शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

मूलला २४ तास पाणीपुरवठा

By admin | Updated: June 11, 2017 00:28 IST

विदर्भात सर्वाधिक विकसित तालुक्याचे शहर म्हणून मूल शहराचे नाव आगामी काळात घेतले जाईल,...

सुधीर मुनगंटीवार : विदर्भात सर्वाधिक विकसित शहर बनविणारलोकमत न्यूज नेटवर्कमूल : विदर्भात सर्वाधिक विकसित तालुक्याचे शहर म्हणून मूल शहराचे नाव आगामी काळात घेतले जाईल, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन, वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. नागरिकांनी ३५ कोटीच्या विकासकामांच्या उद्घाटनाची मॅरॉथान सायंकाळ शुक्रवारी अनुभवली. तीन तासांत शहरात ३५ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन पालकमंत्र्यांनी केले.सर्वप्रथम ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते मूल शहराला २४ तास पाणी देण्याऱ्या २८ कोटी रुपये किंमतीच्या पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ करण्यात आला. पाणीपुरवठा योजनेसाठी पूरक ठरणाऱ्या वीज कंपनीच्या एक्सप्रेस फिडरचे उद्घाटनही करण्यात आले. त्यानंतर अडीच कोटींच्या तालुका क्रीडा संकुलातील जलतरण तलावाचे भूमिपूजन, ३ कोटी २६ लक्ष रूपये किंमतीच्या १० सार्वजनिक जागांच्या सौंदर्यीकरणाचा प्रारंभ विविध ठिकाणी करण्यात आला. यावेळी त्यांनी शहराच्या विविध भागात पाच ठिकाणी जनतेला संबोधित केले. ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, मूल शहरातील वीजपुरवठा भूमिगत करण्यात येईल. पाणीपुरवठा मुबलक व नियमित करण्यात येईल. तसेच शहरातील सर्व रस्ते सिमेंटचे व नाल्या भूमिगत करण्यात येतील. मूल शहरात सुमारे १५० कोटी रूपये किंमतीच्या विकासकामांना मंजूरी मिळाली असून यात मुख्य मार्गाच्या सिमेंटीकरणासह तसेच अंतर्गत रस्त्यांचे सिमेंटीकरण, चौक सौंदर्यीकरण, स्मशानभूमीचे बांधकाम, पाणीपुरवठा योजना, बसस्थानकाचे आधुनिकीकरण व नूतनीकरण, वळण मार्गाचे बांधकाम, माजी मुख्यमंत्री कर्मवीर मा. सा. कन्नमवार यांचे स्मारक व सभागृहाचे बांधकाम, प्रशासकीय इमारतीचे बांधकाम, खनिज विकास निधीच्या माध्यमातून इको-पार्कचे बांधकाम, जलतरण तलावाचे बांधकाम, शासकीय आदिवासी मुलींच्या व मुलांच्या वसतिगृहाचे बांधकाम, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय इमारतीचे बांधकाम, क्रीडा संकुलाचे बांधकाम, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अतिरिक्त कार्यशाळेचे बांधकाम, सीसीटीव्ही सर्व्हेलन्स सिस्टीम, माळी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, भूमिगत विद्युत वाहिनीचे बांधकाम आदी विकास कामे मूल शहरात मंजूर करण्यात आली. त्यातील बहुतांश विकास कामे प्रगतीपथावर आहेत व काही पूर्णत्वास आली आहे. नजीकच्या काळात प्रत्येक वार्डात जनता दरबार घेऊन तुमच्या मनातला विकास प्रत्यक्षात साकारला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष व बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, मूलच्या नगराध्यक्ष रत्नमाला भोयर यांनीही मोठ्या संख्येने उपस्थितांशी संवाद साधला. व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संध्या गुरनुले, उपाध्यक्ष नंदू रणदिवे, मूल शहर भाजपाचे अध्यक्ष प्रभाकर भोयर, नगरसेवक विनोद सिडाम, रेखा येरणे, शांता मांदाडे, वनमाला कोडापे, प्रशांत समर्थ, विद्या बोबाटे, अनिल साखरकर, आशा गुप्ता, प्रशांत लाडवे, संगीता वाळके, वंदना वाकडे, महेंद्र करकाडे, मिलिंद खोब्रागडे, प्रभा चौथाले, चंद्रकांत आष्टनकर, अजय गोगुलवार आदी उपस्थित होते.पाच प्रतिनिधींच्या हस्ते उद्घाटनयावेळी प्रत्येक ठिकाणी जनतेच्या पाच प्रतिनिधीकडून उद्घाटन करण्यात आले. अशा विविधांगी कार्यक्रमाचे आयोजन मूल शहरात करण्यात आले होते. कार्यकर्त्यांची बाईक रॅली, नगरसेवक, नगरसेविकांचा त्यातील सहभाग, ज्येष्ठ नागरिकांची उदघाटनस्थळी उपस्थिती आणि शेवटी खचाखच भरलेल्या मा.सा.कन्नमवार सभागृहात जाहीर सभा, अशी व्यस्त सायंकाळ मूलवासियांनी पालकमंत्र्यांसोबत अनुभवली. पाचही ठिकाणी विद्यार्थी, महिला आणि कार्यकर्त्यांनी त्यांना गराडा घातला. आपल्या विविध मागण्या सादर केल्या.