शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

कोअर झोनमधून होणार गावाचे स्थलांतर

By admin | Updated: October 24, 2016 00:57 IST

जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमधील दोन गावे आधीच स्थलांतरित करण्यात आली आहेत.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प : गावाच्या पुनर्वसनाला केंद्र सरकारची मान्यतामिलिंद कीर्ती चंद्रपूरजिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमधील दोन गावे आधीच स्थलांतरित करण्यात आली आहेत. आता पळसगाव (सिंगरू)च्या स्थलांतराला केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. त्याकरिता ३०० एकरचे जंगल साफ केले जाणार आहे.पळसगाव ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये असले तरी सध्या त्या गावापर्यंत एस. टी. बस जात असते. पाच गावांपैकी जामनी व रामदेगी (नवेगाव) ही दोन गावे चिमूर तालुक्यातील खडसंगीजवळ आमडी येथे स्थलांतरित करण्यात आली आहेत. जिल्हा पुनर्वसन विभागातर्फे जामनीच्या २२२ कुटुंबांपैकी २०१ कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. रामदेगी (नवेगाव)च्या २४० कुटुंबांपैकी २३९ कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण झाले आहे.बोटेझरीचे ६९ कुटुंब भगवानपूर येथे स्थलांतरित झाली आहेत. कोळसा या गावच्या बहुसंख्य लोकांचा विरोध स्थलांतराला विरोध आहे. कोळसा येथील २२१ पैकी पहिल्या टप्प्यात ४९ कुटुंब भगवानपूरला स्थलांतरित झाली आहेत. दुसऱ्या टप्प्यात ६७ कुटुंबांनी स्थलांतर केले आहे. उर्वरित कुटुंबांनी गाव सोडण्याबाबत निर्णय घेतलेला नाही. मात्र, ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांच्यानुसार, गावकऱ्यांनी आता स्थलांतराचा निर्णय घेतला पाहिजे. वर्धा जिल्ह्यातील बोर प्रकल्पाच्या जंगलाचा प्रस्ताव नुकताच मंजूर करण्यात आला. त्याप्रमाणे ताडोबासाठीही प्रस्ताव मंजूर करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.बोटेझरीचे स्थलांतर केल्यावर या गावकऱ्यांचे पुनर्वसन व्यवस्थित करण्यात आले नसल्याची ओरड सुरू आहे. त्यामुळे कोळसा येथील नागरिकदेखील अडून बसले आहेत. पळसगावनंतर रानतळोधीच्या स्थलांतराचाही प्रश्न शिल्लक आहे. मात्र, शासनाने सुविधा बंद केल्यावर कोळसा येथील गावकऱ्यांना स्थलांतर करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.गेल्या अनेक दिवसांपासून ताडोबाच्या कोअर झोनमधील गावांचे स्थलांतर रखडलेले होते. आता पळसगावला केंद्राने मान्यता दिली असल्याने हा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे.अटी व शर्र्तींवर स्थलांतरपळसगाव (सिंगरू)चे स्थलांतर करण्यास केंद्र सरकारने काही अटी व शर्ती घालून ९ सप्टेंबर २०१६ रोजी मान्यता दिली आहे. त्यामुळे आता पळसगावसाठी वरोरा तालुक्यातील पेव्हारा कंपार्टमेंटमधील सालोरी बीट येथील ३०० एकर जंगल तोडण्यात येणार आहे. पळसगावमध्ये १९० कुटुंब राहतात. ते स्थलांतरित झाल्यावर एस.टी.बस बंद करण्यात येणार आहे.