शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पऱ्हाटीला जगविण्यासाठी बादलीने पाणी

By admin | Updated: June 26, 2017 00:32 IST

पाऊस येईल या आशेवर शेतकऱ्यांनी शेतात पऱ्हाटीची लागवड केली. एक दोन वेळा पाऊस येऊन निघून गेला. आकाशात ढग जमतात. पण पाऊस येत नाही.

शेतकऱ्यांची केविलवाणी धडपड : आकाशात ढग जमतात; पण पाऊस येईना !प्रकाश काळे । लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : पाऊस येईल या आशेवर शेतकऱ्यांनी शेतात पऱ्हाटीची लागवड केली. एक दोन वेळा पाऊस येऊन निघून गेला. आकाशात ढग जमतात. पण पाऊस येत नाही. अपुऱ्या पावसाने जमिनीत टाकलेले कपाशीचे बियाणे सडून गेले. मात्र आहे ते तरी बियाणे उगवेल, या एकाच आशेपोटी जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा पऱ्हाटीला वाचविण्यासाठी बादलीने पाणी टाकत आहे.राजुरा तालुक्यातील गोवरी येथील शेतकरी भास्कर जुनघरी यांनी कपाशीला जगविण्यासाठी बादलीने पाणी टाकण्याची अनोखी धडपड चालविली आहे. पाणी टाकले नाही तर पऱ्हाटी जिवंत राहणार नाही. म्हणून गडीमाणसांना सोबत घेऊन हा युवा शेतकरी कपाशीला वाचविण्यासाठी जीवनाचे रान करीत आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. आकाशात काळे ढग जमतात. मात्र पाऊस शेतकऱ्यांना वाकुल्या दाखवित निघून जात आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे, त्यांनी शेतात सिंचन करुन पऱ्हाटीला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र विजेच्या लपंडावामुळे शेतकऱ्यांना पाणी देऊन पिक जगविता येत नाही, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. शेतीचे दिवस आज वाईट आले आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहायला तयार नाही. निसर्ग साथ देत नाही. अस्मानी, सुल्तानी संकटात शेतकरी नेहमीच भरडला जातो. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ, शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती कर्जबाजारीपणाचा फास अधिकच गच्च आवळत आहे. यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने दगा दिला. पाऊस येईल या एकाच आशेवर शेतकऱ्यांनी धूळ पेरणी करुन ठेवली होती. यावर्षी समाधानकारक पाऊस पडेल, असे भाकीत हवामान खात्याने वर्तविले होते. मात्र विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने हुलकावनी दिली. एक-दोन वेळा पाऊस येऊन अचानक गायब झाला. कपाशीला उगवणीसाठी दोन- तीन दिवसाआड पाणी देणे आवश्यक असते. पाऊस वेळेवर आला नाही तर जमिनीत लागवड केलेले बियाणे सडून मातीमोल होण्याचा धोका असतो आणि नेमके शेतकऱ्यांच्या बाबतीत हेच घडत आहे. उसनवारी व कर्ज काढून बहुतांश शेतकऱ्यांनी यावर्षी बि-बियाण्यांची जुळवाजुळव करुन शेती केली. सुरुवातीपासूनच पाऊस येईल या आशेवर कपाशीची लागवड केली. मात्र क्षणातच पावसाने शेतकऱ्यांकडे पाठ फिरविली. पाऊस येत नसल्याने संकट आणखी वाढले असून गोवरी परिसरात बादलीने पाणी टाकून पऱ्हाटीला वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकरी करताना दिसत आहे. पाण्याअभावी शेती झाली रामभरोसेकृषीप्रधान देशातील शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. पाऊस पडत नसल्याने शेतीला अवकळा आली आहे. सरकारसह निसर्गानेही आता शेतकऱ्यांची साथ सोडली आहे. शेती पिकण्याचा कोणताच भरवसा उरला नसल्याने शेती आता रामभरोसे झाली आहे.शेतात पऱ्हाटी पिकाची लागवड केली आहे. तुरळक पावसाने कपाशीचे बियाणे सडून मातीमोल होण्याचा धोका आहे. पाण्याची नितांत आवश्यकता असताना पाऊस येत नसल्याने बादलीने पाणी टाकून कपाशीला वाचविण्याचा प्रयत्न सुरु आहे.- भास्कर जुनघरी, शेतकरी गोवरी