शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
4
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
5
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
6
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
7
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
8
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
9
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
10
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
11
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
12
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
13
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
14
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
15
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
16
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
17
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
18
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
19
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
20
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!

कंपनीने राख टाकल्याने तलावातील पाण्याचा प्रवाह थांबला

By admin | Updated: September 27, 2015 00:44 IST

तालुक्यातील मरेगाव स्थित ग्रेटा एनर्जी कंपनीने वीज उत्पादन केल्यानंतर निघणारी राख चक्क जिल्हा परिषदेच्या सिंचाई ...

शेतकऱ्यांच्या शेताला पाणी बंद : परिसरात प्रदूषण वाढलेमूल : तालुक्यातील मरेगाव स्थित ग्रेटा एनर्जी कंपनीने वीज उत्पादन केल्यानंतर निघणारी राख चक्क जिल्हा परिषदेच्या सिंचाई विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या तलावात टाकल्याने शेताकडे जाणारा पाण्याचा प्रवाह थांबला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेताला पाणी पोहचणे बंद झाले आहे. तसेच राखेमुळे परिसरात प्रदूषण वाढले आहे. याबाबत मरेगावच्या नागरिकांनी आमदार शोभाताई फडणवीस यांच्याकडे तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.मूल तालुक्यातील मरेगाव, आकापूर या गावालगत अनेक उद्योग कार्यरत आहेत. तसेच उद्योगासाठी जवळपास सर्वच जमीन भूसंपादित करण्यात आली आहे. परिसरात उद्योग येत आहेत, ही चांगली बाब असली तरी उत्पादनानंतर निघणाऱ्या राखीची विल्हेवाट लावणे हेही तेवढेच महत्त्वाचे काम आहे. येथील ग्रेटा एनर्जी कंपनीने वीज उत्पादन केल्यानंतर राख टाकण्यासाठी बाबुराव लिंगा पेंदोर व इतर जणांकडून करारनाम्यानुसार जागा भाड्याने घेतली. वास्तविक सदर जागा शासकीय वाटपात मिळाली असल्याने भाड्याने देता येत नाही. असे असतानादेखील भाड्याने जागा घेऊन कंपनीने राख टाकण्यास सुरूवात केली. राख एवढ्या मोठ्या प्रमाणात टाकली गेली की जवळच असलेल्या जिल्हा परिषद सिंचाई विभागाच्या तलावातील नहरातसुद्धा पसरली आहे. त्यामुळे तलावातील पाण्याचा प्रवाह बंद झाला. या राखेमुळे प्रदूषणदेखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. जवळच्या शेतकऱ्यांना या राखेमुळे शेती करणे कठीण झाले आहे. गावातील नागरिकांनी आमदार शोभाताई फडणवीस यांची भेट घेऊन माहिती दिली. यावेळी फडणवीस, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष रावत, राकेश रत्नावार आदींनी तलावाची पाहणी केली. (तालुका प्रतिनिधी)