप्रिल २०२१ ते जुलै २०२१ दरम्यान पथदिवे देयकाचा भरणा करा, म्हणून वीज वितरण कंपनीने ग्रामपंचायतला अल्टिमेटम दिला आहे. थकीत एवढी रक्कम कशी भरावी, या विवंचनेत ग्रामपंचायत आली आहे.

ग्रामपंचायतीने वीज देयकाचा भरणा पूर्वीप्रमाणे जिल्हा परिषदने द्यावा म्हणून राज्य विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख व बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांना भेटून कैफियत मांडली. त्यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना पथदिव्याची वीज कपात करू नका म्हणून सांगितले. मात्र वीज वितरण कंपनी ऐकण्याच्या मानसिकतेत नाही. यामुळे ग्रामपंचायत अडचणीत आली आहे.

बॉक्स

ग्रा.पं. पदाधिकारी धास्तावले

ऐन सणासुदीच्या दिवसात पथ दिवे बंद होणार म्हणून ग्रामपंचायत पदाधिकारीदेखील धास्तावले आहे. गावकऱ्यांना अंधारात कसे ठेवावे, याची चिंता सतावत आहे. जिल्हा परिषद पूर्वी १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून पथ दिवे देयकाची रक्कम कपात करत होती. त्याच धर्तीवर १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून पथदिवे देयकाचा भरणा करण्याची तरतूद करण्यास संमती द्यावी, अशी मागणी बल्लारपूर तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीने केली आहे.

कोट

कोरोना संक्रमन काळाने ग्रामपंचायत आर्थिक अडचणीत आली आहे. गावातील कर वसुलीचे प्रमाण घटले आहे. ग्रामपंचायतीला आर्थिक जुळवाजुळव करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गावातील पथदिवे देयकासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा. गावातील नागरिकांचा रोष कमी करण्याचा हाच एकमेव उपाय आहे. ग्रामपंचायत पातळीवर कर वसुलीचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.

- राकेश मांढरे

ग्रामविकास अधिकारी, विसापूर