शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
2
Operation Sindoor Live Updates: भारताच्या बलाढ्य सैन्याला, सशस्त्र दलांना, गुप्तचर संस्थांना आणि शास्त्रज्ञांना सलाम- पंतप्रधान मोदी
3
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
4
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
5
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
6
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
7
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
8
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
9
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
10
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
11
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
12
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
13
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
14
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
15
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
16
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न
17
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
18
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
19
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
20
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा

गोवरी शिवारासाठी वेकोलिचे ढिगारे मारक

By admin | Updated: September 24, 2015 01:14 IST

वेकोलिच्या बल्लारपूर उपक्षेत्रांतर्गत पोवनी खुल्या कोळसा खाणीकरिता गोवरी शेतशिवारातील नाल्यालगत मातीचे मोठमोठे ढिगारे तयार झाले आहेत.

दीडशे एकर शेती पाण्यात : ढिगाऱ्यांमुळे पाण्याचा प्रवाह बदललासास्ती : वेकोलिच्या बल्लारपूर उपक्षेत्रांतर्गत पोवनी खुल्या कोळसा खाणीकरिता गोवरी शेतशिवारातील नाल्यालगत मातीचे मोठमोठे ढिगारे तयार झाले आहेत. त्यामुळे पाण्याचा प्रवाह बदलला असून दक्षिण- उत्तर दिशेच्या नाल्याचा प्रवाह दक्षिण- पूर्व झाल्याने परिसरातील दीडशे एकरातील उभ्या पिकांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली असून वेकोलिने याची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.सास्ती, पोवनी परिसरात वेकोलिच्या कोळसा खाणीचे जाळे पसरले आहे. सध्या सात- आठ खाणीमधून कोळसा काढला जातो. तसेच इरावती प्रकल्पांतर्गत पोवनी दोन आणि तीनचे काम सुरु होणार आहे. गोवरी शेतशिवारालगत पोवनी खुल्या खाणीचे काम प्रगतीपथावर आहे. याच शिवारातून दक्षिण ते उत्तर दिशेने वाहणारा जिवंत नाला आहे. या नाल्यातील पाण्यातूनच परिसरातील शेतकरी शेती फूलवीत आहेत. पण मागील काही वर्षापासून हा नाला शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरला आहे. या नाल्याच्या काठावर वेकोलि प्रशासनाने माती टाकली आहे. सततच्या मातीच्या साठ्यामुळे याच ेरुपांतर ढिगाऱ्यात झाले आहे. या उंच ढिगाऱ्यांमुळे परिसरातील शेतकरी चांगलाच वैतागला आहे. आता तर या ढिगाऱ्यांमुळे नाल्यातील पाण्याचा प्रवास बदलला आहे. पूर्वी दक्षिण- उत्तर असा प्रवाह होता. मात्र आता दक्षिण पूर्व दिशेने हा प्रवाह बदलल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखीच वाढली आहे. यावर्षी झालेल्या पावसाळ्यात जून महिन्यात शेतकरी सुखावला होता. त्यांनी शेतात सोयाबिन, मिरची, कापूस पिकाची लागवड केली. ही पिके हिरवीगार असतानाच जून महिन्यातच नाल्याच्या ‘बॅक वॉटर’चा फटका पिकांना बसला आहे. पाण्याच्या बदलत्या प्रवाहामुळे पाणी शेतात शिरले आहे. त्यामुळे जवळपास दीडशे एकर शेतातील पिके पाण्याखाली आल्याने जमीनदोस्त झाली आहेत.या संकटाचा सामना करीत शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. या दुबार पेरणीनंतर पुन्हा पिके डोलायला लागली होती. मिळालेल्या उत्पन्नातून आर्थिक अडचण दूर होईल, असा विश्वास मनाशी बाळगून स्वप्ने रंगवीत असतानाच पुन्हा एकदा शेतकरी हवालदिल झाला आहे. या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा नाल्याचे पाणी शेतात शिरले. त्यामुळे संपूर्ण शेतपीक पाण्याखाली आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. परिणामी कापूस, सोयाबिन नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दोन- तीन दिवस शिवार जलमय असल्याने पिके करपण्याची शक्यता बळावली आहे. (वार्ताहर)