शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

बोरघाट उपसा सिंचनच्या कालव्यावरून पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:59 IST

बोरघाट सिंचन योजनेच्या पाणी पुरवठ्यामुळे गोवर्धन उप कालव्यांतर्गतची शेती सुजलाम्, सुफलाम् होण्याची आशा पल्लवित झाली. परंतु, कालव्याची स्थिती गंभीर ...

बोरघाट सिंचन योजनेच्या पाणी पुरवठ्यामुळे गोवर्धन उप कालव्यांतर्गतची शेती सुजलाम्, सुफलाम् होण्याची आशा पल्लवित झाली. परंतु, कालव्याची स्थिती गंभीर असल्याने टेलवरील शेतीपिकांना पाणी पुरवठा करणे कसरतीचे झाले आहे. कालव्यातील पाणी पातळी वाढवली की घोसरी गावाजवळ पाणी कालव्यावरून गावात घुसत असून, घरे पाण्याखाली येऊन धोकादायक असल्याची गंभीर स्थिती उद्भवत आहे. कालवा पाणी वाहून नेण्यास कमकुवत असून, पाणीपुरवठा पुरेसा होत नसल्याने गोवर्धन उप कालव्यांतर्गत मौजा- घोसरी, नांदगाव, फुटाणा, गोवर्धन व दिघोरी येथील धानपिके धोक्यात येण्याची शक्यता बळावलेली आहे. सिंचाई विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घेऊन पाणी पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे.

मागील आठवड्यात बोरघाट उपसा सिंचनचे पाणी कालव्यावरून वाहत घोसरी गावातील काही घरांमध्ये शिरल्याने सुरेखा राऊत यांचे घर पडले, तर मालतीबाई निमगडे यांच्या घरासभोवताली पाण्याने वेढा दिल्याने त्यांच्या कुटुंबीयांना मनस्ताप सहन करावा लागला.

310821\img20210825152012.jpg

दिघोरी टेलवरील पिकांना पाणी पुरवठा करणे झाले कसरतीचे