शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: राधाकृष्ण विखे-पाटील आझाद मैदानात; मनोज जरांगे यांची घेतली भेट, मसुद्यावर चर्चा सुरू
2
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
3
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला
4
शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा देणारी सरकारी योजना; EPF का ठरत आहे सरस? संपूर्ण गणित समजून घ्या
5
Video: आझाद मैदान परिसरात तणावाची स्थिती, आंदोलकांनी वाट अडवली; पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली
6
भाक्रा धरणापासून एअरबेसपर्यंत पाकिस्तानला दिली माहिती; प्रसिद्ध युटयूबर विरोधात आरोपपत्र दाखल
7
"पूर नव्हे, हा तर देवाचा आशीर्वाद"; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी जनतेला दिला अजब सल्ला! म्हणाले...
8
'आंदोलक रस्त्यावर नाचताहेत म्हणून तुम्ही न्यायमूर्तींना पायी कोर्टात जायला भाग पाडू शकत नाही'; उच्च न्यायालयाने सरकारला झापले
9
'सरकारचा एकही प्रतिनिधी मनोज जरांगे पाटलांना भेटायला आला नाही,' रोहित पवारांची टीका
10
सेबीचा नवा नियम! F&O ट्रेडिंगमध्ये १ ऑक्टोबरपासून पोझिशन लिमिट वाढणार; लहान गुंतवणूकदारांना फायदा
11
स्वार्थी ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'नंतरही भारताची अर्थव्यवस्था 'बम-बम'! ग्रोथ पाहून पंतप्रधान मोदीही खूश; स्पष्टच बोलले...
12
“बस… जरांगे आता थांबा! आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा”; कुणी दिला सल्ला?
13
'या' देशात भाड्याने मिळते पत्नी; लग्न करून एकत्रही राहू शकता, पण मोजावे लागतील 'इतके' पैसे!
14
"काँग्रेसच्या स्टेजवरून माझ्या आईला शिवी दिली, हा अपमान..."; पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक
15
Ganesh Visarjan: गौरी-गणपतीच्या निरोपासाठी जय्यत तयारी
16
बुरख्यातली गर्लफ्रेंड निघाली मुलगा! एकत्र प्रवास करूनही ओळखू शकला नाही बॉयफ्रेंड; पुढचं ऐकून व्हाल हैराण
17
अवनीत कौरने विराट कोहलीच्या इंस्टाग्राम पोस्ट लाइकवर सोडलं मौन, म्हणाली - "मी कधीच विसरत नाही..."
18
"अकाली एक्झिट वगैरे शब्द...", प्रिया मराठेच्या निधनानंतर अभिजीतची भावुक पोस्ट
19
"लक्षात ठेवा तुमच्याही लोकांना, नेत्यांना महाराष्ट्रात यायचं आहे"; मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन काय बोलले?
20
मतचोरीच्या ‘ॲटम बॉम्ब’नंतर आता फुटेल ‘हायड्रोजन बॉम्ब’; राहुल गांधींचा इशारा

वेकोलि परिसरातील गावांना बसणार उन्हाळ्यापूर्वीच पाणीटंचाईची झळ

By admin | Updated: January 22, 2015 00:55 IST

यावर्षी कमी पडलेला पाऊस आणि राजुरा तालुक्यात वाढत असलेल्या कोळसा खाणींमुळे वेकोलि परिसरातील गावांना पाणीटंचाईची झळ सहन करावी लागणार आहे.

गोवरी : यावर्षी कमी पडलेला पाऊस आणि राजुरा तालुक्यात वाढत असलेल्या कोळसा खाणींमुळे वेकोलि परिसरातील गावांना पाणीटंचाईची झळ सहन करावी लागणार आहे. जानेवारी महिन्यातच खासगी बोअरवेलला कमी पाणी येत असल्याने उन्हाळ्यापूर्वीच वेकोलि परिसरात पाणी टंचाईचे सावट घोंगावत आहे.गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी पाऊस पडला. नदी, नाले, तलाव दिवाळीतच कोरडे पडल्याने पाण्याचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. दरम्यान, नवीन वर्षाच्या प्रारंभी पावसाने हजेरी लावल्याने पाण्याच्या पातळीत वाढ होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने जमिनीत पाहिजे त्या प्रमाणात पाणी मुरले नाही. त्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ न होता ती खालावत गेली. राजुरा तालुका हा कोळसा खाणींसाठी प्रसिद्ध आहे. बल्लारपूर क्षेत्रातंर्गत येणाऱ्या वेकोलिच्या कोळसा खाणी तालुक्यात मोठ्या प्रमाणात असल्याने दिवसेंदिवस पाण्याची पातळी खालावत आहे. वेकोलि परिसरातील गोवरी, पोवनी, साखरी, चिंचोली, कळमना, मानोली, बाबापूर, माथरा, गोयेगाव, अंतरगाव या गावांना आता पाणीटंचाईची झळ सहन करावी लागणार असून परिसरातील शेती पाण्याअभावी प्रभावित झाली आहे.वेकोलिच्या कोळसा खाणी खासगी बोअरवेलपेक्षा अधिक खोल असल्याने व बहुसंख्य गावातील नळयोजनेचा पाणी पुरवठा बोअरवेलच्या मोटरपंपावर अवलंबून असल्याने उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न गंभीर होऊन नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करायला लावणारा ठरणार आहे. शेतातील कृषीपंपांना पाणीच येत नसल्याने शेतकऱ्यांचा रबी हंगाम धोक्यात आला आहे. उल्लेखनीय असे की यावर्षी सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्यामुळे खरीप हंगाम दुष्काळाच्या सावटात होता. शेतकऱ्यांना शेतातून अत्यल्प उत्पादन झाले. त्यामुळे शेतकरी घेतलेले कर्ज तर फेडू शकला नाहीच. शेतीसाठी लावलेला पैसाही काढू शकला नाही. आता कमी पाण्यामुळे रबी हंगामातही कमी उत्पादन होण्याची चिन्ह दिसत आहे. परिणामी शेतकरी चिंतातूर आहे. आता पातळीच खालावल्याने पाण्याचीही चिंता आहेच. (वार्ताहर)