शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

कोअर झोनमधून होणार गावाचे स्थलांतर

By admin | Updated: October 24, 2016 00:57 IST

जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमधील दोन गावे आधीच स्थलांतरित करण्यात आली आहेत.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प : गावाच्या पुनर्वसनाला केंद्र सरकारची मान्यतामिलिंद कीर्ती चंद्रपूरजिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमधील दोन गावे आधीच स्थलांतरित करण्यात आली आहेत. आता पळसगाव (सिंगरू)च्या स्थलांतराला केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. त्याकरिता ३०० एकरचे जंगल साफ केले जाणार आहे.पळसगाव ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये असले तरी सध्या त्या गावापर्यंत एस. टी. बस जात असते. पाच गावांपैकी जामनी व रामदेगी (नवेगाव) ही दोन गावे चिमूर तालुक्यातील खडसंगीजवळ आमडी येथे स्थलांतरित करण्यात आली आहेत. जिल्हा पुनर्वसन विभागातर्फे जामनीच्या २२२ कुटुंबांपैकी २०१ कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. रामदेगी (नवेगाव)च्या २४० कुटुंबांपैकी २३९ कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण झाले आहे.बोटेझरीचे ६९ कुटुंब भगवानपूर येथे स्थलांतरित झाली आहेत. कोळसा या गावच्या बहुसंख्य लोकांचा विरोध स्थलांतराला विरोध आहे. कोळसा येथील २२१ पैकी पहिल्या टप्प्यात ४९ कुटुंब भगवानपूरला स्थलांतरित झाली आहेत. दुसऱ्या टप्प्यात ६७ कुटुंबांनी स्थलांतर केले आहे. उर्वरित कुटुंबांनी गाव सोडण्याबाबत निर्णय घेतलेला नाही. मात्र, ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांच्यानुसार, गावकऱ्यांनी आता स्थलांतराचा निर्णय घेतला पाहिजे. वर्धा जिल्ह्यातील बोर प्रकल्पाच्या जंगलाचा प्रस्ताव नुकताच मंजूर करण्यात आला. त्याप्रमाणे ताडोबासाठीही प्रस्ताव मंजूर करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.बोटेझरीचे स्थलांतर केल्यावर या गावकऱ्यांचे पुनर्वसन व्यवस्थित करण्यात आले नसल्याची ओरड सुरू आहे. त्यामुळे कोळसा येथील नागरिकदेखील अडून बसले आहेत. पळसगावनंतर रानतळोधीच्या स्थलांतराचाही प्रश्न शिल्लक आहे. मात्र, शासनाने सुविधा बंद केल्यावर कोळसा येथील गावकऱ्यांना स्थलांतर करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.गेल्या अनेक दिवसांपासून ताडोबाच्या कोअर झोनमधील गावांचे स्थलांतर रखडलेले होते. आता पळसगावला केंद्राने मान्यता दिली असल्याने हा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे.अटी व शर्र्तींवर स्थलांतरपळसगाव (सिंगरू)चे स्थलांतर करण्यास केंद्र सरकारने काही अटी व शर्ती घालून ९ सप्टेंबर २०१६ रोजी मान्यता दिली आहे. त्यामुळे आता पळसगावसाठी वरोरा तालुक्यातील पेव्हारा कंपार्टमेंटमधील सालोरी बीट येथील ३०० एकर जंगल तोडण्यात येणार आहे. पळसगावमध्ये १९० कुटुंब राहतात. ते स्थलांतरित झाल्यावर एस.टी.बस बंद करण्यात येणार आहे.