शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

पाणीपुरवठा योजनांना गती मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 22:52 IST

गावातील पाणी पुरवठा योजनांचे व्यवस्थापन करणाऱ्या ग्राम पाणी पुरवठा समित्या मागील वर्षी ९ मार्च २०१८ रोजी बरखास्त करण्यात आल्या. आता नळयोजनांना गती मिळणार असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देसमित्या बरखास्त : योजनांचा कारभार नियोजन समितीकडे

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : गावातील पाणी पुरवठा योजनांचे व्यवस्थापन करणाऱ्या ग्राम पाणी पुरवठा समित्या मागील वर्षी ९ मार्च २०१८ रोजी बरखास्त करण्यात आल्या. आता नळयोजनांना गती मिळणार असल्याची माहिती आहे.मागील दहा बारा वर्षांपासून नागभीड तालुक्यात पाणी पुरवठा योजनांचे काम सुरू असले, तरी फार थोड्या योजना पूर्ण झाल्या आहेत. बाकी बहुतेक योजना विविध कारणांमुळे अपूर्ण असून यात शासनाचा करोडो रूपयांचा निधी पाण्यात गेला आहे. सर्वांना शुद्ध व मुबलक पाणी मिळावे, यासाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. यात जलस्वराज्य, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना अशा विविध योजनांचा यात समावेश आहे. यातील प्रत्येक योजनेसाठी शासनाने लाखो रूपयांचा निधी दिला असला तरी प्रशासनातील लालफितशाही व स्थानिक पाणी व्यवस्थापन समित्यांच्या अज्ञानामुळे तर काही ठिकाणी भ्रष्ट प्रवृत्तीमुळे या योजनांचा बट्ट्याबोळ झाला होता.सन २०१३ -१४ यावर्षी मान्यता मिळालेल्या अनेक योजना आहेत. ईरव्हा (टेकरी), चिंधीचक, खडकी (हुमा), मिंथूर, कोटगाव, पारडी (ठवरे), या गावांचा समावेश आहे. २०१४-१५ या आर्थिक वर्षात कोदेपार, उश्राळ मेंढा, या ठिकाणी नळ योजनांना मंजुरी मिळाली. या योजनाही अपूर्णच आहेत. याची कारणे वेगवेगळी आहेत. या योजनांचे विहिर, उर्ध्व नलिका, पाण्याची टाकी, वितरण व्यवस्था ही कामे महत्त्वपूर्ण आहे. काही ठिकाणी हे कामे अपूर्ण तर काही ठिकाणी पूर्ण करण्यात आली आहे.किती निधी, खर्च कितीशासनाकडून योजनेसाठी मंजूर रक्कमेपेक्षा बहुतेक निधी अखर्चित आहे. ईरव्हाला १९.१० लाख रुपये मंजूर असून १०.४९ लाख रुपये खर्च, चिंधीचक योजनेस ४२.४२ लाखांपैकी २०.४३ लाख खर्च, खडकी योजनेची किंमत ३६.८० लाख त्यापैकी १९.३३ लाख खर्च, मिंथुर योजना ४८.४९ लाख पैकी १९ लाख खर्च, कोटगाव योजना ४५ लाख रूपयांची असून २८.५३ लाख रूपये खर्च, पारडी (ठवरे) योजना ४८ लाखांपैकी ३०.०९ लाख खर्च, कोथुळणा योजना ३८.८८ लाखापैकी, २८.९६ लाख रुपये खर्च, उश्राळ मेंढा योजनेला २४ लाख रुपये खर्च झाले आहेत.काही योजना निविदा प्रक्रियेतग्राम पातळीवर पाणी पुरवठा योजनांचे व्यवस्थापन करणाऱ्या समित्या मागील वर्षी ९ मार्च २०१८ रोजी बरखास्त करण्यात आल्या आहेत. या समित्या बरखास्त करण्यात आल्यानंतर कामाचे पूर्ण नियोजन विभागाकडे आल्याने या योजनांच्या कामास काहीशी गती आली आहे. मागील वर्षभरात मोहाळी, कोथुळणा, मिंडाळा, सोनुली, वैजापूर, पाहार्णी या नळयोजनांचे काम पूर्ण करण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला दिली. मात्र मिंडाळा येथे नळ कनेक्शन घेण्यास नागरिकांचा विलंब होत आहे. तर अनेक योजना निविदा प्रक्रियेत असल्याचीही माहितीही या अधिकाºयाने दिली.