शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
2
फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
3
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
4
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
5
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
6
वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
7
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
8
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
9
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
10
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
11
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
12
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!
13
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'
14
'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
15
Jio IPO ची प्रतीक्षा आता संपणार! शुक्रवारी मुकेश अंबानी देणार सरप्राईज?
16
व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?
17
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
18
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
19
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
20
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती

गोंडपिंपरी तालुक्यातही पाणी टंचाईचे संकट

By admin | Updated: June 4, 2014 23:37 IST

उन्हाळा ऋतूत संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनातर्फे दरवर्षी पाणी टंचाई आराखडा तयार करण्यात येतो. मात्र अधिकार्‍यांच्या दुर्लक्षितपणा व शासनाच्या दिरंगाईमुळे नागरिकांना दर उन्हाळ्यात पाणी

वेदान्त मेहरकुळे - गोंडपिंपरीउन्हाळा ऋतूत संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनातर्फे दरवर्षी पाणी टंचाई आराखडा तयार करण्यात येतो. मात्र अधिकार्‍यांच्या दुर्लक्षितपणा व शासनाच्या दिरंगाईमुळे नागरिकांना दर उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागतात.  यंदाही तीच स्थिती तालुक्यात दिसून येते. ९८ गावांचा विस्तारित तालुका म्हणून ओळखल्या जाणार्‍या गोंडपिंपरी तालुक्यात एकूण पाच प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहेत. यात धाबा, लाठी, विठ्ठलवाडा, वढोली व चेकनांदगाव यांचा समावेश आहे. पूर्वी सदर योजनांची जबाबदारी ही शिखर समितीकडे असताना नागरिकांना पाण्यासाठी विशेष भटकावे लागत नव्हते. मात्र मागील दोन वर्षांपासून या योजनांची देखभालदुरुस्ती विशिष्ट अशा एजन्सी कंत्राटदारांना देण्यात आल्याने मलिंदा लाटणार्‍या कंत्राटदारांकडून शासन निधी हडपल्या जात आहे. या प्रकारामुळे  दूषित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम, साथ रोगाची लागण व पाण्यासाठी दैनदिन भटकंती असे विदारक चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे.प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांची देखभाल दुरुस्ती करणार्‍या एजन्सींकडून कमी मजुरांचा वापर, पाणी टाकी स्वच्छतेकडे दुर्लक्ष, पाणी नमुने तपासणीदेखील महिन्यातून केवळ एकदाच, परिसरात घाणीचे साम्राज्य तर अल्प मजूर कामावर असल्याने दोन ते तीन दिवसाआड पाण्याचा पुरवठा व पुरविण्यात आलेल्या दूषित पाण्यामुळे साथ रोगांचे वाढलेले प्रमाण या सर्व  बाबी दिसून येत आहे. या बाबींमुळे तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यावर नियंत्रण ठेवणारे अधिकारी या एजन्सींची देयके काढताना होणार्‍या साटेलोटे व्यवहारातच अडकून पडले आहे. यामुळे शासनाच्या पाणी पुरवठा करणार्‍या योजनाही कुचकामी ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. अतवृष्टीत या एजन्सींचा पाणी पुरवठा बंद असतो. तरीही २ ते ३ महिन्यांची देयके सादर करून शासन निधी हडपल्याचा प्रकारही घडल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली.ग्रामीण पाणीपुरवठा व जलस्वराज्य अंतर्गत गोंडपिंपरी तालुक्यातील गणेशपिपरी, नंदवर्धन, राळापेठ, धानोरा, सालेझरी या गावांमध्ये काही ठिकाणी टाकी बांधकाम पूर्ण तर काही गावांमध्ये निधी उचल होऊनही बांधकाम अपूर्ण, विद्युत जोडणीचा निधी नसल्याने वर्ष २00७-0८ आर्थिक वर्षात मंजुरी मिळूनही आजपर्यंत नळयोजना कार्यान्वित नसल्याची माहिती मिळाली.तालुक्यातील मौजा राळापेठ येथे गेल्या एक ते दीड महिन्यांपासून डेंग्यू व अज्ञात रोगाच्या साथीमुळे पाच जण दगावले असून तेथील पाणी पुरवठा योजना अद्यापही कार्यान्वित नाही. राळापेठ येथील जीवहानीमागे दूषित पाणीच कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. नागरिकांना लगतच्या वैनगंगा नदीपात्रातून पाणी आणावे लागते. मात्र आष्टी पेपर मिलमधून नदीपात्रात अस्वच्छ पाणी व रसायन सोडले जात असल्याने नदीपात्रातील पाणीही दूषित झाले आहे.