शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सावधान पुढील पाच दिवसांत उष्णतेची लाट

By admin | Updated: April 19, 2016 05:12 IST

गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूरच्या तापमानात वेगाने वाढ होत असून येत्या पाच दिवसांत विदर्भासह चंद्रपुरात उष्णतेची

चंद्रपूर: गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूरच्या तापमानात वेगाने वाढ होत असून येत्या पाच दिवसांत विदर्भासह चंद्रपुरात उष्णतेची लाट येऊन धडकण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुढील पाच दिवसांत दुपारच्यावेळी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असा इशारा चंद्रपूर शहर महानगरपालिकेने दिला आहे. सध्या सर्वाधिक प्रखरतेने सूर्य आग ओकत आहे. शनिवारी ४४.८ तर रविवारी ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद येथे करण्यात आली. सूर्य पृथ्वीच्या मध्यावर म्हणजेच विषववृत्तावर येत असल्याने पृथ्वीवर त्याची सर्वाधिक ऊर्जा पोहचत आहे. त्यामुळे सूर्यापासून आपला बचाव करण्यासाठी दुपारच्यावेळी कुणीही घराबाहेर पडू नये, असा सल्ला या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांनी दिला आहे. आगामी चार ते पाच दिवस सूर्य अगदी डोक्यावर येणार आहे. या बदलाला ‘इक्विनॉक्स फिनॉमिना’ असे म्हणतात. (प्रतिनिधी)असे होतील दुष्परिणाम४कडक उन्ह असल्याने उष्माघात होण्याची शक्यता वाढते. शरिरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने प्रसंगी मृत्यू ओढवण्याची शक्यता असते. अतिनील किरणांचाही सर्वाधिक त्रास या काळात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात जास्तीत जास्त पाणी प्यावे. या काळात डोळ्यांचे आजारही बळावण्याची शक्यता आहे. डोळे येण्याचे प्रमाणही वाढू शकते. ज्यांना हृदयविकार मधुमेहाचा त्रास आहे, त्यांनी व्यवस्थित तपासणी करीत रहावे. आहारामध्ये रसदार फळांचा वापर अधिक करावा तसेच मांसाहार करणे टाळावे.टोल फ्री १०८ क्रमांकावर आरोग्य सेवा४अस्वस्थपणा, थकवा, शरीर तापणे, अशक्तपणा, अंगदुखी, डोकेदुखी, मळमळ, ही उष्माघाताची लक्षणे आहेत. उष्माघात झाल्यास मनपा आरोग्य केंद्र किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयात त्वरीत औषधोपचार करून घ्यावा. तसेच १०८ या टोल फ्री दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून आकस्मीक आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर वसंत देशमुख, स्थायी समिती सभापती संतोष लहामगे, सभापती एस्तेर शिरवार यांनी केले आहे. उन्हामुळे मृत्यू का होतो ?४आपल्या शरीराचे तापमान नेहमी ३७ अंश सेल्सिअस असतं. या तापमानातच शरिरातील सर्व अवयव निट काम करू शकतात. घामाच्या रुपाने पाणी बाहेर काढून शरीर ३७ अंश सेल्सिअस तापमान कायम राखतं. सतत घाम निघत असताना पाणी पित राहणे अत्यंत गरजेचे आहे. पाणी शरिरात इतरही अधिक महत्वाची कामं करतं. त्यामुळे शरिरातील पाण्याचा साठा कमी झाला तर शरीर घामाच्या रुपाने पाणी बाहेर टाकणं टाळतं. जेव्हा बाहेरचे तापमान ४५ अंशाच्या पुढे जातं आणि शरीरातील कूलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होते, तेव्हा शरीराचं तापमान ३७ च्या पुढे जाऊ लागतं. प्रकृती गंभीर होऊन माणूस प्रसंगी दगावतो.