शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

गोवरी शिवारासाठी वेकोलिचे ढिगारे मारक

By admin | Updated: September 24, 2015 01:14 IST

वेकोलिच्या बल्लारपूर उपक्षेत्रांतर्गत पोवनी खुल्या कोळसा खाणीकरिता गोवरी शेतशिवारातील नाल्यालगत मातीचे मोठमोठे ढिगारे तयार झाले आहेत.

दीडशे एकर शेती पाण्यात : ढिगाऱ्यांमुळे पाण्याचा प्रवाह बदललासास्ती : वेकोलिच्या बल्लारपूर उपक्षेत्रांतर्गत पोवनी खुल्या कोळसा खाणीकरिता गोवरी शेतशिवारातील नाल्यालगत मातीचे मोठमोठे ढिगारे तयार झाले आहेत. त्यामुळे पाण्याचा प्रवाह बदलला असून दक्षिण- उत्तर दिशेच्या नाल्याचा प्रवाह दक्षिण- पूर्व झाल्याने परिसरातील दीडशे एकरातील उभ्या पिकांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली असून वेकोलिने याची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.सास्ती, पोवनी परिसरात वेकोलिच्या कोळसा खाणीचे जाळे पसरले आहे. सध्या सात- आठ खाणीमधून कोळसा काढला जातो. तसेच इरावती प्रकल्पांतर्गत पोवनी दोन आणि तीनचे काम सुरु होणार आहे. गोवरी शेतशिवारालगत पोवनी खुल्या खाणीचे काम प्रगतीपथावर आहे. याच शिवारातून दक्षिण ते उत्तर दिशेने वाहणारा जिवंत नाला आहे. या नाल्यातील पाण्यातूनच परिसरातील शेतकरी शेती फूलवीत आहेत. पण मागील काही वर्षापासून हा नाला शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरला आहे. या नाल्याच्या काठावर वेकोलि प्रशासनाने माती टाकली आहे. सततच्या मातीच्या साठ्यामुळे याच ेरुपांतर ढिगाऱ्यात झाले आहे. या उंच ढिगाऱ्यांमुळे परिसरातील शेतकरी चांगलाच वैतागला आहे. आता तर या ढिगाऱ्यांमुळे नाल्यातील पाण्याचा प्रवास बदलला आहे. पूर्वी दक्षिण- उत्तर असा प्रवाह होता. मात्र आता दक्षिण पूर्व दिशेने हा प्रवाह बदलल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखीच वाढली आहे. यावर्षी झालेल्या पावसाळ्यात जून महिन्यात शेतकरी सुखावला होता. त्यांनी शेतात सोयाबिन, मिरची, कापूस पिकाची लागवड केली. ही पिके हिरवीगार असतानाच जून महिन्यातच नाल्याच्या ‘बॅक वॉटर’चा फटका पिकांना बसला आहे. पाण्याच्या बदलत्या प्रवाहामुळे पाणी शेतात शिरले आहे. त्यामुळे जवळपास दीडशे एकर शेतातील पिके पाण्याखाली आल्याने जमीनदोस्त झाली आहेत.या संकटाचा सामना करीत शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. या दुबार पेरणीनंतर पुन्हा पिके डोलायला लागली होती. मिळालेल्या उत्पन्नातून आर्थिक अडचण दूर होईल, असा विश्वास मनाशी बाळगून स्वप्ने रंगवीत असतानाच पुन्हा एकदा शेतकरी हवालदिल झाला आहे. या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा नाल्याचे पाणी शेतात शिरले. त्यामुळे संपूर्ण शेतपीक पाण्याखाली आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. परिणामी कापूस, सोयाबिन नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दोन- तीन दिवस शिवार जलमय असल्याने पिके करपण्याची शक्यता बळावली आहे. (वार्ताहर)