शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

कंपनीने राख टाकल्याने तलावातील पाण्याचा प्रवाह थांबला

By admin | Updated: September 27, 2015 00:44 IST

तालुक्यातील मरेगाव स्थित ग्रेटा एनर्जी कंपनीने वीज उत्पादन केल्यानंतर निघणारी राख चक्क जिल्हा परिषदेच्या सिंचाई ...

शेतकऱ्यांच्या शेताला पाणी बंद : परिसरात प्रदूषण वाढलेमूल : तालुक्यातील मरेगाव स्थित ग्रेटा एनर्जी कंपनीने वीज उत्पादन केल्यानंतर निघणारी राख चक्क जिल्हा परिषदेच्या सिंचाई विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या तलावात टाकल्याने शेताकडे जाणारा पाण्याचा प्रवाह थांबला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेताला पाणी पोहचणे बंद झाले आहे. तसेच राखेमुळे परिसरात प्रदूषण वाढले आहे. याबाबत मरेगावच्या नागरिकांनी आमदार शोभाताई फडणवीस यांच्याकडे तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.मूल तालुक्यातील मरेगाव, आकापूर या गावालगत अनेक उद्योग कार्यरत आहेत. तसेच उद्योगासाठी जवळपास सर्वच जमीन भूसंपादित करण्यात आली आहे. परिसरात उद्योग येत आहेत, ही चांगली बाब असली तरी उत्पादनानंतर निघणाऱ्या राखीची विल्हेवाट लावणे हेही तेवढेच महत्त्वाचे काम आहे. येथील ग्रेटा एनर्जी कंपनीने वीज उत्पादन केल्यानंतर राख टाकण्यासाठी बाबुराव लिंगा पेंदोर व इतर जणांकडून करारनाम्यानुसार जागा भाड्याने घेतली. वास्तविक सदर जागा शासकीय वाटपात मिळाली असल्याने भाड्याने देता येत नाही. असे असतानादेखील भाड्याने जागा घेऊन कंपनीने राख टाकण्यास सुरूवात केली. राख एवढ्या मोठ्या प्रमाणात टाकली गेली की जवळच असलेल्या जिल्हा परिषद सिंचाई विभागाच्या तलावातील नहरातसुद्धा पसरली आहे. त्यामुळे तलावातील पाण्याचा प्रवाह बंद झाला. या राखेमुळे प्रदूषणदेखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. जवळच्या शेतकऱ्यांना या राखेमुळे शेती करणे कठीण झाले आहे. गावातील नागरिकांनी आमदार शोभाताई फडणवीस यांची भेट घेऊन माहिती दिली. यावेळी फडणवीस, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष रावत, राकेश रत्नावार आदींनी तलावाची पाहणी केली. (तालुका प्रतिनिधी)