शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
3
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
4
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
5
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
6
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
7
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
8
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
9
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
10
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
11
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
12
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
13
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
14
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
15
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
16
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
17
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
20
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू

सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 23:13 IST

जिल्ह्यात शाश्वत स्वच्छतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी शौचालयाच्या नियमित वापरासह गावस्तरावर सांडपाणी व घनकचऱ्याचे शास्त्रोक्त पध्दतीने व्यवस्थापन करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने एन. डी. हॉटेल येथे घेण्यात आलेल्या सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळेत ते बोलत होते.

ठळक मुद्देराहुल कर्डिले : जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागातर्फे कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात शाश्वत स्वच्छतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी शौचालयाच्या नियमित वापरासह गावस्तरावर सांडपाणी व घनकचऱ्याचे शास्त्रोक्त पध्दतीने व्यवस्थापन करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने एन. डी. हॉटेल येथे घेण्यात आलेल्या सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळेत ते बोलत होते.अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार तर प्रमुख मार्गदर्शक कर्जत नगरपरिषदचे मुख्याधिकारी रामदास कोकरे, दिल्ली येथील साहस संस्थेच्या प्रकल्प संचालक सोनिया गर्ग, स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे कार्यकारी संचालक सुधाकर बोबडे घनकचरा व्यवस्थापक दामोधर पुजारी, निकिता गुंडेचा, सिनिथा जयराम आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी डॉ. खेमणार म्हणाले, घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न सर्वांनाच काळजीत टाकणारा आहे. समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रत्येकाने स्वच्छतेचे प्रेरक म्हणून भूमिका पार पाडावी. स्वच्छतेच्या सवयी बालमनापासून देण्यासाठी शाळेपासुन सुरवात करावी. कर्जत नगरपरिषदचे मुख्याधिकारी कोकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला व रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे राबविलेल्या घनकचरा प्रकल्पांची माहिती दिली. उपस्थितांनी विविध पैलुंवर चर्चा केली.प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) विजय पचारे यांनी केले. कार्यशाळेला सरपंच, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यावेळी उपस्थित होते.