शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

१२ हजार रूग्ण अवयवांच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: August 30, 2016 00:34 IST

राज्यातील सुमारे १२ हजार रूग्ण अवयवांच्या प्रतिक्षेत आहेत. गरजूला अवयव मिळून त्यालाही सामान्य नागरिकाप्रमाणे जगता यावे,...

चंद्रपूर : राज्यातील सुमारे १२ हजार रूग्ण अवयवांच्या प्रतिक्षेत आहेत. गरजूला अवयव मिळून त्यालाही सामान्य नागरिकाप्रमाणे जगता यावे, यासाठी राज्यशासन अवयव दानासाठी नागरिकांत जागृती करणार आहे. राज्यात एकाचवेळी राज्य ते तालुकास्तरापर्यंत महाअवयवदान अभियान राबविण्यात येणार असून या अभियानाची सुरूवात ३० आॅगस्टपासून होत आहे. त्यामुळे अवयवदानासाठी प्रतिक्षेत असलेल्या रूग्णांना या अभियानातून नवसंजीवनी मिळणार आहे. रक्त आणि नेत्रज्ञानासाठी अनेक जण समोर येत असल्याने आज समाजामध्ये जागरूकता निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे अवदानाचीही चळवळ मोठ्या प्रमाणावर राबवून समाजाचा सहभाग वाढविण्यावर आता शासन प्रयत्न करणार आहे. जागतिक पातळीवर मृत्यूनंतर होणाऱ्या अवयवदानामध्ये भारतीय नागरिकांचा सहभाग अत्यल्प आहे. त्यामुळेच सामाजिक आणि कौटुंबिक जनजागृतीतून अवयवदानाबाबत आमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी ३० आॅगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान महाअवयवदान शिबिर राज्यभर घेण्यात येणार आहेत.जिवंत किंवा मृत्यूनंतर दुसऱ्या व्यक्तीचे जे अवयव निकामी झाले आहे, त्यांना अवयवदान करून नवजीवन देण्याचा हा प्रयत्न राहणार आहे. अवयवाचा पूर्ण किंवा काही भाग शस्त्रक्रियेद्वारे काढून तो गरजवंतामध्ये प्रत्यारोपित करण्यात येतो. मेंदूस्तंभ मृत्यू झालेल्या रूग्णाचे साधारणत: सर्वच अवयव दान करता येऊ शकतात. सामान्य मृत्यूमध्ये केवळ डोळे आणि त्वचेचे दान तर जिवंतपणी केवळ मूत्रपिंड, यकृताचा काही भाग दान करू शकतो. हे अवयव केवळ जवळच्या नातेवाईकांमध्येच दान करू शकते. मस्तिकस्तंभ मृत्यूनंतर रूग्णालयातच अवयवनाचे दान होऊ शकते. अवयवदानानंतर मृत व्यक्तीचे शरीर सन्मानपूर्वक त्यांच्या नातेवाईकांना अंत्यविधीसाठी परत दिले जाते. दान केलेले अवयव शासनाच्या नियमानुसार प्रतिक्षेतील गरजू रूग्णांनाच दिले जाते. यासाठी समन्वय समिती असून त्यांच्यामार्फत पारदर्शक पद्धतीने ही सर्व कार्यवाही होते. अवयव कोणत्या व्यक्तीला दिले आहे, याची माहिती अवयवदान करणाऱ्या नातेवाईकांना सांगितली जात नाही.एखाद्या जिवंत व्यक्तीवर करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियेप्रमाणे अवयव काढल्या जातात. त्यामुळे दात्याच्या शरीरावर विद्रुपता येत नाही. शरीरावर, पोटावर आणि छातीवर शस्त्रक्रिया केल्याचे टाके मात्र राहतात. अवयवदानासाठी कोणताही मोबदला दिला जात नसल्याने हे शुद्ध आणि श्रेष्ठदान आहे. त्यामुळे अवयवदानाची इच्छा असलेल्यांनी संमतीपत्र, नातेवाईकांची परवानगी घेऊन नागरिकांनी अवयवदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)महाफेरीने अभियानाचा शुभारंभअवयव दानाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी ३० आॅगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. या महाअवयवदानाची सुरुवात मंगळवारी सकाळी ८ वाजता जागृती महारॅलीने होणार आहे. ही रॅली सकाळी ८ वाजता वैद्यकीय महाविद्यालय येथून शुभारंभ होईल. ही महाफेरी रामनगर, जटपुरा गेट मार्गे गांधी चौक येथे विसर्जित होईल. रॅलीदरम्यान जनजागृतीपर पथनाट्य सादर केले जाणार आहेत.पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार सन्मान१ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते अवयवदानासाठी नोंदणी केलेल्यांचा व अवयवदान केलेल्या व्यक्तींचा सन्मान केला जाणार आहे. अवयवदान अभियानात सक्रिय सहभाग घेतलेल्या आणि सहकार्य केल्याबाबत संबंधित डॉक्टर्स व कर्मचारी व सेवाभावी, समाजसेवी संस्था यांनाही प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयात हा कार्यक्रम होणार आहे.जनजागृतीसाठी विविध स्पर्धाबुधवार ३१ आॅगस्ट रोजी शहरातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता वादविवाद, चित्रकला व निबंध स्पर्धा आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. स्पर्धेत क्रमांक पटकविणाऱ्याला पारितोषिके दिली जातील. १ सप्टेंबर रोजी अवयवदान अभियान नोंदणी शिबिर सकाळी ९ वाजता वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाह्यरुग्ण विभागामध्ये होणार आहे. यामध्ये अवयवदात्यांचे अर्ज भरून घेणे, अवयवदात्यांना आॅनलाईन नोंदणीबाबत माहिती देण्यात येणार आहे.