गुरुवारी बाधित आलेल्या १३ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील २, बल्लारपूर ३, मूल १, गोंडपिपरी १, राजुरा २, वरोरा १, जिवती १ व इतर ठिकाणच्या २ रुग्णांचा समावेश आहे. उपचारादरम्यान आज राजुरा तालुक्यातील एका महिलेचा मृत्यू झाला. चंद्रपूर तालुका, भद्रावती, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, सावली, पोंभुर्णा, चिमूर व कोरपना तालुक्यात एकही रुग्ण आढळला नाही. जिल्ह्यात बाधितांची संख्या ८४ हजार ६९२ वर पोहोचली आहे. बरे झालेल्यांची संख्या ८२ हजार ९५४ झाली आहे. सध्या २०९ बाधितांवर उपचार सुरू आहे. ५ लाख ६१ हजार ८१३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४ लाख ७४ हजार ४६३ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात १५२९ बाधितांचे मृत्यू झाले आहे. कोरोना संपला नाही. त्यामुळे नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
लाट ओसरली जिल्हा कोरोनामुक्तीच्या वाटेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:20 IST