शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

वेकोलि ओव्हरबर्डनचा होणार लिलाव

By admin | Updated: May 9, 2014 02:55 IST

राज्यातील बॉक्साइट, लोह व मॅग्नीज ओव्हरबर्डनमुळे अनेक गावांना दरवर्षी पुराचा विळखा पडतो. परिसरातील पर्यावरणाला धोका निर्माण होतो.

कामगार विभागाचे धोरण : लोह व मॅग्नीज खाणींचा समावेशचंद्रपूर : राज्यातील बॉक्साइट, लोह व मॅग्नीज ओव्हरबर्डनमुळे अनेक गावांना दरवर्षी पुराचा विळखा पडतो. परिसरातील पर्यावरणाला धोका निर्माण होतो. कृत्रिम टेकड्या निर्माण होतात. या टेकड्या हटविण्याबाबत अनेकदा पर्यावरण मंत्रालयाने निर्देश दिले आहेत. मात्र, याची दखल घेतली नाही. आता या ओव्हरबर्डनचा लिलाव करण्याचे धोरण राज्याच्या उद्योग व कामगार विभागाने आखले आहे. त्यामुळे महसुलात भर पडण्यासोबतच पर्यावरणाचा समतोलही राखण्यास हातभार लागणार आहे. यातून कोळसा खाणींना मात्र वगळण्यात आले आहे.चंद्रपूर जिल्ह्यात लोह खनिजांच्या तीन खाणी आहेत. त्यात सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही येथे दोन तर चिमूर तालुक्यातील वाघाडपेठ येथे एक खाण आहे. त्यासोबतच नागपूर जिल्ह्यात मॅग्नीजच्या खाणी अधिक आहेत. बॉक्साइटच्या खाणी कोकणात आहेत. राज्याच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने नुकताच एक अध्यादेश काढला. परंतु या आदेशामध्ये कोळसा खाणींना वगळण्यात आले.सर्वाधिक त्रास कोळसा खाणीतून निघणार्‍या ओव्हरबर्डनचा आहे. यामुळे नद्यांच्या नैसर्गिक प्रवाहांना अनेक ठिकाणी अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे दरवर्षी शेकडो गावांना पुराचा फटका बसतो. येत्या काही दिवसांत कोळसा खाणीच्या ओव्हरबर्डनसंदर्भातही असाच निर्णय घेतला जाणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.या अध्यादेशामुळे कृत्रिम टेकड्या नष्ट होण्यास मदत होणार आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हातभार लागेल. ओव्हरबर्डनचा लिलाव केला जाणार आहे. खासगी मालकीच्या जागी ओव्हरबर्डन असेल तर लिलावातील ४0 टक्के रक्कम जमीन मालकाला दिली जाईल. पहिल्या दोन फेरीत लिलावात बोली लागली नाही तर त्यात आणखी २५ टक्के सूट दिली जाणार आहे.या प्रकरणात लवकरच ई-टेंडरिंगद्वारे निविदा मागविण्यात येणार आहे. सन २0१३ पूर्वी खाणकाम बंद झालेल्या ठिकाणी मातीमिश्रीत खनिजांची भर टाकून जागा पूर्ववत केलेली नाही. त्यामुळे जमीन नापिक झाली आहे. तसेच खाणपट्यांची मुदत संपल्यापासून संबंधित जमीनमालकांना खाणपट्टेधारकांकडून कोणतीही नुकसानभरपाई मिळाली नाही. त्यांना यातून नुकसानभरपाई मिळण्याची शक्यताही आहे. (शहर प्रतिनिधी)