शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

वर्धा नदी पट्ट्यातील शेती सिंचनापासून वंचित

By admin | Updated: December 7, 2014 22:49 IST

राजुरा आणि कोरपना तालुक्यांतर्गत वर्धा नदी पट्ट्यात येणाऱ्या गावात कमी दाबाचा विद्युत पुरवठा होत असल्याने मोटार पंप चालत नसून विहिरीत तथा बोअरवेलमध्ये पाणी असूनही शेती सिंचनापासून

चंद्रपूर : राजुरा आणि कोरपना तालुक्यांतर्गत वर्धा नदी पट्ट्यात येणाऱ्या गावात कमी दाबाचा विद्युत पुरवठा होत असल्याने मोटार पंप चालत नसून विहिरीत तथा बोअरवेलमध्ये पाणी असूनही शेती सिंचनापासून वंचित राहत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांत तीव्र असंतोष पसरला आहे.वर्धा नदी पट्ट्यातील कोलगाव, कढोली बु. मानोली, बाबापूर, चार्ली, निर्ली, धिडशी, पेल्लोरा, मार्डा, कुर्ली, किनबोडी, वरोडा, नांदगाव सूर्याचा, साखरी वाघोबा, पोवनी, माथरा, गोवरी, कोराडी, निमनी, चिंचोली, कवठाळा, जैतापूर, अंतरगाव, गोयगाव आदी गावातील शेतजमीन सुपिक आहे. कापूस, मिरची, सोयाबिन, गहू, चणा आदी या भागातील प्रमुख पीक आहेत. येथील कास्तकारांनी आपले शेतात मोठी गुंतवणूक करुन बोअरवेल आणि विहीरीचे बांधकाम केले. मात्र मुबलक पाणी असताना देखील कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे मोटारपंप जळत आहेत. परिणामी पिकांना पाण्याची गरज असतानाही ते देता येत नसल्यामुळे पीक डोळ्यादेखत करपत आहेत. यामुळे मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.या परिसराला विरुर स्टेशन येथील सबस्टेशनमधुन विद्युत पुरवठा होतो. गोवरी येथे याचे फिडर आहे. मात्र लोड वाढल्यामुळे कमी व्होल्टेजचा वीजपुरवठा होतो अथवा वारंवार वीजपुरवठा खंडीत होतो. या पार्श्वभूमीवर येथील शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे यांनी वीज वितरण कंपनीकडे पाठपुरावा केल्यामुळे नव्या सब स्टेशनच्या प्रस्ताव तयार करण्यात आला. मात्र जागा उपलब्ध न झाल्यामुळे मंजुरी मिळाली नसल्याचे कंपनीचे अधिकारी सांगतात. वास्तविक वरोडा, निर्ली आणि साखरी येथे शासकीय जमीन उपलब्ध असून वीज वितरण कंपनीने हा प्रश्न ताबडतोब मार्गी लावावा, अशी मागणी उमाकांत धांडे यांनी केली आहे. लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने या परिसरातील कास्तकारांचे अडचणींचा विचार करुन संवेदनशिलता दाखवित हा प्रश्न त्वरित मार्गी लावावा, अशी मागणी उमाकांत धांडे, लक्ष्मणराव एकरे, विनोद झाडे, रामदास पाटील उपरे, रमेश पाटील झाडे, बळीराम वैद्य, दीपक पानघाटे, रतन वैद्य, मंगेश भोयर, किशोर ढुमणे, सुरेश पोडे, घटे, उत्तम बोबडे, अरुण उरकुडे, नत्थू पाटील बोबडे, लहू पाटील भोयर, कवडू कौरासे, कवडू गोरे, रवींद्र चटके, सुरेश वराटे, सुभाष गानफाडे, पुंडलिक ताजणे, गजानन एकरे, हेमराज जेनेकर, गणपत हिंगाणे, दीपक पाचभाई, श्रावण मालेकर, नीळकंठ दुबे, संजय उमरे, सुनील वनकर, नंदकिशोर कौरासे, मारोती क्षीरसागर, संजय गोरे, सुरेश ढुमणे आणि परिसरातील कास्तकारांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)