शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
2
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
3
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
4
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
5
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
6
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
7
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
9
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
10
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
11
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
12
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
13
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
14
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
15
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
16
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
17
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
18
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
19
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
20
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   

पऱ्हाटीला जगविण्यासाठी बादलीने पाणी

By admin | Updated: June 26, 2017 00:32 IST

पाऊस येईल या आशेवर शेतकऱ्यांनी शेतात पऱ्हाटीची लागवड केली. एक दोन वेळा पाऊस येऊन निघून गेला. आकाशात ढग जमतात. पण पाऊस येत नाही.

शेतकऱ्यांची केविलवाणी धडपड : आकाशात ढग जमतात; पण पाऊस येईना !प्रकाश काळे । लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : पाऊस येईल या आशेवर शेतकऱ्यांनी शेतात पऱ्हाटीची लागवड केली. एक दोन वेळा पाऊस येऊन निघून गेला. आकाशात ढग जमतात. पण पाऊस येत नाही. अपुऱ्या पावसाने जमिनीत टाकलेले कपाशीचे बियाणे सडून गेले. मात्र आहे ते तरी बियाणे उगवेल, या एकाच आशेपोटी जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा पऱ्हाटीला वाचविण्यासाठी बादलीने पाणी टाकत आहे.राजुरा तालुक्यातील गोवरी येथील शेतकरी भास्कर जुनघरी यांनी कपाशीला जगविण्यासाठी बादलीने पाणी टाकण्याची अनोखी धडपड चालविली आहे. पाणी टाकले नाही तर पऱ्हाटी जिवंत राहणार नाही. म्हणून गडीमाणसांना सोबत घेऊन हा युवा शेतकरी कपाशीला वाचविण्यासाठी जीवनाचे रान करीत आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. आकाशात काळे ढग जमतात. मात्र पाऊस शेतकऱ्यांना वाकुल्या दाखवित निघून जात आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे, त्यांनी शेतात सिंचन करुन पऱ्हाटीला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र विजेच्या लपंडावामुळे शेतकऱ्यांना पाणी देऊन पिक जगविता येत नाही, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. शेतीचे दिवस आज वाईट आले आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहायला तयार नाही. निसर्ग साथ देत नाही. अस्मानी, सुल्तानी संकटात शेतकरी नेहमीच भरडला जातो. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ, शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती कर्जबाजारीपणाचा फास अधिकच गच्च आवळत आहे. यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने दगा दिला. पाऊस येईल या एकाच आशेवर शेतकऱ्यांनी धूळ पेरणी करुन ठेवली होती. यावर्षी समाधानकारक पाऊस पडेल, असे भाकीत हवामान खात्याने वर्तविले होते. मात्र विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने हुलकावनी दिली. एक-दोन वेळा पाऊस येऊन अचानक गायब झाला. कपाशीला उगवणीसाठी दोन- तीन दिवसाआड पाणी देणे आवश्यक असते. पाऊस वेळेवर आला नाही तर जमिनीत लागवड केलेले बियाणे सडून मातीमोल होण्याचा धोका असतो आणि नेमके शेतकऱ्यांच्या बाबतीत हेच घडत आहे. उसनवारी व कर्ज काढून बहुतांश शेतकऱ्यांनी यावर्षी बि-बियाण्यांची जुळवाजुळव करुन शेती केली. सुरुवातीपासूनच पाऊस येईल या आशेवर कपाशीची लागवड केली. मात्र क्षणातच पावसाने शेतकऱ्यांकडे पाठ फिरविली. पाऊस येत नसल्याने संकट आणखी वाढले असून गोवरी परिसरात बादलीने पाणी टाकून पऱ्हाटीला वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकरी करताना दिसत आहे. पाण्याअभावी शेती झाली रामभरोसेकृषीप्रधान देशातील शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. पाऊस पडत नसल्याने शेतीला अवकळा आली आहे. सरकारसह निसर्गानेही आता शेतकऱ्यांची साथ सोडली आहे. शेती पिकण्याचा कोणताच भरवसा उरला नसल्याने शेती आता रामभरोसे झाली आहे.शेतात पऱ्हाटी पिकाची लागवड केली आहे. तुरळक पावसाने कपाशीचे बियाणे सडून मातीमोल होण्याचा धोका आहे. पाण्याची नितांत आवश्यकता असताना पाऊस येत नसल्याने बादलीने पाणी टाकून कपाशीला वाचविण्याचा प्रयत्न सुरु आहे.- भास्कर जुनघरी, शेतकरी गोवरी