शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
5
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
6
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
7
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
8
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
9
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
10
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
11
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
12
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
13
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
14
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
15
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
16
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
17
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
18
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
19
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी

पऱ्हाटीला जगविण्यासाठी बादलीने पाणी

By admin | Updated: June 26, 2017 00:32 IST

पाऊस येईल या आशेवर शेतकऱ्यांनी शेतात पऱ्हाटीची लागवड केली. एक दोन वेळा पाऊस येऊन निघून गेला. आकाशात ढग जमतात. पण पाऊस येत नाही.

शेतकऱ्यांची केविलवाणी धडपड : आकाशात ढग जमतात; पण पाऊस येईना !प्रकाश काळे । लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : पाऊस येईल या आशेवर शेतकऱ्यांनी शेतात पऱ्हाटीची लागवड केली. एक दोन वेळा पाऊस येऊन निघून गेला. आकाशात ढग जमतात. पण पाऊस येत नाही. अपुऱ्या पावसाने जमिनीत टाकलेले कपाशीचे बियाणे सडून गेले. मात्र आहे ते तरी बियाणे उगवेल, या एकाच आशेपोटी जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा पऱ्हाटीला वाचविण्यासाठी बादलीने पाणी टाकत आहे.राजुरा तालुक्यातील गोवरी येथील शेतकरी भास्कर जुनघरी यांनी कपाशीला जगविण्यासाठी बादलीने पाणी टाकण्याची अनोखी धडपड चालविली आहे. पाणी टाकले नाही तर पऱ्हाटी जिवंत राहणार नाही. म्हणून गडीमाणसांना सोबत घेऊन हा युवा शेतकरी कपाशीला वाचविण्यासाठी जीवनाचे रान करीत आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. आकाशात काळे ढग जमतात. मात्र पाऊस शेतकऱ्यांना वाकुल्या दाखवित निघून जात आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे, त्यांनी शेतात सिंचन करुन पऱ्हाटीला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र विजेच्या लपंडावामुळे शेतकऱ्यांना पाणी देऊन पिक जगविता येत नाही, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. शेतीचे दिवस आज वाईट आले आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहायला तयार नाही. निसर्ग साथ देत नाही. अस्मानी, सुल्तानी संकटात शेतकरी नेहमीच भरडला जातो. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ, शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती कर्जबाजारीपणाचा फास अधिकच गच्च आवळत आहे. यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने दगा दिला. पाऊस येईल या एकाच आशेवर शेतकऱ्यांनी धूळ पेरणी करुन ठेवली होती. यावर्षी समाधानकारक पाऊस पडेल, असे भाकीत हवामान खात्याने वर्तविले होते. मात्र विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने हुलकावनी दिली. एक-दोन वेळा पाऊस येऊन अचानक गायब झाला. कपाशीला उगवणीसाठी दोन- तीन दिवसाआड पाणी देणे आवश्यक असते. पाऊस वेळेवर आला नाही तर जमिनीत लागवड केलेले बियाणे सडून मातीमोल होण्याचा धोका असतो आणि नेमके शेतकऱ्यांच्या बाबतीत हेच घडत आहे. उसनवारी व कर्ज काढून बहुतांश शेतकऱ्यांनी यावर्षी बि-बियाण्यांची जुळवाजुळव करुन शेती केली. सुरुवातीपासूनच पाऊस येईल या आशेवर कपाशीची लागवड केली. मात्र क्षणातच पावसाने शेतकऱ्यांकडे पाठ फिरविली. पाऊस येत नसल्याने संकट आणखी वाढले असून गोवरी परिसरात बादलीने पाणी टाकून पऱ्हाटीला वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकरी करताना दिसत आहे. पाण्याअभावी शेती झाली रामभरोसेकृषीप्रधान देशातील शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. पाऊस पडत नसल्याने शेतीला अवकळा आली आहे. सरकारसह निसर्गानेही आता शेतकऱ्यांची साथ सोडली आहे. शेती पिकण्याचा कोणताच भरवसा उरला नसल्याने शेती आता रामभरोसे झाली आहे.शेतात पऱ्हाटी पिकाची लागवड केली आहे. तुरळक पावसाने कपाशीचे बियाणे सडून मातीमोल होण्याचा धोका आहे. पाण्याची नितांत आवश्यकता असताना पाऊस येत नसल्याने बादलीने पाणी टाकून कपाशीला वाचविण्याचा प्रयत्न सुरु आहे.- भास्कर जुनघरी, शेतकरी गोवरी