शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
2
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
4
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
5
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
6
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
7
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
8
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
9
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
10
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
11
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
12
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
13
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
14
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
15
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
16
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
17
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
18
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
19
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
20
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं

पाणीपुरवठा योजनांना गती मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 22:52 IST

गावातील पाणी पुरवठा योजनांचे व्यवस्थापन करणाऱ्या ग्राम पाणी पुरवठा समित्या मागील वर्षी ९ मार्च २०१८ रोजी बरखास्त करण्यात आल्या. आता नळयोजनांना गती मिळणार असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देसमित्या बरखास्त : योजनांचा कारभार नियोजन समितीकडे

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : गावातील पाणी पुरवठा योजनांचे व्यवस्थापन करणाऱ्या ग्राम पाणी पुरवठा समित्या मागील वर्षी ९ मार्च २०१८ रोजी बरखास्त करण्यात आल्या. आता नळयोजनांना गती मिळणार असल्याची माहिती आहे.मागील दहा बारा वर्षांपासून नागभीड तालुक्यात पाणी पुरवठा योजनांचे काम सुरू असले, तरी फार थोड्या योजना पूर्ण झाल्या आहेत. बाकी बहुतेक योजना विविध कारणांमुळे अपूर्ण असून यात शासनाचा करोडो रूपयांचा निधी पाण्यात गेला आहे. सर्वांना शुद्ध व मुबलक पाणी मिळावे, यासाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. यात जलस्वराज्य, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना अशा विविध योजनांचा यात समावेश आहे. यातील प्रत्येक योजनेसाठी शासनाने लाखो रूपयांचा निधी दिला असला तरी प्रशासनातील लालफितशाही व स्थानिक पाणी व्यवस्थापन समित्यांच्या अज्ञानामुळे तर काही ठिकाणी भ्रष्ट प्रवृत्तीमुळे या योजनांचा बट्ट्याबोळ झाला होता.सन २०१३ -१४ यावर्षी मान्यता मिळालेल्या अनेक योजना आहेत. ईरव्हा (टेकरी), चिंधीचक, खडकी (हुमा), मिंथूर, कोटगाव, पारडी (ठवरे), या गावांचा समावेश आहे. २०१४-१५ या आर्थिक वर्षात कोदेपार, उश्राळ मेंढा, या ठिकाणी नळ योजनांना मंजुरी मिळाली. या योजनाही अपूर्णच आहेत. याची कारणे वेगवेगळी आहेत. या योजनांचे विहिर, उर्ध्व नलिका, पाण्याची टाकी, वितरण व्यवस्था ही कामे महत्त्वपूर्ण आहे. काही ठिकाणी हे कामे अपूर्ण तर काही ठिकाणी पूर्ण करण्यात आली आहे.किती निधी, खर्च कितीशासनाकडून योजनेसाठी मंजूर रक्कमेपेक्षा बहुतेक निधी अखर्चित आहे. ईरव्हाला १९.१० लाख रुपये मंजूर असून १०.४९ लाख रुपये खर्च, चिंधीचक योजनेस ४२.४२ लाखांपैकी २०.४३ लाख खर्च, खडकी योजनेची किंमत ३६.८० लाख त्यापैकी १९.३३ लाख खर्च, मिंथुर योजना ४८.४९ लाख पैकी १९ लाख खर्च, कोटगाव योजना ४५ लाख रूपयांची असून २८.५३ लाख रूपये खर्च, पारडी (ठवरे) योजना ४८ लाखांपैकी ३०.०९ लाख खर्च, कोथुळणा योजना ३८.८८ लाखापैकी, २८.९६ लाख रुपये खर्च, उश्राळ मेंढा योजनेला २४ लाख रुपये खर्च झाले आहेत.काही योजना निविदा प्रक्रियेतग्राम पातळीवर पाणी पुरवठा योजनांचे व्यवस्थापन करणाऱ्या समित्या मागील वर्षी ९ मार्च २०१८ रोजी बरखास्त करण्यात आल्या आहेत. या समित्या बरखास्त करण्यात आल्यानंतर कामाचे पूर्ण नियोजन विभागाकडे आल्याने या योजनांच्या कामास काहीशी गती आली आहे. मागील वर्षभरात मोहाळी, कोथुळणा, मिंडाळा, सोनुली, वैजापूर, पाहार्णी या नळयोजनांचे काम पूर्ण करण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला दिली. मात्र मिंडाळा येथे नळ कनेक्शन घेण्यास नागरिकांचा विलंब होत आहे. तर अनेक योजना निविदा प्रक्रियेत असल्याचीही माहितीही या अधिकाºयाने दिली.