शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

गावे महाराष्ट्राची; विकास कामे तेलंगणची

By admin | Updated: May 11, 2017 00:35 IST

चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या जिवती तालुक्यातील तेलंगणा - महाराष्ट्र सीमेवरील ते १४ वादग्रस्त गावे महाराष्ट्राचीच आहे,...

नागपूर खंडपीठाचा निर्णय : वादग्रस्त १४ गावे महाराष्ट्राचीच फारुख शेख । लोकमत न्यूज नेटवर्कपाटण : चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या जिवती तालुक्यातील तेलंगणा - महाराष्ट्र सीमेवरील ते १४ वादग्रस्त गावे महाराष्ट्राचीच आहे, असा निर्णय नागपूर- खंडपीठाने दिला. असे असतानाही या गावात तेलंगणा सरकारने विकास कामांचा सपाटा सुरु केला आहे.जिवती तालुक्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या वादग्रस्त गावापैकी एक आहे पुडियाल मोहदा. या गावाची लोकसंख्या ४०० आहे. येथे शासकीय विहीर एक, बोअरवेल एक आहे. बोअरवेल बंद अवस्थेत असून विहीरही कोरडी पडली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गावापासून तालुका मुख्यालय १६ किमी तर तेलंगणातील मंडळ केरामेरी २० किमी अंतरावर आहे. गावात आतापर्यंत एसटी पोहचलेली नाही. गावात विद्युत खांब टाकून तीन ते चार वर्ष लोटले असून विद्युत पुरवठा अजूनही सुरू झालेला नाही. उलट या गावात तेलंगणा राज्यातील विद्युत पुरवठा चालू आहे.१४ वादग्रस्त गावे ही महाराष्ट्राची असूनही शासनाने दुर्लक्ष केले आहे तर तेलंगणा राज्याने मात्र विकास कामाचा सपाटा सुरू केला आहे. या गावांची मुख्य समस्या पिण्याचे पाणी आहे. तेलंगणा शासन तीन कोटी खर्चून पाण्याची टाकी उभारत आहे. यामुळे भोलापठार, अंतापूर, इंदिरानगर, पद्मावती, रोझापूर, नारायणगुडा या गावांना पाणी मिळणार आहे. मात्र येथील नागरिकांना महाराष्ट्रातच राहायचे असल्याने त्यांना महाराष्ट्र सरकारच्या योजना व विकास कामे हवी आहेत.दरम्यान, पुडियाल मोहदा ग्रामपंचायतीच्या सदस्य लक्ष्मीबाई बाबूजी कोटुले, वाघुजी कोंडीबा कोटुळे, शामराव भुरकुटे, सखाराम मिरासे, मारोती कोटुळे यांनी आम्हाला महाराष्ट्रातच राहायचे असून पिण्याचे पाणी, विद्युत मीटरसाठी जिवती येथील संवर्ग विकास अधिकाऱ्यांशी वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे. मात्र कोणताच अधिकारी व नेते गावात आलेले नाही, अशी प्रतिक्रिया ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.