शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

मूलला २४ तास पाणीपुरवठा

By admin | Updated: June 11, 2017 00:28 IST

विदर्भात सर्वाधिक विकसित तालुक्याचे शहर म्हणून मूल शहराचे नाव आगामी काळात घेतले जाईल,...

सुधीर मुनगंटीवार : विदर्भात सर्वाधिक विकसित शहर बनविणारलोकमत न्यूज नेटवर्कमूल : विदर्भात सर्वाधिक विकसित तालुक्याचे शहर म्हणून मूल शहराचे नाव आगामी काळात घेतले जाईल, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन, वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. नागरिकांनी ३५ कोटीच्या विकासकामांच्या उद्घाटनाची मॅरॉथान सायंकाळ शुक्रवारी अनुभवली. तीन तासांत शहरात ३५ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन पालकमंत्र्यांनी केले.सर्वप्रथम ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते मूल शहराला २४ तास पाणी देण्याऱ्या २८ कोटी रुपये किंमतीच्या पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ करण्यात आला. पाणीपुरवठा योजनेसाठी पूरक ठरणाऱ्या वीज कंपनीच्या एक्सप्रेस फिडरचे उद्घाटनही करण्यात आले. त्यानंतर अडीच कोटींच्या तालुका क्रीडा संकुलातील जलतरण तलावाचे भूमिपूजन, ३ कोटी २६ लक्ष रूपये किंमतीच्या १० सार्वजनिक जागांच्या सौंदर्यीकरणाचा प्रारंभ विविध ठिकाणी करण्यात आला. यावेळी त्यांनी शहराच्या विविध भागात पाच ठिकाणी जनतेला संबोधित केले. ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, मूल शहरातील वीजपुरवठा भूमिगत करण्यात येईल. पाणीपुरवठा मुबलक व नियमित करण्यात येईल. तसेच शहरातील सर्व रस्ते सिमेंटचे व नाल्या भूमिगत करण्यात येतील. मूल शहरात सुमारे १५० कोटी रूपये किंमतीच्या विकासकामांना मंजूरी मिळाली असून यात मुख्य मार्गाच्या सिमेंटीकरणासह तसेच अंतर्गत रस्त्यांचे सिमेंटीकरण, चौक सौंदर्यीकरण, स्मशानभूमीचे बांधकाम, पाणीपुरवठा योजना, बसस्थानकाचे आधुनिकीकरण व नूतनीकरण, वळण मार्गाचे बांधकाम, माजी मुख्यमंत्री कर्मवीर मा. सा. कन्नमवार यांचे स्मारक व सभागृहाचे बांधकाम, प्रशासकीय इमारतीचे बांधकाम, खनिज विकास निधीच्या माध्यमातून इको-पार्कचे बांधकाम, जलतरण तलावाचे बांधकाम, शासकीय आदिवासी मुलींच्या व मुलांच्या वसतिगृहाचे बांधकाम, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय इमारतीचे बांधकाम, क्रीडा संकुलाचे बांधकाम, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अतिरिक्त कार्यशाळेचे बांधकाम, सीसीटीव्ही सर्व्हेलन्स सिस्टीम, माळी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, भूमिगत विद्युत वाहिनीचे बांधकाम आदी विकास कामे मूल शहरात मंजूर करण्यात आली. त्यातील बहुतांश विकास कामे प्रगतीपथावर आहेत व काही पूर्णत्वास आली आहे. नजीकच्या काळात प्रत्येक वार्डात जनता दरबार घेऊन तुमच्या मनातला विकास प्रत्यक्षात साकारला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष व बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, मूलच्या नगराध्यक्ष रत्नमाला भोयर यांनीही मोठ्या संख्येने उपस्थितांशी संवाद साधला. व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संध्या गुरनुले, उपाध्यक्ष नंदू रणदिवे, मूल शहर भाजपाचे अध्यक्ष प्रभाकर भोयर, नगरसेवक विनोद सिडाम, रेखा येरणे, शांता मांदाडे, वनमाला कोडापे, प्रशांत समर्थ, विद्या बोबाटे, अनिल साखरकर, आशा गुप्ता, प्रशांत लाडवे, संगीता वाळके, वंदना वाकडे, महेंद्र करकाडे, मिलिंद खोब्रागडे, प्रभा चौथाले, चंद्रकांत आष्टनकर, अजय गोगुलवार आदी उपस्थित होते.पाच प्रतिनिधींच्या हस्ते उद्घाटनयावेळी प्रत्येक ठिकाणी जनतेच्या पाच प्रतिनिधीकडून उद्घाटन करण्यात आले. अशा विविधांगी कार्यक्रमाचे आयोजन मूल शहरात करण्यात आले होते. कार्यकर्त्यांची बाईक रॅली, नगरसेवक, नगरसेविकांचा त्यातील सहभाग, ज्येष्ठ नागरिकांची उदघाटनस्थळी उपस्थिती आणि शेवटी खचाखच भरलेल्या मा.सा.कन्नमवार सभागृहात जाहीर सभा, अशी व्यस्त सायंकाळ मूलवासियांनी पालकमंत्र्यांसोबत अनुभवली. पाचही ठिकाणी विद्यार्थी, महिला आणि कार्यकर्त्यांनी त्यांना गराडा घातला. आपल्या विविध मागण्या सादर केल्या.