शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
3
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
4
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
5
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
6
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
7
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
8
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
9
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
10
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
11
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
12
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
13
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
14
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
16
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
17
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
18
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
19
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
20
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल

गोंडपिंपरी तालुक्यातही पाणी टंचाईचे संकट

By admin | Updated: June 4, 2014 23:37 IST

उन्हाळा ऋतूत संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनातर्फे दरवर्षी पाणी टंचाई आराखडा तयार करण्यात येतो. मात्र अधिकार्‍यांच्या दुर्लक्षितपणा व शासनाच्या दिरंगाईमुळे नागरिकांना दर उन्हाळ्यात पाणी

वेदान्त मेहरकुळे - गोंडपिंपरीउन्हाळा ऋतूत संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनातर्फे दरवर्षी पाणी टंचाई आराखडा तयार करण्यात येतो. मात्र अधिकार्‍यांच्या दुर्लक्षितपणा व शासनाच्या दिरंगाईमुळे नागरिकांना दर उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागतात.  यंदाही तीच स्थिती तालुक्यात दिसून येते. ९८ गावांचा विस्तारित तालुका म्हणून ओळखल्या जाणार्‍या गोंडपिंपरी तालुक्यात एकूण पाच प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहेत. यात धाबा, लाठी, विठ्ठलवाडा, वढोली व चेकनांदगाव यांचा समावेश आहे. पूर्वी सदर योजनांची जबाबदारी ही शिखर समितीकडे असताना नागरिकांना पाण्यासाठी विशेष भटकावे लागत नव्हते. मात्र मागील दोन वर्षांपासून या योजनांची देखभालदुरुस्ती विशिष्ट अशा एजन्सी कंत्राटदारांना देण्यात आल्याने मलिंदा लाटणार्‍या कंत्राटदारांकडून शासन निधी हडपल्या जात आहे. या प्रकारामुळे  दूषित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम, साथ रोगाची लागण व पाण्यासाठी दैनदिन भटकंती असे विदारक चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे.प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांची देखभाल दुरुस्ती करणार्‍या एजन्सींकडून कमी मजुरांचा वापर, पाणी टाकी स्वच्छतेकडे दुर्लक्ष, पाणी नमुने तपासणीदेखील महिन्यातून केवळ एकदाच, परिसरात घाणीचे साम्राज्य तर अल्प मजूर कामावर असल्याने दोन ते तीन दिवसाआड पाण्याचा पुरवठा व पुरविण्यात आलेल्या दूषित पाण्यामुळे साथ रोगांचे वाढलेले प्रमाण या सर्व  बाबी दिसून येत आहे. या बाबींमुळे तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यावर नियंत्रण ठेवणारे अधिकारी या एजन्सींची देयके काढताना होणार्‍या साटेलोटे व्यवहारातच अडकून पडले आहे. यामुळे शासनाच्या पाणी पुरवठा करणार्‍या योजनाही कुचकामी ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. अतवृष्टीत या एजन्सींचा पाणी पुरवठा बंद असतो. तरीही २ ते ३ महिन्यांची देयके सादर करून शासन निधी हडपल्याचा प्रकारही घडल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली.ग्रामीण पाणीपुरवठा व जलस्वराज्य अंतर्गत गोंडपिंपरी तालुक्यातील गणेशपिपरी, नंदवर्धन, राळापेठ, धानोरा, सालेझरी या गावांमध्ये काही ठिकाणी टाकी बांधकाम पूर्ण तर काही गावांमध्ये निधी उचल होऊनही बांधकाम अपूर्ण, विद्युत जोडणीचा निधी नसल्याने वर्ष २00७-0८ आर्थिक वर्षात मंजुरी मिळूनही आजपर्यंत नळयोजना कार्यान्वित नसल्याची माहिती मिळाली.तालुक्यातील मौजा राळापेठ येथे गेल्या एक ते दीड महिन्यांपासून डेंग्यू व अज्ञात रोगाच्या साथीमुळे पाच जण दगावले असून तेथील पाणी पुरवठा योजना अद्यापही कार्यान्वित नाही. राळापेठ येथील जीवहानीमागे दूषित पाणीच कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. नागरिकांना लगतच्या वैनगंगा नदीपात्रातून पाणी आणावे लागते. मात्र आष्टी पेपर मिलमधून नदीपात्रात अस्वच्छ पाणी व रसायन सोडले जात असल्याने नदीपात्रातील पाणीही दूषित झाले आहे.