शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

पाणीपुरवठा योजनांना गती मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 22:52 IST

गावातील पाणी पुरवठा योजनांचे व्यवस्थापन करणाऱ्या ग्राम पाणी पुरवठा समित्या मागील वर्षी ९ मार्च २०१८ रोजी बरखास्त करण्यात आल्या. आता नळयोजनांना गती मिळणार असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देसमित्या बरखास्त : योजनांचा कारभार नियोजन समितीकडे

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : गावातील पाणी पुरवठा योजनांचे व्यवस्थापन करणाऱ्या ग्राम पाणी पुरवठा समित्या मागील वर्षी ९ मार्च २०१८ रोजी बरखास्त करण्यात आल्या. आता नळयोजनांना गती मिळणार असल्याची माहिती आहे.मागील दहा बारा वर्षांपासून नागभीड तालुक्यात पाणी पुरवठा योजनांचे काम सुरू असले, तरी फार थोड्या योजना पूर्ण झाल्या आहेत. बाकी बहुतेक योजना विविध कारणांमुळे अपूर्ण असून यात शासनाचा करोडो रूपयांचा निधी पाण्यात गेला आहे. सर्वांना शुद्ध व मुबलक पाणी मिळावे, यासाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. यात जलस्वराज्य, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना अशा विविध योजनांचा यात समावेश आहे. यातील प्रत्येक योजनेसाठी शासनाने लाखो रूपयांचा निधी दिला असला तरी प्रशासनातील लालफितशाही व स्थानिक पाणी व्यवस्थापन समित्यांच्या अज्ञानामुळे तर काही ठिकाणी भ्रष्ट प्रवृत्तीमुळे या योजनांचा बट्ट्याबोळ झाला होता.सन २०१३ -१४ यावर्षी मान्यता मिळालेल्या अनेक योजना आहेत. ईरव्हा (टेकरी), चिंधीचक, खडकी (हुमा), मिंथूर, कोटगाव, पारडी (ठवरे), या गावांचा समावेश आहे. २०१४-१५ या आर्थिक वर्षात कोदेपार, उश्राळ मेंढा, या ठिकाणी नळ योजनांना मंजुरी मिळाली. या योजनाही अपूर्णच आहेत. याची कारणे वेगवेगळी आहेत. या योजनांचे विहिर, उर्ध्व नलिका, पाण्याची टाकी, वितरण व्यवस्था ही कामे महत्त्वपूर्ण आहे. काही ठिकाणी हे कामे अपूर्ण तर काही ठिकाणी पूर्ण करण्यात आली आहे.किती निधी, खर्च कितीशासनाकडून योजनेसाठी मंजूर रक्कमेपेक्षा बहुतेक निधी अखर्चित आहे. ईरव्हाला १९.१० लाख रुपये मंजूर असून १०.४९ लाख रुपये खर्च, चिंधीचक योजनेस ४२.४२ लाखांपैकी २०.४३ लाख खर्च, खडकी योजनेची किंमत ३६.८० लाख त्यापैकी १९.३३ लाख खर्च, मिंथुर योजना ४८.४९ लाख पैकी १९ लाख खर्च, कोटगाव योजना ४५ लाख रूपयांची असून २८.५३ लाख रूपये खर्च, पारडी (ठवरे) योजना ४८ लाखांपैकी ३०.०९ लाख खर्च, कोथुळणा योजना ३८.८८ लाखापैकी, २८.९६ लाख रुपये खर्च, उश्राळ मेंढा योजनेला २४ लाख रुपये खर्च झाले आहेत.काही योजना निविदा प्रक्रियेतग्राम पातळीवर पाणी पुरवठा योजनांचे व्यवस्थापन करणाऱ्या समित्या मागील वर्षी ९ मार्च २०१८ रोजी बरखास्त करण्यात आल्या आहेत. या समित्या बरखास्त करण्यात आल्यानंतर कामाचे पूर्ण नियोजन विभागाकडे आल्याने या योजनांच्या कामास काहीशी गती आली आहे. मागील वर्षभरात मोहाळी, कोथुळणा, मिंडाळा, सोनुली, वैजापूर, पाहार्णी या नळयोजनांचे काम पूर्ण करण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला दिली. मात्र मिंडाळा येथे नळ कनेक्शन घेण्यास नागरिकांचा विलंब होत आहे. तर अनेक योजना निविदा प्रक्रियेत असल्याचीही माहितीही या अधिकाºयाने दिली.